शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बहुगुणी तुळशीसह अश्वगंधा, रोपांच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून दूर राहण्याकरिता नागरिक ॲलोपॅथी औषधांसह आयुर्वेदिक काढे आणि चूर्णालाही प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यात रोपवाटिकांमधून ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून दूर राहण्याकरिता नागरिक ॲलोपॅथी औषधांसह आयुर्वेदिक काढे आणि चूर्णालाही प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यात रोपवाटिकांमधून बहुगुणी तुळस, अश्वगंधा, गवती चहा, गुडुची, पिंपळी, कोरफड, ब्राह्मी, केविया, शतावरी आदी रोपांच्या मागणीत वाढ झाली आहे. दिवसाकाठी हजारो रोपे घरी लावण्यासाठी स्वत:हून नेऊ लागली आहेत. त्यामुळे शुद्ध हवेबरोबर आयुर्वेदिक काढ्यांमुळे माणसांचा श्वास मोकळा तर होतोच आहे. या शिवाय हवेतून शुद्ध ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाणही वाढण्यास मदत होऊ लागली आहे.

कोरोनाचा विषाणू फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. त्यामुळे श्वसन व्यवस्था सुधारली तरच कोरोना संसर्गापासून माणसांची सुटका होते. या सर्वांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदात तुळसीला सर्वाधिक महत्त्व आहे. यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत. याचे तेल एक जैव प्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते. त्यामुळे याचा वापर विविध आजारांवर केला जातो. म्हणूनच घरगुती उपचारांमध्ये अंगणातील तुळस म्हणजे औषधांचे भांडार समजले जाते. सर्दी, खोकला, ताप, दातदुखी, श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुप्फुसाचे रोग, हृदयरोग हे सर्व रोग पळवून लावण्यासाठी तुळसीचा वापर केला जातो. तुळस पानाचंचे दोन थेंब पाण्यात टाकल्यास पाणी निर्जंतुक होते. पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनतंत्रातील जीवाणूंचे संक्रमण कमी होते. घरासमोरील अंगणात तुळस असल्यास घरातील हवा शुद्ध होेते. यासोबतच अश्वगंधा, गवती चहा, कोरफड, पिप्पली, गुडुची, आवळा, ब्राह्मी, केविया, आदी आयुर्वेदिक वनस्पती रोपांनाही मागणी वाढली आहे. दरही अगदी २० ते ५० रुपयांपर्यंत प्रती रोप आहेत.

चौकट

अश्वगंधा : या वनस्पतीच्या सेवनाने घोड्यासारखा उत्साह व वाजी शक्ती अंगामध्ये येते. म्हणूनच हिला अश्वगंधा असे म्हटले जाते. कोरोना संसर्गातही कफ, वात विकारावर ही बहुगुणी मानली जाते.

आमलकी (आवळा) : आवळा हा त्रिदोषहर, कफ, हृदय, यकृत उत्तेजक, दीपनीय आहे. भरपूर जीवनसत्त्वे यात आहेत.

पिप्पली-कटू रसात्मक, अनुष्ण शीत असलेली पिंपळी ही कास, श्वास, राजयक्ष्मामध्ये उपयुक्त आहे. आम, कफ, मेद यांचे पाचन करून रसायन म्हणून ही कार्य करते.

गुडुची : ही वनस्पती त्रिदोषनाशक, ज्वरघन असून एक श्रेष्ठ रसायन म्हणून मानवी शरीरास उपयोगी आहे.

गवती चहा : मुख्यत हा झुडपांच्या पानांपासून मिळणारा तृण वनस्पती आहे. तिचा वापर करून चहा घेतला तर ताजेतवाने व आळस निघून जातो.

शतावरी : मधुर-तिक्त रसात्मक व शीतवीर्य असलेली शतावरी ॲन्टी ऑक्सिडंट म्हणून काम करते.

कोट

अश्वगंधा, गवती चहा, कोरफड, पिप्पली, गुडुची, शतावरी, आवळा, ब्राह्मी आदी आयुर्वेदिक वनस्पती बहुगुणी आहेत. याशिवाय नैसर्गिकरित्या वायूचे शुद्धीकरण करतात. असंख्य प्राणवायू शोषून घेतात. जास्त प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करतात. कोरोनाच्या काळात या वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

डाॅ. अजित राजिगरे, एम.डी. आयुर्वेदाचार्य

कोट

कोरोना काळात तुळस, अश्वगंधा, ब्राह्मी, गवती चहा, कोरफड, इन्शुलन, ओवा, आदी रोपांना मागणी वाढली आहे. यापूर्वी कार्यक्रमांमध्ये रोप वाटावे लागत होते. आता स्वत: हून अनेक मंडळी ही रोपे विकत घेत आहेत.

रोहित शिंदे, रोपवाटिका चालक