शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईत १८ ते २० फेब्रुवारीस जागतिक गुंतवणूक परिषद अशोक चव्हाण : राज्यातील गुंतवणुकीला देणार चालना ; जिल्ह्यातील उद्योजकांना सहभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:58 IST

कोल्हापूर : राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मुंबईत १८ ते २० फेब्रुवारीला ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०’ या स्पर्धेचेही आयोजन केले

कोल्हापूर : राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मुंबईत १८ ते २० फेब्रुवारीला ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०’ या स्पर्धेचेही आयोजन केले आहे. या परिषदेस तसेच स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि नवउद्योजकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केले आहे.

राज्यात गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने यावर्षातील पहिली मोठी आर्थिक झेप घेत राज्यातील पहिल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स २०१८’ या जागतिक गुंतवणूक परिषदेची घोषणा केली आहे. अत्याधुनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी तसेच, पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंडवर ही परिषद होत आहे. ही पहिलीच तीन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषद रोजगार, शाश्वतता, पायाभूत सोयी-सुविधा आणि भविष्यकालीन उद्योग या चार मुख्य स्तंभांवर आधारलेली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

जागतिक गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून, ‘महाराष्ट्राची भारतातील सर्व औद्योगिक गुंतवणुकीचे प्रवेशद्वार’ ही ओळख आणखी भक्कम करण्याचा सरकारचा हेतू आहे.‘मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स २०१८’ या उपक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तीनदिवसीय परिषदेत संवादात्मक परिषदा, चर्चासत्रे, सीईओ राऊंड टेबल परिषदा, बी टू बी आणि बी टू जी बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.५० लाखांचे बक्षीस..‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्टअप अंडर ३०’ या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या व्यावसायिकाला बक्षीस म्हणून ५० लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार असून द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे ३० लाख व २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.वित्त वर्षात यात आणखी ९.४ टक्के वाढ होण्यासाठी प्रयत्न.या वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४५.४२ टक्के एकूण परकीय गुंतवणूक.महाराष्ट्र ही भारताची आर्थिक राजधानी.मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून भारताची उत्पादन व व्यापार राजधानी बनविण्याचे प्रयत्न.