शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

एटीएमची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: August 20, 2015 21:54 IST

बँकांची बेपर्वाई : अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाहीत

श्रीकांत चाळके - खेड शहर आणि परिसरात बहुतांश बँकांच्या एटीएमला सुरक्षाकवच नाही. बँकांच्या या हलगर्जीपणाचा अनेक पटीने पोलिसांना त्रास भोगावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणच्या चोऱ्या आणि रत्नागिरीतील बँकेमध्ये झालेल्या दरोडा प्रकरणानंतरही या बँका काहीही शिकल्या नसल्याचेच दिसून येत आहे.तीनबत्ती नाका आणि बसस्थानक परिसरातील बहुतेक एटीएम सुरक्षारक्षकांअभावी असुरक्षित असल्याचे भयावह सत्य नुकत्याच केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.़ बँकांची ही हेळसांड ग्राहकांच्या माथी पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़जाकादेवी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेवर पाचजणांनी दरोडा घालून रोकड लांबविल्याची घटना २८ नोव्हेंबर २०१३ दरम्यान घडली होती़ या घटनेपासून खेडमधील बँकांनी काहीही बोध अद्याप घेतलेला नसल्याचेच दिसून येत आहे. या दरोड्यानंतर लागलीच जिल्हाधिकारी आणि बँक प्रशासनानेही आपापल्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमण्याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते.़ मात्र, या आश्वासनाला अक्षरश: हरताळ फासण्यात आला आहे.बँकांची एटीएम सेंटर्स रत्नागिरीत जास्त प्रमाणात आहेत. मात्र, या तुलनेत खेडमध्येदेखील दोन आकडी संख्या ही एटीएमची आहे. ही एटीएम सेंटर्स किती सुरक्षित आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. बँकांच्या एटीएमची खेडमधील काय स्थिती आहे, याबाबत माहिती घेतली असता ही वस्तुस्थिती समोर आली आहे.तीनबत्ती नाका परिसरात स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक आहे तर बसस्थानक परिसरातील बँक आॅफ इंडियाच्या सेंटरमध्येही सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. मात्र उर्वरित बँकांमध्ये सेंट्रल बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय, बँक आॅफ बडोदा, सिंडीकेट बँक, बँक आॅफ महाराष्ट्र तसेच इतर बहुतेक राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएम सेंटर्समध्ये सुरक्षा रक्षक नाही़ याचा परिणाम ग्राहकांच्या सुरक्षिततेवर होत आहे.सायंकाळी तसेच रात्रीच्यावेळी महिलांनाही आता एटीएममधून पैसे अथवा कागदपत्रे पाहता येणे शक्य होत नाही़ अशावेळी संघर्ष किंवा खटके उडण्याची शक्यता असते. या एटीएममध्ये कोणीही घुसले, तरी त्याचा बँकांना पत्ताच नसतो. काही एटीएम सेंटर्समध्ये उभारलेली सीसीटीव्हीची यंत्रणाही बंदच आहे. त्यामुळे याठिकाणी सुरक्षा रामभरोसेच आहे.खेडमधील काही सेंटर्सच्या दरवाजांना लॉक असायचे. ही लॉकिंग यंत्रणा ज्या व्यक्तीला एटीएममध्ये जायचे असेल त्याला एटीएम कार्डद्वारे खोलल्यावरच आत जाता येत होते.़ एटीएम सेंटर्सची ही अशीच स्थिती राहिली तर होणाऱ्या परिणामांना बँकांनाच जबाबदार धरण्यात आले पाहिजे. यासाठी बँकांनीच सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)सीसीटीव्हीही बंद?रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे भर दिवसा पडला होता बँकेवर दरोडा.बँकांनी सुरक्षा ठेवण्याचे केले होते मान्य.बैठकीतील आदेशाची अद्यापही अंमलबजावणी नाही.खेडमधील तीनबत्ती नाका, बसस्थानक परिसरातील बहुतेक एटीएम सुरक्षारक्षकांअभावी असुरक्षित.अनेक एटीएम सेंटर्समधील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद असल्याचे निदर्शनास.