शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

आजरा, आंबोली होणार अंधारमुक्त

By admin | Updated: February 13, 2015 23:29 IST

गेली ४० वर्षे आजरा तालुकावासीय या प्रकाराला सामोरे जात आहेत. ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाला तर लाईन दुरुस्तीशिवाय पर्याय नव्हता.

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा गडहिंग्लज येथून आजरा व आंबोलीकरिता स्वतंत्र वीजवाहिनी जोडली जाणार असून, यामुळे आता वीज जाणे हा प्रकार आजरा-आंबोलीवासीयांच्या दृष्टीने संपुष्टात येणार आहे. यामुळे आजरा व आंबोली परिसर अंधारमुक्त होणार असल्याची माहिती वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस यांनी दिली.आजरा तालुक्याला मुमेवाडी येथील वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मुमेवाडीतून मलिगे्र, गवसे व तेथून पुढे तालुकाभर वीजपुरवठा होतो. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास प्रथम मुमेवाडी, त्यानंतर मलिगे्र व गवसे उपकेंद्रातील वीजपुरवठा बंद पडतो. परिणामी, आजरा तालुक्यासह आंबोलीच्या काही परिसराला अंधाराशी सामना करावा लागतो. तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही. काहीवेळा एक-दोन दिवस सलग अंधारात घालवावे लागतात. घरगुतीसह शेती व औद्योगिक वीजपुरवठाही बंद राहतो.गेली ४० वर्षे आजरा तालुकावासीय या प्रकाराला सामोरे जात आहेत. ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाला तर लाईन दुरुस्तीशिवाय पर्याय नव्हता. परंतु, आता नवीन वाहिनी जोडली जाणार आहे. गडहिंग्लज-महागाव येथून काढण्यात येणाऱ्या या वीजवाहिनीमुळे मलिग्रे-गवसे वीजवाहिनीतून वीजपुरवठा खंडित झाल्यास पाचच मिनिटांत पर्यायी वीजपुरवठा महागाव उपकेंद्रातून सुरू होणार आहे. यामुळे विजेचा पुरवठा अखंड राहण्यास मदत होणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून वीजवाहिनी जोडण्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. यामुळे कृषी, घरगुती व उद्योग क्षेत्रात खंडित वीजपुरवठ्यामुळे होणारे नुकसान टाळले जाणार असून, २५ हजार वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या वर्षभरामध्ये ही वीजवाहिनी जोडणी पूर्ण करण्याचे वीज कंपनीचे नियोजन आहे, असेही सिकनीस यांनी स्पष्ट केले.