शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

बँकेसाठीच आयाराम-गयाराम एकत्र

By admin | Updated: November 10, 2014 00:44 IST

शिक्षक बँक राजकारण : राजाराम वरुटे यांची एस. डी. पाटील, थोरातांवर टीका

कोल्हापूर : शिक्षक बँकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संभाजीराव थोरात व एस. डी. पाटील यांनी आयाराम-गयारामांची फौज एकत्र केली आहे; पण गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे बँकेचे सभासद अशा प्रवृत्तीला थारा देणार नाहीत, अशी टीका राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी केली. आपल्या नेतृत्वाखाली संघच अधिकृत असून, त्याला शासनमान्यता असल्याचा दावाही त्यांनी केला.प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखेच्या आज, रविवारी कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. संघाच्या पावणेदोन वर्षांच्या व बँकेच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेत राजाराम वरुटे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. राज्याध्यक्ष झाल्यानंतर अल्पावधीतच शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या, आपसी बदल्यांचा प्रश्न मार्गी लावला; पण नेतेमंडळींना शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा पहिल्यांदा आपले हित पाहिल्याने आपल्याबरोबर मतभेद निर्माण झाले. त्यातूनच हकालपट्टीचे सत्र सुरू झाले. हुकूमशाही व पैशांच्या मागणीला कंटाळूनच आपण राज्याध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट वरुटे यांनी केला. आज थोरात यांनीही कागल तालुक्यात मेळावा आयोजित केला आहे. तरीही शिक्षकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास पाहिला तर शिक्षक कोणाकडे जास्त हे सिद्ध होते. वसंतराव हारुगडे म्हणाले, ‘खोटे बोल, पण रेटून बोल’, अशी प्रवृत्ती संभाजीराव थोरात यांची आहे. जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात मेळावा घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. अविचारी माणसांबरोबर थोरात महाराष्ट्रात फिरत असल्याने त्यांना फारशी किंमत नाही. १९६८ पासून शिक्षक संघात काम करत असल्याने सगळ्या नेत्यांच्या कुंडल्या आपल्याकडे आहेत; पण समाजात शिक्षकांची प्रतिमा चांगली राहण्यासाठीच गप्प असल्याचे दामोदर सुतार यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुख्यालयी राहण्याच्या अटीबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन अध्यक्ष पाटील यांनी दिले. संभाजी कदम यांनी स्वागत केले. संघाचे जिल्हाध्यक्ष नामदेव रेपे यांनी प्रास्ताविक केले. पी. के. पाटील, वसंत जोशीलकर, बंडू संकेश्वरे, दिलीप बच्चे, बी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)त्यावेळचा त्यांचा तोरा उतरला !जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना एस. डी. पाटील यांचा तोरा काही औरच होता. सरकार बदलल्याने त्यांचा तोरा उतरला असून, आता त्यांना काही काम नसल्याने त्यांनी बँकेसाठी प्रयत्न सुरू केल्याचा आरोप वरूटे यांनी केला. एस. डी. पाटील यांनी नोकरीसाठी पैसे गोळा केले शिक्षक बँकेत नोकरी लावतो म्हणून एस. डी. पाटील यांनी अनेक मुलांकडून पैसे घेतले होते. पाच वर्षांत भरती करणार नसल्याचे वचन सभासदांना दिले, मग पैसे कशासाठी घेतले, अशी विचारणा त्याच्याकडे केल्यानंतर तंबीची भाषा सुरू केली, असा गौप्यस्फोट करत अशा माणसाबरोबर राहायचे काय? असा सवाल त्यांनी केला.