शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

कर्जमाफी टाळण्यासाठीच आॅनलाईनचे नाटक: शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:44 IST

तुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे

ठळक मुद्देमात्र, केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. अशा शासकांना आता वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणारनाही.शेतकºयांवर वाईट वेळ आली आहे. जर शेतकरी वर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर

लोकमत न्यूज नेटवर्कतुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. सध्या आॅनलाईन फॉर्म भरून घेण्याचे शासन नाटक करीत आहे, असी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.

तुरंबे (ता राधानगरी) झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारला शेतकºयांचा जसा विसर पडला आहे, तीच अवस्था राज्याची आहे. राज्यातील ४८ पैकी ४२ खासदार केंद्र सरकारबरोबर आहेत. मात्र, केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत.

शेती उत्पादनाच्या दीडपट हमीभाव व सातबारा कोरा करण्यासाठी आता यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. म्हणूनच येत्या १0 नोव्हेंबरला दिल्ली येथील जंतरमंतर याठिकाणी देशातील १६८ संघटना एकत्र करून १0 लाख शेतकºयांना घेऊन आंदोलन करणार आहे. यानंतर तरी सातबारा कोरा होईल, अशी आशा आहे, अशा शासकांना आता वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणारनाही.आयात का वाढविता?यापूर्वीचे कोंग्रेस सरकार देशात सर्व काही पिकत असतानाही २८ हजार कोटींच्या शेतीमालाची आयात करायचे. मात्र, मोदी सरकार एक लाख ४0 हजार कोटींची आयात करते ? मग शेतीमालाला हमीभाव कसा मिळेल? शेतीप्रधान असणाºया आपल्या देशात बाहेरील शेतीमाल आयात कशासाठी होतो ?शेतकºयांचा विश्वासघातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना चांगले दिवस आणण्याचे आश्वासन दिले होते; परंतु विश्वासघात करून गेल्या साडेतीन वर्षांत या सरकारने जी धोरणे राबविली. त्यामुळे शेतकºयांवर वाईट वेळ आली आहे. जर शेतकरी वर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २0१९ च्या निवडणुकीत तुमचे स्थान जनता ठरविल असेही शेट्टी म्हणाले.

तेल अण् केसमी कोल्हापुरातून येताना सभेला उपस्थित असलेल्यांना खोबरेल तेलाच्या बाटल्या आणल्या आहेत. मात्र, अट अशी आहे की, ज्याच्या डोक्यावर एकही केस नाही त्याला तेल मिळेल. कानावरही केस असू नयेत, तशी या राज्य शासनाची अवस्था आहे.