शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

‘साहित्य अकादमी’चे पान, कोल्हापूरच्या लेखकांनीच मिरवला सर्वाधिक मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:01 IST

कोल्हापूरच्या याच रांगड्या भाषेने मराठी साहित्य विश्वातही मोलाची भर घातली

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की दुधाची, कुस्तीची पंढरी... नद्यांचा सुपीक प्रदेश असलेल्या या तांबड्या मातीत रानाला इंगळी डसावी असे तर्रारून आलेले उसाचे फड हीच या मातीची सांगितली जाणारी ओळख. पण, कोल्हापूरच्या याच रांगड्या भाषेने मराठी साहित्य विश्वातही मोलाची भर घातली आहे. मराठी साहित्यातले तब्बल आठ मानाचे साहित्य अकादमी पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यकांनी पटकाविले आहेत. राज्यात इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. वि. स. खांडेकर यांच्यापासून ते बुधवारी जाहीर झालेल्या कृष्णात खोत यांच्यापर्यंतचा साहित्य अकादमीचा हा प्रवास कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्याला सुवर्णझळाळी देणारा ठरला आहे. विशेष म्हणजे एक अपवाद वगळता जिल्ह्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांना त्यांच्या कादंबरी याच साहित्यप्रकाराला हा पुरस्कार मिळाला आहे.साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकवर्ष - लेखकाचे नाव - साहित्यकृतीचे नाव१९६० - वि. स. खांडेकर - ययाती१९६४ - रणजित देसाई - स्वामी१९९० - आनंद यादव - झोंबी१९९२ - विश्वास पाटील - झाडाझडती२००१- राजन गवस - तणकट२००७ - गो. मा. पवार - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र)२०२१- किरण गुरव - बाळूच्या अवस्थंतराची डायरी२०२३ - कृष्णात खोत - रिंगाण

शांतीनाथ देसाई यांनाही पुरस्कारशिवाजी विद्यापीठात कार्यरत असलेले शांतीनाथ देसाई यांच्या ‘ओम नमो ओम’ या कन्नड भाषेतील कादंबरीला २००० साली मरणोत्तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तर अर्धे आयुष्य कोल्हापुरात व्यतीत केलेल्या विजया राजाध्यक्ष यांना १९९३ साली ‘मर्ढेकरांची कविता’ या समीक्षाला साहित्य अकादमी मिळाला होता.

माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील अंतरंग उलगडणारी मराठी साहित्यातील रिंगाण ही उत्तमातील उत्तम कादंबरी आहे. तिला पुरस्कार मिळणे अपेक्षित होतेच. कृष्णात खोत यांचे अभिनंदन. - राजन गवस, ज्येष्ठ लेखक. 

कृष्णात खोत यांनी धरणग्रस्तांचे नवे भावविश्व वेगळ्या पद्धतीने मांडले आहे. त्यांच्या कादंबरीला मिळालेला हा पुरस्कार कोल्हापूरच्या साहित्यक्षेत्राचा गौरव आहे. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रसिद्ध समीक्षक.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कार