शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

बहुगुणी तुळशीसह अश्वगंधा, रोपांच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून दूर राहण्याकरिता नागरिक ॲलोपॅथी औषधांसह आयुर्वेदिक काढे आणि चूर्णालाही प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यात रोपवाटिकांमधून ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून दूर राहण्याकरिता नागरिक ॲलोपॅथी औषधांसह आयुर्वेदिक काढे आणि चूर्णालाही प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यात रोपवाटिकांमधून बहुगुणी तुळस, अश्वगंधा, गवती चहा, गुडुची, पिंपळी, कोरफड, ब्राह्मी, केविया, शतावरी आदी रोपांच्या मागणीत वाढ झाली आहे. दिवसाकाठी हजारो रोपे घरी लावण्यासाठी स्वत:हून नेऊ लागली आहेत. त्यामुळे शुद्ध हवेबरोबर आयुर्वेदिक काढ्यांमुळे माणसांचा श्वास मोकळा तर होतोच आहे. या शिवाय हवेतून शुद्ध ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाणही वाढण्यास मदत होऊ लागली आहे.

कोरोनाचा विषाणू फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. त्यामुळे श्वसन व्यवस्था सुधारली तरच कोरोना संसर्गापासून माणसांची सुटका होते. या सर्वांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदात तुळसीला सर्वाधिक महत्त्व आहे. यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत. याचे तेल एक जैव प्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते. त्यामुळे याचा वापर विविध आजारांवर केला जातो. म्हणूनच घरगुती उपचारांमध्ये अंगणातील तुळस म्हणजे औषधांचे भांडार समजले जाते. सर्दी, खोकला, ताप, दातदुखी, श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुप्फुसाचे रोग, हृदयरोग हे सर्व रोग पळवून लावण्यासाठी तुळसीचा वापर केला जातो. तुळस पानाचंचे दोन थेंब पाण्यात टाकल्यास पाणी निर्जंतुक होते. पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनतंत्रातील जीवाणूंचे संक्रमण कमी होते. घरासमोरील अंगणात तुळस असल्यास घरातील हवा शुद्ध होेते. यासोबतच अश्वगंधा, गवती चहा, कोरफड, पिप्पली, गुडुची, आवळा, ब्राह्मी, केविया, आदी आयुर्वेदिक वनस्पती रोपांनाही मागणी वाढली आहे. दरही अगदी २० ते ५० रुपयांपर्यंत प्रती रोप आहेत.

चौकट

अश्वगंधा : या वनस्पतीच्या सेवनाने घोड्यासारखा उत्साह व वाजी शक्ती अंगामध्ये येते. म्हणूनच हिला अश्वगंधा असे म्हटले जाते. कोरोना संसर्गातही कफ, वात विकारावर ही बहुगुणी मानली जाते.

आमलकी (आवळा) : आवळा हा त्रिदोषहर, कफ, हृदय, यकृत उत्तेजक, दीपनीय आहे. भरपूर जीवनसत्त्वे यात आहेत.

पिप्पली-कटू रसात्मक, अनुष्ण शीत असलेली पिंपळी ही कास, श्वास, राजयक्ष्मामध्ये उपयुक्त आहे. आम, कफ, मेद यांचे पाचन करून रसायन म्हणून ही कार्य करते.

गुडुची : ही वनस्पती त्रिदोषनाशक, ज्वरघन असून एक श्रेष्ठ रसायन म्हणून मानवी शरीरास उपयोगी आहे.

गवती चहा : मुख्यत हा झुडपांच्या पानांपासून मिळणारा तृण वनस्पती आहे. तिचा वापर करून चहा घेतला तर ताजेतवाने व आळस निघून जातो.

शतावरी : मधुर-तिक्त रसात्मक व शीतवीर्य असलेली शतावरी ॲन्टी ऑक्सिडंट म्हणून काम करते.

कोट

अश्वगंधा, गवती चहा, कोरफड, पिप्पली, गुडुची, शतावरी, आवळा, ब्राह्मी आदी आयुर्वेदिक वनस्पती बहुगुणी आहेत. याशिवाय नैसर्गिकरित्या वायूचे शुद्धीकरण करतात. असंख्य प्राणवायू शोषून घेतात. जास्त प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करतात. कोरोनाच्या काळात या वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

डाॅ. अजित राजिगरे, एम.डी. आयुर्वेदाचार्य

कोट

कोरोना काळात तुळस, अश्वगंधा, ब्राह्मी, गवती चहा, कोरफड, इन्शुलन, ओवा, आदी रोपांना मागणी वाढली आहे. यापूर्वी कार्यक्रमांमध्ये रोप वाटावे लागत होते. आता स्वत: हून अनेक मंडळी ही रोपे विकत घेत आहेत.

रोहित शिंदे, रोपवाटिका चालक