शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पशुपक्ष्यांचा तारणहार आशुतोष-

By admin | Updated: November 6, 2016 01:15 IST

- अवलिया

आशुतोषच्या मोबाईलची रिंग्ां वाजली की, समजायचे कुणाच्यातरी घरी किंवा अडगळीत साप नाही तर कुठेतरी पक्षी जखमी असणार. जणू याच कामासाठी तो मोबाईल वापरतो. क्षणाचाही विचार न करता गाडी काढायची आणि थेट ते ठिकाण गाठायचे. तेथे पोहोचताच त्या परिसराचा तो ताबाच घेतो. कारण त्या प्राणी वा पक्ष्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ द्यायची नाही, असा त्याचा अलिखित नियम आहे. मग त्या जीवाला अलगद ताब्यात घेऊन कुठे जखम वगैरे झाली असल्यास घरी अथवा डॉक्टरांकडे नेऊन त्याच्यावर उपचार करायचा. बरे झाल्याची खात्री करून दाजीपूर, पन्हाळ्यासारख्या अधिवासात त्याला सोडून यायचे. इतके जिवापाड प्रेम आशुतोष त्या जिवांवर करतो. यासाठीचा खर्च स्वत:च भागवितो. आतापर्यंत त्याने दोन ते अडीच हजार साप, वेगवेगळे पक्षी, प्राणी यांना जीवदान दिलेले आहे. नावात ‘तोष’ (आनंद) असणाऱ्या अवलियाने या कार्यात स्वत:ला झोकूनच दिले आहे. शिक्षण बी. कॉम.पर्यंत, झाले असले तरी रेडियम तसेच कॉम्प्युटरवर डिझाईनचे काम करतो. पशुपक्ष्यांच्या प्रेमापाटी त्याने नोकरीच्या बंधनात न अडकण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यासाठी जणू त्याने २४७७ पॅटर्न राबविला आहे. अनुभव कथन करताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता. दोन ते तीन वर्षांपूर्वी वाट चुकलेले सांबर रिग्ांरोडवर आले होते. हे समजताच ग्रुपसह तेथे पोहोचलो. पाहतो तर काय गर्दीमुळे पळून सांबराची दमछाक झाली होती. कसेबसे गर्दीला हटवून चोहोबाजूंनी घेरून त्याला पकडले. नंतर वैद्यकीय उपचारासाठी नेले, पण दवाखान्यात त्याचा दमछाकीमुळे मृत्यू झाला. आपल्या प्रयत्नांना यश न आल्याने खूपच दु:खी झालो.असेच एकदा लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलजवळ असलेल्या मोठ्या झाडावर वटवाघूळ पतंगाच्या नायलॉन दोऱ्यात अडकून फसले होते. तीन दिवसांनी ते नजरेस पडले. अडचणीमुळे त्या झाडावर चढणे आव्हानात्मक होते, पण त्याला वाचवायचे या निश्चयावर ठाम असल्यामुळे अग्निशामन दलाच्या साहाय्याने प्रयत्नांची पराकष्ठा करून वटवाघळापर्यंत पोहोचलो. त्याला अलगद खाली उतरविले. उपाशीपोटी राहिल्यामुळे त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते. त्याला प्रथम खायला घातले आणि दुसऱ्या दिवशी छोटेसे आॅपरेशन करून त्याला त्या दोऱ्यातून मुक्त केले. पूर्णत: बरे झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. रजपूतवाडीत गेल्यावर्षी थरारक अनुभव आला. एका घराच्या परसात धामीण असल्याचे समजले. तातडीने तेथे पोहोचलो. तोपर्यंत ती धामीण जळणासाठी ठेवलेल्या लाकडात शिरली. एक एक लाकूड बाजूला काढेल तसे ती पुढे सरकू लागली. तिला पकडणे अवघड झाले. तरी तिची शेपूट धरली, पण तिने लाकडाला वेटोळे घातल्यामुळे ताकद अपुरी पडू लागली. तिला इजा होऊ नये म्हणून सोडताच तारेच्या कुंपणापलीकडे तिने धाव घेतली. त्या सरशी तिला पकडताना मी त्या कुंपणावर जाऊन आदळलो. जखमी अवस्थेत तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण सुमारे नऊ फूट असलेल्या धामीणीची ताकदही खूप होती. शेवटी ती एका बिळात शिरली. तरीही हार न मानता धोका पत्करून तिला पकडले व पन्हाळ्यावर झाडीत सोडून दिले. पशुपक्ष्यांवरील जिवापाड प्रेमापोटी पहिल्याच हाकेला ओ देणाऱ्या या अवलियास सर्पमित्र म्हणून कोल्हापूरसह परिसर ओळखतो. गेली १0 ते १५ वर्षे तो या कार्यात सक्रिय आहे. लहानपणी ट्रेकिंगला गेल्यामुळे प्राणी, पक्ष्यांशी ओढ निर्माण झाल्याचे तो सांगतो. त्याने जीवदान दिलेल्यांमध्ये घुबड, घार, बामणी घार, कापशी घार, पॅराडाईज फ्लाय कॅचर, स्वॉलो बर्ड, कबूतर, पोपट, वटवाघूळ, बगळे, ससा, साप आदींचा समावेश आहे. बेडकांवरील अभ्यास करण्यास खूपच आवड असल्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून त्यांची तो माहिती घेतो. आंबोली हे ठिकाण बेडकांसाठी प्रसिद्ध असल्यामुळे तेथेही जाऊन त्यांचा तो अभ्यास करतो.देवेंद्र भोसले, करण भोसले, शरद जाधव, विशाल शिंदे, रवी सूर्यवंशी, नितीन ऐतवडेकर आणि अभिजित शिंदे हे त्याच्या ग्रुपचे सदस्य आहेत. साताऱ्याचे डॉ. अमित सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्य करत आहेत. जखमी पक्षी, सापांवर उपचार करण्यासाठी कोल्हापुरातील डॉ. संजय बागल हे नेहमीच मदत करतात.आशुतोष विजय सूर्यवंशी -- अवलिया- भरत बुटाले, --कोल्हापूर.