शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी बी. टी. कॉलेज, शिवाजी विद्यापीठातील जागेचा विचार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मूक मोर्चावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्था सुरू ...

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मूक मोर्चावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्था सुरू करावी. त्याचे उपमुख्य केंद्र कोल्हापूरमध्ये करावे, अशी मागणी केली होती. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा असणार आहे. शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे. ‘सारथी’चे उद्दिष्टनिहाय काम लक्षात घेवून सकल मराठा समाजाने बी. टी. कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठातील जागेचा या केंद्रासाठी विचार करण्याची मागणी केली होती. त्याबाबत ‘सारथी’चे संचालक डी. आर. परिहार यांच्याशी देखील चर्चा केली होती. मात्र, काही कारणास्तव ‘सारथी’चे उपमुख्य केंद्र कोल्हापूरमध्ये सुरू झाले नाही. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी राज्यात ‘सारथी’ची आठ विभागीय कार्यालये आणि कोल्हापूरमध्ये उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील उपकेंद्र पुढील महिन्यापासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी या केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहेत. त्यादृष्टीने सध्या केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शाहुपुरीतील बी. टी. कॉलेजची इमारतीचा पर्याय चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित विषय असल्याने कायमस्वरूपी उपकेंद्र उभारण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. दरम्यान, विचारेमाळ परिसरातील शाहू कॉलेजशेजारील शासकीय निवासस्थानांच्या इमारतीमध्ये सन २०१९ मध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह राज्य सरकारकडून सुरू करण्यात आले. तेथील जागा, उपलब्ध सुविधा लक्षात घेता या वसतिगृहाचा ‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी विचार करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये हे उपकेंद्र करण्यात येवू नये, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.

प्रतिक्रिया

कोल्हापुरात सारथीचे उपमुख्य केंद्र व्हावे, ही सकल मराठा समाजाची मागणी कायम आहे. उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सतेज पाटील यांना धन्यवाद देतो. उपकेंद्र लवकर सुरू करण्यासाठी तात्पुरते स्वरूपात बी. टी. कॉलेजच्या इमारतीचा पर्याय आहे. प्रशस्त केंद्र साकारण्यासाठी सुमारे पाच एकर जागा लागणार आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील जागा योग्य ठरणार आहे.

-इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक.