शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जागृती यात्रेने सरकारला हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य व केंद्रातील सरकार नकारात्मक असून, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधातील संघर्ष कायम राहील. शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्या माध्यमातून ३६ जिल्ह्यांतील ५३० सभांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्टÑ ढवळून काढणार असून, शेतकºयांच्या यात्रेने सरकारला हादरे बसतील, असा इशारा शेतकरी संघटनांची सुकाणू ...

ठळक मुद्देकिशोर ढमाले : शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा कोल्हापुरात

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य व केंद्रातील सरकार नकारात्मक असून, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधातील संघर्ष कायम राहील. शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्या माध्यमातून ३६ जिल्ह्यांतील ५३० सभांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्टÑ ढवळून काढणार असून, शेतकºयांच्या यात्रेने सरकारला हादरे बसतील, असा इशारा शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे नेते किशोर ढमाले यांनी दिला.शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेची सुरुवात शुक्रवारी (दि. २३) सांगली जिल्ह्यातून झाली असून, रविवारी ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात आली. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रतिभानगर येथील हुतात्मा स्तंभास महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. ढमाले म्हणाले, गोºया इंग्रजांच्या ११९ वर्षांच्या काळात जेवढी माणसे मारली नाहीत, त्यापेक्षा अधिक माणसे स्वातंत्र्यानंतर सरकारच्या गोळीबारात मृत्युमुखी पडली. या विरोधात सर्व संघटनांनी मोट बांधली असून, जागृती यात्रेच्या माध्यमातून शेतकºयांमधून उठाव करणार आहोत. ३० एप्रिलला संपूर्ण महाराष्टÑात जेल भरो आंदोलन करणार आहोत.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, माजी आमदार संपतराव पवार, नामदेव गावडे, शिवाजीराव परुळेकर, सतीशचंद्र कांबळे, महापौर स्वाती यवलुजे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कालिदास आपटे, उमा पानसरे, बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, बाबासाहेब देवकर, अ‍ॅड. माणिक शिंदे, बाबूराव कदम, रघुनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.दूध संघांकडून ४५ हजार कोटी वसूलगाईच्या दुधाला किमान २७ रुपये हमीभाव देण्याचे आदेश सरकारने काढले; पण एकाही संघाने त्याचे पालन केले नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून संघाकडूनच साडेचार हजार कोटी सरकारने वसूल केल्याचा आरोप ढमाले यांनी केला.