शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘वहिनी’ निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का?, अरुण दुधवडकरांचा निवेदिता मानेंना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 11:23 IST

लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला.

कोल्हापूर : विधानसभेसह जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेसोबत होत्या, मागे वळून बघितल्यानंतर कधी पळून गेला हे समजले नाही. ‘आजरा’ कारखान्याला कर्ज देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजेत आणि लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला. ज्येष्ठ होता म्हणून शिवसेनेच्या पॅनलमध्ये लढण्याची विनंती केली होती, मात्र तीन जागा निवडून आल्यानंतर मी शिवसेनेचीच सांगत, वहिनीसाहेब निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का? असा प्रश्नही त्यांनी निवेदिता माने यांना केला.

जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबीटकर यांच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, आपल्यातील बेएकीमुळे विधानसभेत पराभव झाला. आगामी काळात दोन्ही कॉग्रेसच्या प्रलोभनांना बळी पडू नका, व्यासपीठावरील प्रत्येकाने एक प्रभाग सांभाळला तर ‘मनपा’वर शिवसेनेची सत्ता येईल.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास ‘उत्तर’ची पोटनिवडणूक लढवू. माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, दोन्ही कॉग्रेसचा शिवसेना डॅमेज करण्याचा प्रयत्न असून, आमचा मुख्यमंत्री आहे म्हणून किती सहन करायचे. आता कोणाला जवळ करु नका, संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची लढाई करायची आहे. आपल्याकडे विकास संस्था किती याचे गणित घालत बसू नका, प्रचार सुरु करा. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील मोदी यांनी आभार मानले.

त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन माफी मागावी

बँकेच्या निवडणुकीत बाजूला गेलेल्यांनी पुन्हा यावे, असे सत्यजित पाटील यांनी सांगितले. वैभव उगले, कृष्णात पोवार म्हणाले, माफी मागायची असेल तर त्यांनी ‘मातोश्री’वर जावे.

‘क्रांतिसिंह’ थांबू नका, क्रांती होईल

पहिल्याच प्रयत्नात क्रांतिसिंह पवार यांनी विरोधकांना घाम फोडला. त्यांनी थांबू नये, एक दिवस क्रांती होईल, असे संजय पवार यांनी सांगितले.

रक्तातील शिवसेना गेली कोठे?

लोकसभा, विधानसभा आली की, ‘मातोश्री’चे उंबरे झिजवायचे, आमच्या रक्तात शिवसेना असल्याचे सांगायचे आणि गांधीबाबा दिसल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची. मग आता तुमच्या रक्तातील शिवसेना कोठे गेली, अशी विचारणा संजय पवार यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक