शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी बी. टी. कॉलेज, शिवाजी विद्यापीठातील जागेचा विचार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मूक मोर्चावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्था सुरू ...

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मूक मोर्चावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्था सुरू करावी. त्याचे उपमुख्य केंद्र कोल्हापूरमध्ये करावे, अशी मागणी केली होती. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा असणार आहे. शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे. ‘सारथी’चे उद्दिष्टनिहाय काम लक्षात घेवून सकल मराठा समाजाने बी. टी. कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठातील जागेचा या केंद्रासाठी विचार करण्याची मागणी केली होती. त्याबाबत ‘सारथी’चे संचालक डी. आर. परिहार यांच्याशी देखील चर्चा केली होती. मात्र, काही कारणास्तव ‘सारथी’चे उपमुख्य केंद्र कोल्हापूरमध्ये सुरू झाले नाही. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी राज्यात ‘सारथी’ची आठ विभागीय कार्यालये आणि कोल्हापूरमध्ये उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील उपकेंद्र पुढील महिन्यापासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी या केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहेत. त्यादृष्टीने सध्या केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शाहुपुरीतील बी. टी. कॉलेजची इमारतीचा पर्याय चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित विषय असल्याने कायमस्वरूपी उपकेंद्र उभारण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. दरम्यान, विचारेमाळ परिसरातील शाहू कॉलेजशेजारील शासकीय निवासस्थानांच्या इमारतीमध्ये सन २०१९ मध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह राज्य सरकारकडून सुरू करण्यात आले. तेथील जागा, उपलब्ध सुविधा लक्षात घेता या वसतिगृहाचा ‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी विचार करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये हे उपकेंद्र करण्यात येवू नये, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.

प्रतिक्रिया

कोल्हापुरात सारथीचे उपमुख्य केंद्र व्हावे, ही सकल मराठा समाजाची मागणी कायम आहे. उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सतेज पाटील यांना धन्यवाद देतो. उपकेंद्र लवकर सुरू करण्यासाठी तात्पुरते स्वरूपात बी. टी. कॉलेजच्या इमारतीचा पर्याय आहे. प्रशस्त केंद्र साकारण्यासाठी सुमारे पाच एकर जागा लागणार आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील जागा योग्य ठरणार आहे.

-इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक.