शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

साखर कारखान्यांचे होणार मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:43 IST

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने साखर संचालक (अर्थ) ज्ञानेश्वर मुकणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला आपला अहवाल दोन महिन्यांत देण्यास सांगण्यात आले आहे. संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाची कितपत पूर्तता झाली आहे; यासह शासकीय अर्थसहाय्याचा गैरवापर ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने साखर संचालक (अर्थ) ज्ञानेश्वर मुकणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला आपला अहवाल दोन महिन्यांत देण्यास सांगण्यात आले आहे. संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाची कितपत पूर्तता झाली आहे; यासह शासकीय अर्थसहाय्याचा गैरवापर होतो आहे का, यासह तब्बल ११ मुद्द्यांच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात येणार आहे.या समितीतील अन्य सदस्यांमध्ये साखर संचालक (प्रशासन) शैलेश कोतमिरे, प्रादेशिक सहसंचालक (कोल्हापूर) सचिन रावळ, सहसंचालक साखर (प्रशासन) राजेश सुरवसे आणि सहसंचालक साखर (अर्थ) मंगेश तिटकारे यांचा समावेश आहे.राज्यात सुमारे दोन लाख सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्यांची सभासदसंख्या सुमारे साडेपाच कोटी आहे. या क्षेत्राचे खेळते भांडवल सुमारे सहा लाख कोटी रुपये आहे. या संस्थांमध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बॅँका, सहकारी बॅँका सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, यंत्रमाग सहकारी संस्था सहकारी कृषी पणन व प्रक्रिया संस्था, सहकारी ग्राहक संस्था, नागरी, ग्रामीण बिगर शेतकरी पतसंस्था, सहकारी दूध उत्पादक संघ, औद्योगिक सहकारी संस्था आदींचा समावेश आहे. यातील काही प्रमुख संस्थांच्या कामकाजाचे योग्य मूल्यांकन करणे आणि गुणात्मक सुधारणा करण्यासाठी उपाय योजना सुचविणे असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसारच राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कामकाजाचे मुल्यमापन करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. असे राज्य सरकारने यासंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.या समितीने संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाची पुर्तता कितपत झाली आहे?, संस्थांचे उद्देश साध्य करण्यात आलेल्या अडी-अडचणी व त्या सोडविण्यासाठी करावयाची उपायोजना, संस्थांना दिलेले शासकीय अर्थसहाय्य, त्याचा विनियोग व आतापर्यंत झालेली वसुली, संस्थांनी केलेले उल्लेखनीय कामकाज,सभासदांच्या आर्थिक उन्नतीत संस्थेचे योगदान, संस्थामुळे झालेली रोजगार निर्मिती, संस्थांच्या कामकाजात आढळून आलेल्या त्रुटी, अनियमितता व गैरव्यवहार, त्या प्रकरणात विभागाने केलेली कारवाई, अवसायनात गेलेल्या संस्थांचे पुनर्जिवन करण्यासाठी उपाययोजना, संस्थांच्या कामकाजात गुणात्मक वाढ होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, सहकार चळवळीच्या व्यापक हिताच्या दृष्टीने शासन स्तरावर करावयाचे धोरणात्मक निर्णय. या ११ मुद्यांच्या आधारे हे मुल्यमापन करावयाचे आहे.विरोधकांच्या बलस्थानांवरच ‘घाव’चा डाव?राज्यात सुमारे १७५ सहकारी साखर कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने बंद आहेत. गैरप्रकारांमुळे काही कारखाने अडचणीत आले आहेत. यंदाच्या हंगामात राज्यात सुरू असलेल्या १८७ कारखान्यांमध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या ११० च्या आसपास होती. वरकरणी या समितीमागचा शासनाचा हेतू चांगला वाटत असला तरी सध्या राज्यात भाजपविरोधी वातावरण होऊ लागले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सन २०१९ मध्ये होत आहेत. हे वातावरण मतात परिवर्तन होऊ नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे बलस्थान असलेल्या साखर कारखान्यांमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावायचे आणि विरोधकांचे खच्चीकरण करावयाचे हा डाव ही समिती स्थापन्यामागे असल्याचे मानले जात आहे.