शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी बी. टी. कॉलेज, शिवाजी विद्यापीठातील जागेचा विचार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मूक मोर्चावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्था सुरू ...

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मूक मोर्चावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्था सुरू करावी. त्याचे उपमुख्य केंद्र कोल्हापूरमध्ये करावे, अशी मागणी केली होती. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा असणार आहे. शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे. ‘सारथी’चे उद्दिष्टनिहाय काम लक्षात घेवून सकल मराठा समाजाने बी. टी. कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठातील जागेचा या केंद्रासाठी विचार करण्याची मागणी केली होती. त्याबाबत ‘सारथी’चे संचालक डी. आर. परिहार यांच्याशी देखील चर्चा केली होती. मात्र, काही कारणास्तव ‘सारथी’चे उपमुख्य केंद्र कोल्हापूरमध्ये सुरू झाले नाही. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी राज्यात ‘सारथी’ची आठ विभागीय कार्यालये आणि कोल्हापूरमध्ये उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील उपकेंद्र पुढील महिन्यापासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी या केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहेत. त्यादृष्टीने सध्या केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शाहुपुरीतील बी. टी. कॉलेजची इमारतीचा पर्याय चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित विषय असल्याने कायमस्वरूपी उपकेंद्र उभारण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. दरम्यान, विचारेमाळ परिसरातील शाहू कॉलेजशेजारील शासकीय निवासस्थानांच्या इमारतीमध्ये सन २०१९ मध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह राज्य सरकारकडून सुरू करण्यात आले. तेथील जागा, उपलब्ध सुविधा लक्षात घेता या वसतिगृहाचा ‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी विचार करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये हे उपकेंद्र करण्यात येवू नये, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.

प्रतिक्रिया

कोल्हापुरात सारथीचे उपमुख्य केंद्र व्हावे, ही सकल मराठा समाजाची मागणी कायम आहे. उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सतेज पाटील यांना धन्यवाद देतो. उपकेंद्र लवकर सुरू करण्यासाठी तात्पुरते स्वरूपात बी. टी. कॉलेजच्या इमारतीचा पर्याय आहे. प्रशस्त केंद्र साकारण्यासाठी सुमारे पाच एकर जागा लागणार आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील जागा योग्य ठरणार आहे.

-इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक.