शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गडकोट संवर्धनासाठी शासनाला जाब विचारणार

By admin | Updated: May 22, 2015 00:55 IST

युवराज संभाजीराजे यांचे प्रतिपादन : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची नियोजन बैठक

कोल्हापूर : गडकोट संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. वेळीच राज्य शासनाने गडकोट किल्ल्यांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास शासनाला रोखठोक जाब विचारू, असे प्रतिपादन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्ग रायगड येथे ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा, तुळजाभवानी मंडप येथे आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो राष्ट्रीय सण आणि लोकोत्सव व्हावा. याकरिता सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मावळ्यांनी स्वयंशिस्त पाळावी. राज्यातील गडकोट संवर्धन होणेही तितकेच गरजेचे आहे. कारण हा इतिहास जर आजच्या पिढीला कळला नाही तर महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. हे विचार पोहोचण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा हे निमित्त आहे. राज्यातील गडकोटांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.कधी केंद्र शासनाकडे बोट दाखवायचे, तर कधी पुरातत्त्व खात्याचे भूत उभे करायचे, असा प्रकार करीत घोर फसवणूक केली आहे. यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही. गडकोट संवर्धनासाठी राज्यातील सर्व दुर्गप्रेमी संस्था, व्यक्ती यांना एकत्रित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच शासनाला याबाबत रोखठोक जाब विचारला जाईल. औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या पत्नीच्या मकबऱ्याचा ३९ वेळा जीर्णोद्वार करण्यात आला आहे; तर शिवरायांच्या समाधीचा केवळ दोन वेळाच जीर्णोद्वार करण्यात आला आहे. असा दुजाभाव शासनाने केला आहे. याकरिता मुंबई, पुणे, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद, विदर्भ, आदी ठिकाणच्या संस्था प्रतिनिधींची समिती स्थापून सरकारवर दबावगट निर्माण केला जाईल. शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून मला केवळ मराठ्यांचे नेतृत्व करायचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेतृत्व करायचे आहे. शिवराज्याभिषेक समितीच्या नूतन अध्यक्षपदी सागर यादव यांची निवड संभाजीराजे यांनी केली. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, फत्तेसिंह सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, नगरसेवक विनायक फाळके, ‘छावा’चे राजू सावंत, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, संपतराव चव्हाण, राजू मेवेकरी, आदी उपस्थित होते.