शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

सावधानताच घालेल अपघाताला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST

घन:शाम कुंभार : यड्राव राष्ट्रीय रस्ते वाहतूक सुरक्षा अभियान सुरू आहे; परंतु सर्वांचाच बेजबाबदारपणा अपघातास कारणीभूत ठरत आहे. अपघातामध्ये ...

घन:शाम कुंभार : यड्राव राष्ट्रीय रस्ते वाहतूक सुरक्षा अभियान सुरू आहे; परंतु सर्वांचाच बेजबाबदारपणा अपघातास कारणीभूत ठरत आहे. अपघातामध्ये हकनाक जाणाऱ्या बळींना जबाबदार कोण, असा प्रश्न समोर येत असला तरी वाहतुकीमध्ये सुरक्षितता येण्यासाठी वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे होणारे काटेकोर पालन वाहतूक शाखेकडून प्रबोधनासह कडक शिस्तच रस्ते अपघाताचे प्रमाण घटवेल व हकनाक बळींना आळा बसेल. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे; परंतु नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये रेंदाळच्या भाजीविक्रेत्या दाम्पत्यासह हेल्मेटअभावी युवकांनाही प्राण गमवावे लागले. त्यामुळे परिवारापुढे निर्माण झालेल्या प्रश्नांचे जाळे कोणतेही कारण नसताना ओढावलेल्या संकटाची भयानकता दर्शविते.

प्रत्येकाला वेळ महत्त्वाचा वाटत असल्याने वाहनाच्या वेगाकडे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आमचे काही देणे लागत नाही, या आविर्भावात असल्याने त्यांचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष, तर रस्ते वाहतूक नियंत्रण विभाग 'वाहतूक सुरक्षा अभियान' प्रारंभीचा कार्यक्रम उत्सवाप्रमाणे साजरा करण्यापलीकडे जास्त लक्ष घालत नाहीत.

अपघातामध्ये गेलेल्या जिवाला नुकसान भरपाई मिळेल अथवा न मिळेल, परंतु त्यांची निर्माण झालेली पोकळी नुकसान भरपाईच्या रकमेतून भरेल का, नुकत्याच अपघातामध्ये मृत पावलेल्या स्वप्नाली कुंभार यांच्या मुलाला माया, ममता मिळेल का, तर ज्यांचा काही संबंध नाही, त्यांना अशी मोठी शिक्षा का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. घरच्या कर्त्याचा जीव गेला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. काही घटनांमध्ये मुले अपघातग्रस्त झाल्याचे पालकांना पाहावे लागते.

रस्ते वाहतूक विभागाने वाहतूक नियमांच्या कडक अंमलबजावणीकडे लक्ष देणे, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविणे, वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे व सावधानता बाळगणे सर्वांच्याच हिताचे आहे; अन्यथा अपघातास सर्वच घटक जबाबदार राहतील.

कोट - वाहनधारकांनी मद्यपान न करता वाहतुकीचे नियम काटेकोर पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. वाहनधारकांना स्वत:बरोबर इतरांचीही सुरक्षितता महत्त्वाची वाटावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- नंदकुमार मोरे, सहायक पोलीस निरीक्षक इचलकरंजी