शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: August 20, 2015 21:54 IST

बँकांची बेपर्वाई : अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाहीत

श्रीकांत चाळके - खेड शहर आणि परिसरात बहुतांश बँकांच्या एटीएमला सुरक्षाकवच नाही. बँकांच्या या हलगर्जीपणाचा अनेक पटीने पोलिसांना त्रास भोगावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणच्या चोऱ्या आणि रत्नागिरीतील बँकेमध्ये झालेल्या दरोडा प्रकरणानंतरही या बँका काहीही शिकल्या नसल्याचेच दिसून येत आहे.तीनबत्ती नाका आणि बसस्थानक परिसरातील बहुतेक एटीएम सुरक्षारक्षकांअभावी असुरक्षित असल्याचे भयावह सत्य नुकत्याच केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.़ बँकांची ही हेळसांड ग्राहकांच्या माथी पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़जाकादेवी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेवर पाचजणांनी दरोडा घालून रोकड लांबविल्याची घटना २८ नोव्हेंबर २०१३ दरम्यान घडली होती़ या घटनेपासून खेडमधील बँकांनी काहीही बोध अद्याप घेतलेला नसल्याचेच दिसून येत आहे. या दरोड्यानंतर लागलीच जिल्हाधिकारी आणि बँक प्रशासनानेही आपापल्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमण्याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते.़ मात्र, या आश्वासनाला अक्षरश: हरताळ फासण्यात आला आहे.बँकांची एटीएम सेंटर्स रत्नागिरीत जास्त प्रमाणात आहेत. मात्र, या तुलनेत खेडमध्येदेखील दोन आकडी संख्या ही एटीएमची आहे. ही एटीएम सेंटर्स किती सुरक्षित आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. बँकांच्या एटीएमची खेडमधील काय स्थिती आहे, याबाबत माहिती घेतली असता ही वस्तुस्थिती समोर आली आहे.तीनबत्ती नाका परिसरात स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक आहे तर बसस्थानक परिसरातील बँक आॅफ इंडियाच्या सेंटरमध्येही सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. मात्र उर्वरित बँकांमध्ये सेंट्रल बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय, बँक आॅफ बडोदा, सिंडीकेट बँक, बँक आॅफ महाराष्ट्र तसेच इतर बहुतेक राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएम सेंटर्समध्ये सुरक्षा रक्षक नाही़ याचा परिणाम ग्राहकांच्या सुरक्षिततेवर होत आहे.सायंकाळी तसेच रात्रीच्यावेळी महिलांनाही आता एटीएममधून पैसे अथवा कागदपत्रे पाहता येणे शक्य होत नाही़ अशावेळी संघर्ष किंवा खटके उडण्याची शक्यता असते. या एटीएममध्ये कोणीही घुसले, तरी त्याचा बँकांना पत्ताच नसतो. काही एटीएम सेंटर्समध्ये उभारलेली सीसीटीव्हीची यंत्रणाही बंदच आहे. त्यामुळे याठिकाणी सुरक्षा रामभरोसेच आहे.खेडमधील काही सेंटर्सच्या दरवाजांना लॉक असायचे. ही लॉकिंग यंत्रणा ज्या व्यक्तीला एटीएममध्ये जायचे असेल त्याला एटीएम कार्डद्वारे खोलल्यावरच आत जाता येत होते.़ एटीएम सेंटर्सची ही अशीच स्थिती राहिली तर होणाऱ्या परिणामांना बँकांनाच जबाबदार धरण्यात आले पाहिजे. यासाठी बँकांनीच सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)सीसीटीव्हीही बंद?रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे भर दिवसा पडला होता बँकेवर दरोडा.बँकांनी सुरक्षा ठेवण्याचे केले होते मान्य.बैठकीतील आदेशाची अद्यापही अंमलबजावणी नाही.खेडमधील तीनबत्ती नाका, बसस्थानक परिसरातील बहुतेक एटीएम सुरक्षारक्षकांअभावी असुरक्षित.अनेक एटीएम सेंटर्समधील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद असल्याचे निदर्शनास.