शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

जागृती यात्रेने सरकारला हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य व केंद्रातील सरकार नकारात्मक असून, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधातील संघर्ष कायम राहील. शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्या माध्यमातून ३६ जिल्ह्यांतील ५३० सभांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्टÑ ढवळून काढणार असून, शेतकºयांच्या यात्रेने सरकारला हादरे बसतील, असा इशारा शेतकरी संघटनांची सुकाणू ...

ठळक मुद्देकिशोर ढमाले : शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा कोल्हापुरात

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य व केंद्रातील सरकार नकारात्मक असून, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधातील संघर्ष कायम राहील. शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्या माध्यमातून ३६ जिल्ह्यांतील ५३० सभांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्टÑ ढवळून काढणार असून, शेतकºयांच्या यात्रेने सरकारला हादरे बसतील, असा इशारा शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे नेते किशोर ढमाले यांनी दिला.शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेची सुरुवात शुक्रवारी (दि. २३) सांगली जिल्ह्यातून झाली असून, रविवारी ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात आली. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रतिभानगर येथील हुतात्मा स्तंभास महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. ढमाले म्हणाले, गोºया इंग्रजांच्या ११९ वर्षांच्या काळात जेवढी माणसे मारली नाहीत, त्यापेक्षा अधिक माणसे स्वातंत्र्यानंतर सरकारच्या गोळीबारात मृत्युमुखी पडली. या विरोधात सर्व संघटनांनी मोट बांधली असून, जागृती यात्रेच्या माध्यमातून शेतकºयांमधून उठाव करणार आहोत. ३० एप्रिलला संपूर्ण महाराष्टÑात जेल भरो आंदोलन करणार आहोत.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, माजी आमदार संपतराव पवार, नामदेव गावडे, शिवाजीराव परुळेकर, सतीशचंद्र कांबळे, महापौर स्वाती यवलुजे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कालिदास आपटे, उमा पानसरे, बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, बाबासाहेब देवकर, अ‍ॅड. माणिक शिंदे, बाबूराव कदम, रघुनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.दूध संघांकडून ४५ हजार कोटी वसूलगाईच्या दुधाला किमान २७ रुपये हमीभाव देण्याचे आदेश सरकारने काढले; पण एकाही संघाने त्याचे पालन केले नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून संघाकडूनच साडेचार हजार कोटी सरकारने वसूल केल्याचा आरोप ढमाले यांनी केला.