शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

सभापती निवडीत विधानसभेचे ‘गणित’

By admin | Updated: October 8, 2014 00:29 IST

जिल्हा परिषद : राधानगरी, शिरोळ, हातकणंगलेतील राजकारण

राजाराम लोंढे -कोल्हापूर -जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचे ‘गणित’ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘राधानगरी’मध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी अभिजित तायशेटे यांना पाठबळ दिले. किरण कांबळे हे प्रकाश आवाडे यांचे कार्यकर्ते असले तरी ते जयवंतराव आवळे यांच्या मतदारसंघात येतात. कांबळे यांना संधी देऊन बौद्ध समाजात चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. ‘स्वाभिमानी’मध्ये शिरोळच्या जागेवरून बंडाळी उडाली असल्याने अनिल मादनाईक यांना बाजूला करत मराठा समाजातील सीमा पाटील यांची वर्णी लावत खासदार राजू शेट्टी यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखविली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी निवडी करताना नेत्यांची पुरती दमछाक उडाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदे करवीर तालुक्यात घेतल्याने चार सभापतिपदे इतर तालुक्यांना द्यावी लागणार होती. त्यानुसार इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. रूकडीच्या प्रमोदिनी जाधव यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी जयवंतराव आवळे यांनी गेल्यावेळेला ताकद लावली होती. त्यामुळे महिला बालकल्याण सभापतीसाठी जाधव यांचे नाव आघाडीवरच होते, पण आवाडे-आवळे यांनी एकत्र येत किरण कांबळे यांना संधी दिली. जयवंतराव आवळे हे मातंग समाजाचे आहेत, त्यांचे विरोधक शिवसेनेचे सुजित मिणचेकर हे बौद्ध समाजाचे आहेत. गेल्या वेळेला जातीच्या समीकरणाचा मोठा फटका आवळे यांना बसला होता. त्यामुळे सभापती निवडीत किरण कांबळे यांना संधी देत बौद्ध समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न आवळे यांनी केला.शिक्षण सभापतिपदासाठी तायशेटे यांचे नाव अचानक पुढे आले असले तरी यामागेही राधानगरीचे राजकारण आहे. तायशेटे यांच्यासाठी काँग्रेसमध्ये काठावर असलेल्या सात सदस्यांनी प्रयत्न केले. त्यातच तायशेटे हे राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांनी तायशेटे यांचे नाव निश्चित केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये शिरोळच्या उमेदवारीवरून बंड झाले. उल्हास पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत जातीचे गणित मांडत रिंगणात उडी घेतली आहे. लिंगायत, जैन विरोधात मराठा अशीच लढत येथे होत आहे. त्यामुळेच अनिल मादनाईक यांना बाजूला करत सीमा पाटील यांना संधी देत मराठा समाजाला खूश करण्याची मुत्सद्देगिरी शेट्टी यांनी दाखविली आहे. ं‘सा. रे.’ आक्रमक !आमदार सा. रे. पाटील यांनी विकास कांबळे यांच्यासाठी आपली ताकद लावली होती. पण आवाडे-आवळे यांच्या मनोमिलनामुळे कांबळे यांचे नाव मागे पडले तरीही आमदार पाटील हे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे थेट आमदार पाटील यांच्याशी बोलले. अखेर पी. एन. पाटील यांनी काँग्रेस कमिटीत येऊन पाटील यांची समजूत काढल्यानंतर ते शांत झाले. शेती अधिकारी ते सभापती !किरण कांबळे हे हुपरी येथील जवाहर साखर कारखान्यात ‘शेती अधिकारी’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मागे कोणताही राजकीय वारसा नसताना ते पहिल्यांदाच जिल्हा परिषद सदस्य झाले आणि अडीच वर्षांत त्यांना थेट समाजकल्याण सभापतिपदाची संधी मिळाली.