शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

गडकोट संवर्धनासाठी शासनाला जाब विचारणार

By admin | Updated: May 22, 2015 00:55 IST

युवराज संभाजीराजे यांचे प्रतिपादन : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची नियोजन बैठक

कोल्हापूर : गडकोट संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. वेळीच राज्य शासनाने गडकोट किल्ल्यांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास शासनाला रोखठोक जाब विचारू, असे प्रतिपादन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्ग रायगड येथे ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा, तुळजाभवानी मंडप येथे आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो राष्ट्रीय सण आणि लोकोत्सव व्हावा. याकरिता सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मावळ्यांनी स्वयंशिस्त पाळावी. राज्यातील गडकोट संवर्धन होणेही तितकेच गरजेचे आहे. कारण हा इतिहास जर आजच्या पिढीला कळला नाही तर महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. हे विचार पोहोचण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा हे निमित्त आहे. राज्यातील गडकोटांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.कधी केंद्र शासनाकडे बोट दाखवायचे, तर कधी पुरातत्त्व खात्याचे भूत उभे करायचे, असा प्रकार करीत घोर फसवणूक केली आहे. यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही. गडकोट संवर्धनासाठी राज्यातील सर्व दुर्गप्रेमी संस्था, व्यक्ती यांना एकत्रित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच शासनाला याबाबत रोखठोक जाब विचारला जाईल. औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या पत्नीच्या मकबऱ्याचा ३९ वेळा जीर्णोद्वार करण्यात आला आहे; तर शिवरायांच्या समाधीचा केवळ दोन वेळाच जीर्णोद्वार करण्यात आला आहे. असा दुजाभाव शासनाने केला आहे. याकरिता मुंबई, पुणे, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद, विदर्भ, आदी ठिकाणच्या संस्था प्रतिनिधींची समिती स्थापून सरकारवर दबावगट निर्माण केला जाईल. शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून मला केवळ मराठ्यांचे नेतृत्व करायचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेतृत्व करायचे आहे. शिवराज्याभिषेक समितीच्या नूतन अध्यक्षपदी सागर यादव यांची निवड संभाजीराजे यांनी केली. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, फत्तेसिंह सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, नगरसेवक विनायक फाळके, ‘छावा’चे राजू सावंत, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, संपतराव चव्हाण, राजू मेवेकरी, आदी उपस्थित होते.