शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

‘साखर’ उद्योगाचा पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 4, 2016 01:06 IST

निर्यातीकडे पाठ : शिल्लक साठा तसाच राहिल्यास अडचणी

विश्वास पाटील (कोल्हापूर) : देशांतर्गत बाजारपेठेतील साखर निर्यातीच्या माध्यमातून जगाच्या बाजारपेठेत गेल्याशिवाय यंदाच्या व पुढील हंगामातही साखरेला चांगला भाव मिळणार नाही, हे माहीत असूनही साखर कारखानदारीने कच्च्या साखरेच्या निर्यातीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे कारखानदारी स्वत:च स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असल्याची प्रतिक्रिया या उद्योगातूनच उमटत आहे. याचा परिणाम साखरेच्या भावावर होणार असल्याने पुढील हंगामातही दर पडलेलेच राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे. केंद्र व राज्य शासन, साखर आयुक्तांचा निर्यातीसाठी आग्रह आहे. त्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र शासनाने ठरलेला कोटा निर्यात केल्यास केंद्र शासन टनास ४५ रुपये अनुदान देणार आहे. साखर निर्यातीचे एकूण ४० लाख टन नियोजन आहे. त्यातील ८० टक्के निर्यात करायची ठरविली तरी ३२ लाख टन होते. त्यातील आजअखेर आठ लाख टनच साखर निर्यात झाली आहे. आणखी दोन-तीन लाख टनांचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे दहा लाख टन निर्यात झाली तरी आणखी २२ लाख टन साखर शिल्लक राहते. जगाच्या बाजारपेठेत पांढऱ्या साखरेस फारशी मागणी नाही; त्यामुळे कच्च्या साखरेचा व्यवहार जास्त होतो. कच्ची साखर निर्यात करायची झाल्यास तशी साखर तयार करणे आवश्यक आहे. पुढील वर्षी देशात दुष्काळामुळे उसाचे उत्पादन कमी असल्याने साखर ४० रुपयांवर जाईल, असा विचार करून कारखानदार निर्यात करण्यास नाखुश आहेत; परंतु त्यामुळे कारखानदारीचेच नुकसान होणार आहे. एकतर दुष्काळाची स्थिती महाराष्ट्रात तीव्र असली तरी ती तेवढी उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांत नाही. त्यामुळे साखर उत्पादन होणार आहे. शिवाय प्रत्येक कारखान्यास गेल्या तीन वर्षांतील हंगामातील उत्पादनाच्या सरासरी १२ टक्केच साखर निर्यात करावयाची आहे. त्यामुळे उर्वरित नव्वद टक्के साखर चढ्या दराने विक्रीसाठी उपलब्ध होत असतानाही कारखाने निर्यातीकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे चित्र आहे. किती आहे साखर... यंदाचे अपेक्षित उत्पादन : २६० लाख टन मागील वर्षाचा शिल्लक साठा : ९५ लाख टन एकूण शिल्लक साठा : ३५५ लाख टन भारताचा वार्षिक वापर : २४० लाख टन देशांतर्गत बाजारात शिल्लक राहणारी साखर : ११५ लाख टन निर्यात न केल्यास संभाव्य धोके १) टनास ४५ रुपये अनुदानापासून वंचित २) राज्य शासनाने रद्द केलेला खरेदी कर भरावा लागेल ३) ‘एफआरपी’साठी जे सॉफ्ट लोन दिले आहे, त्यावरील व्याज कारखान्यांना भरावे लागणार ४) बाजारात गरजेपेक्षा जास्त साखर राहिल्यास दरावर परिणाम.