संतोष बामणे - जयसिंगपूरसध्याच्या धावत्या युगामध्ये जलद पैसे काढण्यासाठी व २४ तास सेवा देणारी महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘एटीएम’ मशीन ठरली आहे. मात्र, जयसिंगपूरसह परिसरातील एटीएम सेवा पाहिली असता सुरक्षारक्षकाविना काही एटीएम शहरामध्ये आहेत. मात्र, यामधून रात्री-अपरात्री पैसे काढणे धोक्याची घंटा ठरत आहेत, तर काही एटीएमसमोर अंधारमय परिसर असल्यामुळे नागरिक पैसे काढताना भयभीत होत आहेत. त्यामुळे काही मशीन हे रामभरोसेच असल्याचे जाणवत आहे.सध्या शहरामध्ये २५ हून अधिक एटीएम मशीन असून काही बॅँकांच्या एटीएमसाठी सुरक्षारक्षक आहेत, तर काही एटीएम सुरक्षारक्षकाविनाच आहेत. त्यामुळे पैसे काढून परत येताना लुटमारीच्या शक्यतेमुळे कार्डधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर राज्यामध्ये काही ठिकाणी सुरक्षारक्षक नसलेल्या ठिकाणी एटीएम फोडून लाखो रुपयांची लूट केल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे आता एटीएमकडे बॅँकांनी दुर्लक्ष न करता सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे.संवेदनशील व आडमार्गावर असलेल्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची सक्त गरज आहे. बॅँक व ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठीएटीएम लाभदायक ठरली आहेत. मात्र, एटीएमवरील रक्कम परस्पर उचलणारी रॅकेटही सध्या कार्यरत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जयसिंगपूर शहर, उपनगरे, औद्योगिक वसाहती व परिसरातील गावांमध्ये एटीएमला सुरक्षारक्षक नाहीत व परिसरात अंधार असल्यामुळे वर्दळ नसलेल्या ठिकाणी काही एटीएम आहेत. याठिकाणी बॅँकांनी लक्ष देऊन आपल्या एटीएमच्या व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर सुरक्षारक्षक व पुरेशी प्रकाशाची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.सीसीटीव्ही कॅमेरे उच्च दर्जाचे नाहीतसध्या काही एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उच्च दर्जाचे नाहीत. छायाचित्र घेणाऱ्या कॅमेऱ्यांची गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. प्रत्येक एटीएममध्ये स्वच्छ प्रकाश, हवा यासाठी पुरेपूर प्रकाशाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. पैसे काढणे व भरणे याशिवाय काही गैरप्रकार होत असेल, तर सायरनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. एटीएमच्या आतमध्ये जसे कॅमेरे आहेत. तसे बाहेरही लावण्याची गरज भासत आहे.
‘एटीएम’ची सुरक्षा रामभरोसेच
By admin | Updated: August 26, 2015 00:34 IST