शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

स्वायत्त महाविद्यालयांची अवस्था बडा घर पोकळ वासा, तीन वर्षांपासून 'युजीसी'चे अनुदानच नाही 

By पोपट केशव पवार | Updated: May 29, 2024 15:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यात चार महाविद्यालयांत पारंपरिक अभ्यासक्रम 

पोपट पवार कोल्हापूर : महाविद्यालयांनी स्वायत्त होऊन स्वत:चा अभ्यासक्रम तयार करावा, परीक्षा घ्याव्यात, निकालही त्यांनीच जाहीर करावा, असे मृगजळ दाखवत यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) देशभरातील अनेक महाविद्यालयांना स्वायत्त होण्यास भाग पाडले. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून यूजीसीने महाविद्यालयांना २० लाख रुपयांचे अनुदानच दिले नसल्याने या महाविद्यालयांची अवस्था 'बडा घर पोकळ वासा' अशी झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित पारंपरिक अभ्यासक्रमाची चार महाविद्यालये स्वायत्त आहेत. मात्र, अनुदानाची एक पै ही मिळाली नसल्याने 'हात दाखवून अवलक्षण करण्याचा' पश्चात्ताप या महाविद्यालयांना होऊ लागला आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१८ मध्ये महाविद्यालयांना स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात विवेकानंद, महावीर, डीआरके कॉमर्स कॉलेज व कमला कॉलेज ही पारंपरिक अभ्यासक्रमाची चार महाविद्यालये स्वायत्त झाली. स्वायत्त महाविद्यालयांना त्यांच्या प्राथमिक सुविधांसाठी प्रत्येक वर्षी १५ ते २० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय यूजीसीने घेतला. त्यानुसार पहिली दोन वर्षे तो देण्यातही आला.

मात्र, २०२० पासून हे अनुदान महाविद्यालयांना मिळालेले नाही. एकतर स्वायत्त झाल्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या सवलती बंद झाल्या. त्यात यूजीसीनेही अनुदान तटवल्याने महाविद्यालये अडचणीत आली आहेत. हे स्वायत्ततेचे मृगजळ कळल्याने स्वायत्त होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांनी 'पुढच्याच ठेच मागचा शहाणा' या प्रमाणे सावध पवित्रा घेतला आहे.

काय आहेत अडचणीस्वायत्ततेमुळे विद्यापीठ स्तरावरील बऱ्याच शैक्षणिक व प्रशासकीय प्रकिया महाविद्यालय स्तरावर पार पाडाव्या लागतात. अभ्यासक्रम बनविणे, परीक्षा घेणे, मूल्यमापन करणे व निकाल लावणे. प्रशासकीय मंडळ, अभ्यास मंडळ, शैक्षणिक परिषद आणि वित्त समिती यांची स्थापना करणे या महाविद्यालयांना बंधनकारक आहे. मात्र, या अंमलबजावणीसाठी लागणारे प्रशिक्षित आणि मुबलक मनुष्यबळ कुठून आणायचे, हा प्रश्न या महाविद्यालयांसमोर आहे.

म्हणे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करास्वायत्त महाविद्यालयांनी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून त्यातून महाविद्यालयांचा भौतिक खर्च भागवावा, असे यूजीसीला वाटते. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची वानवा आहे. ज्या पायाभूत सुविधांसाठी यूजीसीने अनुदान देण्याचे जाहीर केले होते ते अनुदानच तीन तीन वर्षे मिळत नसेल तर नवे अभ्यासक्रम कसे सुरू करायचे, असा सवाल एका प्राचार्यांनी उपस्थित केला.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर स्वायत्त महाविद्यालयांना ठरलेले अनुदान देणे गरजेचे आहे. केवळ कागद रंगवून हे धोरण राबवता येणार नाही. - डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

टॅग्स :kolhapurकोल्हापूर