शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पालिकेच्या पाणी योजनेचे आॅडिट

By admin | Updated: November 6, 2015 00:11 IST

प्रशांत रसाळ : सार्वजनिकऐवजी ग्रुप कनेक्शन देणार

इचलकरंजी : नगरपालिकेच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे वॉटर आॅडिट करून घेण्यात येणार असून, सुमारे दोन हजार नवीन नळ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बहुतांशी ठिकाणी असलेले सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करून त्याऐवजी ग्रुप कनेक्शन देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.मुख्याधिकारी डॉ. रसाळ म्हणाले, शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजनांतून सुमारे ४४ टक्के पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. ही गळती किमान वीस टक्क्यांवर आणली जाणार आहे. तसेच नळ पुरवठा योजनेकडील उत्पन्नही वाढविण्यात येणार आहे. याशिवाय ज्याठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन असेल, त्यांच्यासाठी अभय योजना जाहीर करून सदरचे कनेक्शन अधिकृत करून घेण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत नळ कनेक्शन अधिकृत करून घेतली नाहीत, तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.वाढत्या लोकसंख्येबरोबर शहराची पर्यावरणविषयक होणारी हानी व त्यावरील उपाययोजना याचाही अहवाल तयार करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात साफसफाई व कचरा उठाव योजनेंतर्गत संबंधित ठेकेदाराकडून होणाऱ्या गैरव्यवहारावर इथून पुढे कडक नजर राहील. याशिवाय बांधकाम विभागाकडील बांधकामाच्या दर्जाबाबत त्रयस्थ संस्थेमार्फत अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची बिले दिली जातील. बांधकाम परवान्याची पद्धती सुलभ करण्यात येईल. तसेच बांधकामाबाबत दिल्या जाणाऱ्या परवान्याची तपासणी बांधकाम सुरू असतानाच केली जाईल. परिणामी बेकायदेशीर बांधकामाला आळा बसेल.नगरपालिकेच्या हद्दीतील प्रमुख असलेले चौदा रस्ते शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत होण्यासाठी ३२ कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी सुमारे २५ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत, असे स्पष्ट करून मुख्याधिकारी म्हणाले, पालिकेतील कामकाजाबाबत पारदर्शकता यावी. तसेच नागरिकांची कामे गतीने व्हावीत, यासाठी प्रत्येक विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर मुख्याधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष राहील, असे सांगून ते म्हणाले, नागरिकांना भेटण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची निश्चितपणे उपलब्धता व्हावी म्हणून दररोज सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना लोकांनी भेटावे. तसेच दुपारी ४ ते ६ या वेळेत त्यांनी आपणास भेटावे, असेही मुख्याधिकाऱ्यांनी शेवटी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)नगररचना अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीसपालिकेकडील नगररचना अधिकारी बबन खोत यांना शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी दिली. डॉ. रसाळ हे इचलकरंजी पालिकेमध्ये रूजू होऊन सुमारे दोन महिने झाले. या कालावधीमध्ये खोत हे पालिकेस कोणत्याही प्रकारची माहिती न देता यापूर्वी दोन वेळा गैरहजर राहिले होते. तेव्हा त्यांना फक्त तोंडी समज देण्यात आली होती. मात्र, खोत मंगळवारी अनुपस्थित राहिले. म्हणून आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत खुलासा करावा, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे डॉ. रसाळ यांनी स्पष्ट केले.