शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘वहिनी’ निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का?, अरुण दुधवडकरांचा निवेदिता मानेंना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 11:23 IST

लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला.

कोल्हापूर : विधानसभेसह जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेसोबत होत्या, मागे वळून बघितल्यानंतर कधी पळून गेला हे समजले नाही. ‘आजरा’ कारखान्याला कर्ज देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजेत आणि लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला. ज्येष्ठ होता म्हणून शिवसेनेच्या पॅनलमध्ये लढण्याची विनंती केली होती, मात्र तीन जागा निवडून आल्यानंतर मी शिवसेनेचीच सांगत, वहिनीसाहेब निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का? असा प्रश्नही त्यांनी निवेदिता माने यांना केला.

जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबीटकर यांच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, आपल्यातील बेएकीमुळे विधानसभेत पराभव झाला. आगामी काळात दोन्ही कॉग्रेसच्या प्रलोभनांना बळी पडू नका, व्यासपीठावरील प्रत्येकाने एक प्रभाग सांभाळला तर ‘मनपा’वर शिवसेनेची सत्ता येईल.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास ‘उत्तर’ची पोटनिवडणूक लढवू. माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, दोन्ही कॉग्रेसचा शिवसेना डॅमेज करण्याचा प्रयत्न असून, आमचा मुख्यमंत्री आहे म्हणून किती सहन करायचे. आता कोणाला जवळ करु नका, संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची लढाई करायची आहे. आपल्याकडे विकास संस्था किती याचे गणित घालत बसू नका, प्रचार सुरु करा. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील मोदी यांनी आभार मानले.

त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन माफी मागावी

बँकेच्या निवडणुकीत बाजूला गेलेल्यांनी पुन्हा यावे, असे सत्यजित पाटील यांनी सांगितले. वैभव उगले, कृष्णात पोवार म्हणाले, माफी मागायची असेल तर त्यांनी ‘मातोश्री’वर जावे.

‘क्रांतिसिंह’ थांबू नका, क्रांती होईल

पहिल्याच प्रयत्नात क्रांतिसिंह पवार यांनी विरोधकांना घाम फोडला. त्यांनी थांबू नये, एक दिवस क्रांती होईल, असे संजय पवार यांनी सांगितले.

रक्तातील शिवसेना गेली कोठे?

लोकसभा, विधानसभा आली की, ‘मातोश्री’चे उंबरे झिजवायचे, आमच्या रक्तात शिवसेना असल्याचे सांगायचे आणि गांधीबाबा दिसल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची. मग आता तुमच्या रक्तातील शिवसेना कोठे गेली, अशी विचारणा संजय पवार यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक