शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

‘साहित्य अकादमी’चे पान, कोल्हापूरच्या लेखकांनीच मिरवला सर्वाधिक मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:01 IST

कोल्हापूरच्या याच रांगड्या भाषेने मराठी साहित्य विश्वातही मोलाची भर घातली

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की दुधाची, कुस्तीची पंढरी... नद्यांचा सुपीक प्रदेश असलेल्या या तांबड्या मातीत रानाला इंगळी डसावी असे तर्रारून आलेले उसाचे फड हीच या मातीची सांगितली जाणारी ओळख. पण, कोल्हापूरच्या याच रांगड्या भाषेने मराठी साहित्य विश्वातही मोलाची भर घातली आहे. मराठी साहित्यातले तब्बल आठ मानाचे साहित्य अकादमी पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यकांनी पटकाविले आहेत. राज्यात इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. वि. स. खांडेकर यांच्यापासून ते बुधवारी जाहीर झालेल्या कृष्णात खोत यांच्यापर्यंतचा साहित्य अकादमीचा हा प्रवास कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्याला सुवर्णझळाळी देणारा ठरला आहे. विशेष म्हणजे एक अपवाद वगळता जिल्ह्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांना त्यांच्या कादंबरी याच साहित्यप्रकाराला हा पुरस्कार मिळाला आहे.साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकवर्ष - लेखकाचे नाव - साहित्यकृतीचे नाव१९६० - वि. स. खांडेकर - ययाती१९६४ - रणजित देसाई - स्वामी१९९० - आनंद यादव - झोंबी१९९२ - विश्वास पाटील - झाडाझडती२००१- राजन गवस - तणकट२००७ - गो. मा. पवार - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र)२०२१- किरण गुरव - बाळूच्या अवस्थंतराची डायरी२०२३ - कृष्णात खोत - रिंगाण

शांतीनाथ देसाई यांनाही पुरस्कारशिवाजी विद्यापीठात कार्यरत असलेले शांतीनाथ देसाई यांच्या ‘ओम नमो ओम’ या कन्नड भाषेतील कादंबरीला २००० साली मरणोत्तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तर अर्धे आयुष्य कोल्हापुरात व्यतीत केलेल्या विजया राजाध्यक्ष यांना १९९३ साली ‘मर्ढेकरांची कविता’ या समीक्षाला साहित्य अकादमी मिळाला होता.

माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील अंतरंग उलगडणारी मराठी साहित्यातील रिंगाण ही उत्तमातील उत्तम कादंबरी आहे. तिला पुरस्कार मिळणे अपेक्षित होतेच. कृष्णात खोत यांचे अभिनंदन. - राजन गवस, ज्येष्ठ लेखक. 

कृष्णात खोत यांनी धरणग्रस्तांचे नवे भावविश्व वेगळ्या पद्धतीने मांडले आहे. त्यांच्या कादंबरीला मिळालेला हा पुरस्कार कोल्हापूरच्या साहित्यक्षेत्राचा गौरव आहे. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रसिद्ध समीक्षक.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कार