शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पंधरा दिवसांत २२ लाख वीज मीटर होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:29 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दोन महिन्यांपासून राज्यभरात घरगुती वीज मीटरचा खडखडाट झाल्याने ग्राहकांतून ‘महावितरण’बाबत संतापाची लाट उमटत होती; पण ‘महावितरण’मार्फत राज्यातील ग्राहकांसाठी सुमारे २२ लाख मीटरची मागणी नोंदविली आहे; त्यानुसार संबंधित मान्यताप्राप्त कंपन्यांकडून वीज मीटर पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने ही मीटर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दोन महिन्यांपासून राज्यभरात घरगुती वीज मीटरचा खडखडाट झाल्याने ग्राहकांतून ‘महावितरण’बाबत संतापाची लाट उमटत होती; पण ‘महावितरण’मार्फत राज्यातील ग्राहकांसाठी सुमारे २२ लाख मीटरची मागणी नोंदविली आहे; त्यानुसार संबंधित मान्यताप्राप्त कंपन्यांकडून वीज मीटर पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने ही मीटर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्व विभागांत येत आहेत. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर विभागासाठी (कोल्हापूर व सांगली जिल्ह्णांसाठी) सुमारे चार हजार मीटर उपलब्ध झाली आहेत. ‘महावितरणकडे घरगुती मीटरचा खडखडाट’ या मथळ्याखाली ‘लोकमत’कडे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ‘महावितरण’चे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर अनेक विभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी वीज मीटर उपलब्धतेबाबत महावितरणच्या वेबसाईटवर अद्ययावत माहिती भरली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आढावा घेऊन मीटर उत्पादकांकडे तातडीने मागणी करण्यात आहे.महावितरणकडून फेब्रुवारी २०१८ मध्ये पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्णांसाठी सिंगल फेजची १ लाख ७५ हजार नवीन घरगुती वीजमीटर उपलब्ध झाली होती; पण ही मीटर जून महिन्याच्या प्रारंभीच संपली. त्यानंतर प्रत्येक कार्यालयात वीज मीटर मागणीसाठी ग्राहकांच्या चकरा सुरू झाल्या.गेले दोन महिने प्रत्येक विभागीय व शाखा कार्यालयात वीज मागणी अर्जांचे गठ्ठे वाढू लागले; पण त्या तुलनेत मीटरचा तुटवडा भासल्याने अधिकाºयांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर राज्यभरातील मागणीबाबत आढावा घेऊन त्याबाबत अधिकृत पाच कंपन्याकडे २२ लाख मीटरची मागणी नोंदविली. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही मीटर येणार आहेत.दोन कंपन्यांची मीटर दोषयुक्त‘महावितरण’ कंपनीकडून राज्यभरात मान्यताप्राप्त सात कंपन्यांकडून वीज मीटर उत्पादन करून घेतले जाते; पण गेल्या वर्षभरात दोन कंपन्याकडून वितरण झालेल्या बहुतांश मीटरमध्ये दोष आढळले. या दोन कंपन्यांच्या मीटरमुळे अनेकांची बिले अवाढव्य येऊ लागली, मीटर बंद पडू लागली. त्यामुळे या दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकले व त्या कंपन्यांची दोषी सर्व मीटर बदलून, त्या ठिकाणी फक्त एलएनटी, जीनस, पालमोहर, हिमाचल, एचपीएल या पाच कंपन्यांची मीटर बसविली. त्यामुळे मीटरचा तुटवडा भासू लागला.‘चोवीस तासांत नवीन वीज कनेक्शन, नादुरुस्त मीटर महिन्याभरात बदला’ या महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या योजनेच्या घोषवाक्याचा गेल्या दोन महिन्यांत पुरता बोजवारा उडाला होता. मीटर उपलब्ध नसल्याने सर्वच उपविभागीय कार्यालयांत मीटरचा तुटवडा भासत होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत कोल्हापूर व सांगली जिल्ह्णांसाठी चार हजार मीटर उपलब्ध झाली आहेत. आणखी मीटर पुढील आठवड्यात येत आहेत.