शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पशुपक्ष्यांचा तारणहार आशुतोष-

By admin | Updated: November 6, 2016 01:15 IST

- अवलिया

आशुतोषच्या मोबाईलची रिंग्ां वाजली की, समजायचे कुणाच्यातरी घरी किंवा अडगळीत साप नाही तर कुठेतरी पक्षी जखमी असणार. जणू याच कामासाठी तो मोबाईल वापरतो. क्षणाचाही विचार न करता गाडी काढायची आणि थेट ते ठिकाण गाठायचे. तेथे पोहोचताच त्या परिसराचा तो ताबाच घेतो. कारण त्या प्राणी वा पक्ष्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ द्यायची नाही, असा त्याचा अलिखित नियम आहे. मग त्या जीवाला अलगद ताब्यात घेऊन कुठे जखम वगैरे झाली असल्यास घरी अथवा डॉक्टरांकडे नेऊन त्याच्यावर उपचार करायचा. बरे झाल्याची खात्री करून दाजीपूर, पन्हाळ्यासारख्या अधिवासात त्याला सोडून यायचे. इतके जिवापाड प्रेम आशुतोष त्या जिवांवर करतो. यासाठीचा खर्च स्वत:च भागवितो. आतापर्यंत त्याने दोन ते अडीच हजार साप, वेगवेगळे पक्षी, प्राणी यांना जीवदान दिलेले आहे. नावात ‘तोष’ (आनंद) असणाऱ्या अवलियाने या कार्यात स्वत:ला झोकूनच दिले आहे. शिक्षण बी. कॉम.पर्यंत, झाले असले तरी रेडियम तसेच कॉम्प्युटरवर डिझाईनचे काम करतो. पशुपक्ष्यांच्या प्रेमापाटी त्याने नोकरीच्या बंधनात न अडकण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यासाठी जणू त्याने २४७७ पॅटर्न राबविला आहे. अनुभव कथन करताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता. दोन ते तीन वर्षांपूर्वी वाट चुकलेले सांबर रिग्ांरोडवर आले होते. हे समजताच ग्रुपसह तेथे पोहोचलो. पाहतो तर काय गर्दीमुळे पळून सांबराची दमछाक झाली होती. कसेबसे गर्दीला हटवून चोहोबाजूंनी घेरून त्याला पकडले. नंतर वैद्यकीय उपचारासाठी नेले, पण दवाखान्यात त्याचा दमछाकीमुळे मृत्यू झाला. आपल्या प्रयत्नांना यश न आल्याने खूपच दु:खी झालो.असेच एकदा लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलजवळ असलेल्या मोठ्या झाडावर वटवाघूळ पतंगाच्या नायलॉन दोऱ्यात अडकून फसले होते. तीन दिवसांनी ते नजरेस पडले. अडचणीमुळे त्या झाडावर चढणे आव्हानात्मक होते, पण त्याला वाचवायचे या निश्चयावर ठाम असल्यामुळे अग्निशामन दलाच्या साहाय्याने प्रयत्नांची पराकष्ठा करून वटवाघळापर्यंत पोहोचलो. त्याला अलगद खाली उतरविले. उपाशीपोटी राहिल्यामुळे त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते. त्याला प्रथम खायला घातले आणि दुसऱ्या दिवशी छोटेसे आॅपरेशन करून त्याला त्या दोऱ्यातून मुक्त केले. पूर्णत: बरे झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. रजपूतवाडीत गेल्यावर्षी थरारक अनुभव आला. एका घराच्या परसात धामीण असल्याचे समजले. तातडीने तेथे पोहोचलो. तोपर्यंत ती धामीण जळणासाठी ठेवलेल्या लाकडात शिरली. एक एक लाकूड बाजूला काढेल तसे ती पुढे सरकू लागली. तिला पकडणे अवघड झाले. तरी तिची शेपूट धरली, पण तिने लाकडाला वेटोळे घातल्यामुळे ताकद अपुरी पडू लागली. तिला इजा होऊ नये म्हणून सोडताच तारेच्या कुंपणापलीकडे तिने धाव घेतली. त्या सरशी तिला पकडताना मी त्या कुंपणावर जाऊन आदळलो. जखमी अवस्थेत तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण सुमारे नऊ फूट असलेल्या धामीणीची ताकदही खूप होती. शेवटी ती एका बिळात शिरली. तरीही हार न मानता धोका पत्करून तिला पकडले व पन्हाळ्यावर झाडीत सोडून दिले. पशुपक्ष्यांवरील जिवापाड प्रेमापोटी पहिल्याच हाकेला ओ देणाऱ्या या अवलियास सर्पमित्र म्हणून कोल्हापूरसह परिसर ओळखतो. गेली १0 ते १५ वर्षे तो या कार्यात सक्रिय आहे. लहानपणी ट्रेकिंगला गेल्यामुळे प्राणी, पक्ष्यांशी ओढ निर्माण झाल्याचे तो सांगतो. त्याने जीवदान दिलेल्यांमध्ये घुबड, घार, बामणी घार, कापशी घार, पॅराडाईज फ्लाय कॅचर, स्वॉलो बर्ड, कबूतर, पोपट, वटवाघूळ, बगळे, ससा, साप आदींचा समावेश आहे. बेडकांवरील अभ्यास करण्यास खूपच आवड असल्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून त्यांची तो माहिती घेतो. आंबोली हे ठिकाण बेडकांसाठी प्रसिद्ध असल्यामुळे तेथेही जाऊन त्यांचा तो अभ्यास करतो.देवेंद्र भोसले, करण भोसले, शरद जाधव, विशाल शिंदे, रवी सूर्यवंशी, नितीन ऐतवडेकर आणि अभिजित शिंदे हे त्याच्या ग्रुपचे सदस्य आहेत. साताऱ्याचे डॉ. अमित सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्य करत आहेत. जखमी पक्षी, सापांवर उपचार करण्यासाठी कोल्हापुरातील डॉ. संजय बागल हे नेहमीच मदत करतात.आशुतोष विजय सूर्यवंशी -- अवलिया- भरत बुटाले, --कोल्हापूर.