शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

स्वायत्त महाविद्यालयांची अवस्था बडा घर पोकळ वासा, तीन वर्षांपासून 'युजीसी'चे अनुदानच नाही 

By पोपट केशव पवार | Updated: May 29, 2024 15:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यात चार महाविद्यालयांत पारंपरिक अभ्यासक्रम 

पोपट पवार कोल्हापूर : महाविद्यालयांनी स्वायत्त होऊन स्वत:चा अभ्यासक्रम तयार करावा, परीक्षा घ्याव्यात, निकालही त्यांनीच जाहीर करावा, असे मृगजळ दाखवत यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) देशभरातील अनेक महाविद्यालयांना स्वायत्त होण्यास भाग पाडले. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून यूजीसीने महाविद्यालयांना २० लाख रुपयांचे अनुदानच दिले नसल्याने या महाविद्यालयांची अवस्था 'बडा घर पोकळ वासा' अशी झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित पारंपरिक अभ्यासक्रमाची चार महाविद्यालये स्वायत्त आहेत. मात्र, अनुदानाची एक पै ही मिळाली नसल्याने 'हात दाखवून अवलक्षण करण्याचा' पश्चात्ताप या महाविद्यालयांना होऊ लागला आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१८ मध्ये महाविद्यालयांना स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात विवेकानंद, महावीर, डीआरके कॉमर्स कॉलेज व कमला कॉलेज ही पारंपरिक अभ्यासक्रमाची चार महाविद्यालये स्वायत्त झाली. स्वायत्त महाविद्यालयांना त्यांच्या प्राथमिक सुविधांसाठी प्रत्येक वर्षी १५ ते २० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय यूजीसीने घेतला. त्यानुसार पहिली दोन वर्षे तो देण्यातही आला.

मात्र, २०२० पासून हे अनुदान महाविद्यालयांना मिळालेले नाही. एकतर स्वायत्त झाल्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या सवलती बंद झाल्या. त्यात यूजीसीनेही अनुदान तटवल्याने महाविद्यालये अडचणीत आली आहेत. हे स्वायत्ततेचे मृगजळ कळल्याने स्वायत्त होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांनी 'पुढच्याच ठेच मागचा शहाणा' या प्रमाणे सावध पवित्रा घेतला आहे.

काय आहेत अडचणीस्वायत्ततेमुळे विद्यापीठ स्तरावरील बऱ्याच शैक्षणिक व प्रशासकीय प्रकिया महाविद्यालय स्तरावर पार पाडाव्या लागतात. अभ्यासक्रम बनविणे, परीक्षा घेणे, मूल्यमापन करणे व निकाल लावणे. प्रशासकीय मंडळ, अभ्यास मंडळ, शैक्षणिक परिषद आणि वित्त समिती यांची स्थापना करणे या महाविद्यालयांना बंधनकारक आहे. मात्र, या अंमलबजावणीसाठी लागणारे प्रशिक्षित आणि मुबलक मनुष्यबळ कुठून आणायचे, हा प्रश्न या महाविद्यालयांसमोर आहे.

म्हणे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करास्वायत्त महाविद्यालयांनी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून त्यातून महाविद्यालयांचा भौतिक खर्च भागवावा, असे यूजीसीला वाटते. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची वानवा आहे. ज्या पायाभूत सुविधांसाठी यूजीसीने अनुदान देण्याचे जाहीर केले होते ते अनुदानच तीन तीन वर्षे मिळत नसेल तर नवे अभ्यासक्रम कसे सुरू करायचे, असा सवाल एका प्राचार्यांनी उपस्थित केला.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर स्वायत्त महाविद्यालयांना ठरलेले अनुदान देणे गरजेचे आहे. केवळ कागद रंगवून हे धोरण राबवता येणार नाही. - डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

टॅग्स :kolhapurकोल्हापूर