शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

आजरा, आंबोली होणार अंधारमुक्त

By admin | Updated: February 13, 2015 23:29 IST

गेली ४० वर्षे आजरा तालुकावासीय या प्रकाराला सामोरे जात आहेत. ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाला तर लाईन दुरुस्तीशिवाय पर्याय नव्हता.

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा गडहिंग्लज येथून आजरा व आंबोलीकरिता स्वतंत्र वीजवाहिनी जोडली जाणार असून, यामुळे आता वीज जाणे हा प्रकार आजरा-आंबोलीवासीयांच्या दृष्टीने संपुष्टात येणार आहे. यामुळे आजरा व आंबोली परिसर अंधारमुक्त होणार असल्याची माहिती वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस यांनी दिली.आजरा तालुक्याला मुमेवाडी येथील वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मुमेवाडीतून मलिगे्र, गवसे व तेथून पुढे तालुकाभर वीजपुरवठा होतो. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास प्रथम मुमेवाडी, त्यानंतर मलिगे्र व गवसे उपकेंद्रातील वीजपुरवठा बंद पडतो. परिणामी, आजरा तालुक्यासह आंबोलीच्या काही परिसराला अंधाराशी सामना करावा लागतो. तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही. काहीवेळा एक-दोन दिवस सलग अंधारात घालवावे लागतात. घरगुतीसह शेती व औद्योगिक वीजपुरवठाही बंद राहतो.गेली ४० वर्षे आजरा तालुकावासीय या प्रकाराला सामोरे जात आहेत. ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाला तर लाईन दुरुस्तीशिवाय पर्याय नव्हता. परंतु, आता नवीन वाहिनी जोडली जाणार आहे. गडहिंग्लज-महागाव येथून काढण्यात येणाऱ्या या वीजवाहिनीमुळे मलिग्रे-गवसे वीजवाहिनीतून वीजपुरवठा खंडित झाल्यास पाचच मिनिटांत पर्यायी वीजपुरवठा महागाव उपकेंद्रातून सुरू होणार आहे. यामुळे विजेचा पुरवठा अखंड राहण्यास मदत होणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून वीजवाहिनी जोडण्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. यामुळे कृषी, घरगुती व उद्योग क्षेत्रात खंडित वीजपुरवठ्यामुळे होणारे नुकसान टाळले जाणार असून, २५ हजार वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या वर्षभरामध्ये ही वीजवाहिनी जोडणी पूर्ण करण्याचे वीज कंपनीचे नियोजन आहे, असेही सिकनीस यांनी स्पष्ट केले.