शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

शिक्षणाच्या वाटेवर आयुष्याभराचा अंधार!

By admin | Updated: July 31, 2015 21:27 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : म्हसवेजवळील कातकरी वस्तीवर नाही वीज

संतोष कणसे- शाहूपुरी  -येथून जवळच असणाऱ्या कातकरी वस्तीवर गेल्या पाच वर्षांपासून वीज नाही. त्यामुळे येथील मुलांना अनेक दिव्यातून वाट काढत आपले भविष्य सफल करण्यासाठी धडपडावे लागत आहे. वस्तीच्या रूपातच शिक्षणाच्या वाटेवरच अंधार असल्याने या मुलांचे भवितव्य अधिकच अंधारात गुडूप होत चालले असल्याचे दिसून येत आहे. सातारा शहराजवळील म्हसवे परिसरात कातकरी समाज मोठ्या प्रमाणावर असून, मासेमारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. येथील रस्त्याच्या बाजूस गेल्या पाच वर्षांपासून काही कुटुंबे आपल्या झोपड्या टाकून राहत आहेत. आपल्या चिमुरड्यांसह त्यांना पावसाळ्याचा व थंडीचा सामना करावा लागत आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी या कुटुंबातील महिला व पुरुषांनी फाटक्या कपड्यांचा आधार घेऊन कसेबसे झोपड्या तयार केल्या आहेत. वळणाच्या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. रात्री सोसाट्याच्या वाऱ्याने झोपडीत राहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडतो. या झोपड्यामध्ये किमान पन्नास ते साठजण राहत आहेत. त्यात काही मुलांचाही समावेश आहे. येथील वीस ते पंचवीस चिमुरडे म्हसवे येथील शाळेत जातात; परंतु या वस्तीवर चारही बाजूने अंधारच अंधार आहे. या वस्तीवर किंवा परिसरात वीज दिसून येत नाही. अनेक मुले दिवे लावून अभ्यास करीत असतात. ही वस्ती नदीच्या जवळ असल्यामुळे सायंकाळी जनावरांचा वावर असतो. त्यामुळेही मुलांचे जीवन धोक्यात आले आहे. आम्ही येथे पाच वर्षांपसून राहत आहे. आमच्या वस्तीवर वीज नसल्याने मुलांना अभ्यासही करता येत नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचे सणसुध्दा करता येत नाहीत. मोबाइल चार्जिंग करायचा म्हटलं तरी आम्हाला दुसऱ्याच्या घरी किंवा दुकानात जावे लागते. आम्हाला वस्तीवर सौरऊर्जा दिवे तरी बसवून द्यावेत. भविष्यात आमची मुलं काहीतरी बनावीत, असे आम्हाला वाटते. - शिवाजी वाघे, रहिवासी