शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

कर्जमाफी टाळण्यासाठीच आॅनलाईनचे नाटक: शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:44 IST

तुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे

ठळक मुद्देमात्र, केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. अशा शासकांना आता वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणारनाही.शेतकºयांवर वाईट वेळ आली आहे. जर शेतकरी वर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर

लोकमत न्यूज नेटवर्कतुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. सध्या आॅनलाईन फॉर्म भरून घेण्याचे शासन नाटक करीत आहे, असी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.

तुरंबे (ता राधानगरी) झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारला शेतकºयांचा जसा विसर पडला आहे, तीच अवस्था राज्याची आहे. राज्यातील ४८ पैकी ४२ खासदार केंद्र सरकारबरोबर आहेत. मात्र, केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत.

शेती उत्पादनाच्या दीडपट हमीभाव व सातबारा कोरा करण्यासाठी आता यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. म्हणूनच येत्या १0 नोव्हेंबरला दिल्ली येथील जंतरमंतर याठिकाणी देशातील १६८ संघटना एकत्र करून १0 लाख शेतकºयांना घेऊन आंदोलन करणार आहे. यानंतर तरी सातबारा कोरा होईल, अशी आशा आहे, अशा शासकांना आता वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणारनाही.आयात का वाढविता?यापूर्वीचे कोंग्रेस सरकार देशात सर्व काही पिकत असतानाही २८ हजार कोटींच्या शेतीमालाची आयात करायचे. मात्र, मोदी सरकार एक लाख ४0 हजार कोटींची आयात करते ? मग शेतीमालाला हमीभाव कसा मिळेल? शेतीप्रधान असणाºया आपल्या देशात बाहेरील शेतीमाल आयात कशासाठी होतो ?शेतकºयांचा विश्वासघातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना चांगले दिवस आणण्याचे आश्वासन दिले होते; परंतु विश्वासघात करून गेल्या साडेतीन वर्षांत या सरकारने जी धोरणे राबविली. त्यामुळे शेतकºयांवर वाईट वेळ आली आहे. जर शेतकरी वर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २0१९ च्या निवडणुकीत तुमचे स्थान जनता ठरविल असेही शेट्टी म्हणाले.

तेल अण् केसमी कोल्हापुरातून येताना सभेला उपस्थित असलेल्यांना खोबरेल तेलाच्या बाटल्या आणल्या आहेत. मात्र, अट अशी आहे की, ज्याच्या डोक्यावर एकही केस नाही त्याला तेल मिळेल. कानावरही केस असू नयेत, तशी या राज्य शासनाची अवस्था आहे.