शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

‘वहिनी’ निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का?, अरुण दुधवडकरांचा निवेदिता मानेंना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 11:23 IST

लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला.

कोल्हापूर : विधानसभेसह जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेसोबत होत्या, मागे वळून बघितल्यानंतर कधी पळून गेला हे समजले नाही. ‘आजरा’ कारखान्याला कर्ज देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजेत आणि लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला. ज्येष्ठ होता म्हणून शिवसेनेच्या पॅनलमध्ये लढण्याची विनंती केली होती, मात्र तीन जागा निवडून आल्यानंतर मी शिवसेनेचीच सांगत, वहिनीसाहेब निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का? असा प्रश्नही त्यांनी निवेदिता माने यांना केला.

जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबीटकर यांच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, आपल्यातील बेएकीमुळे विधानसभेत पराभव झाला. आगामी काळात दोन्ही कॉग्रेसच्या प्रलोभनांना बळी पडू नका, व्यासपीठावरील प्रत्येकाने एक प्रभाग सांभाळला तर ‘मनपा’वर शिवसेनेची सत्ता येईल.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास ‘उत्तर’ची पोटनिवडणूक लढवू. माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, दोन्ही कॉग्रेसचा शिवसेना डॅमेज करण्याचा प्रयत्न असून, आमचा मुख्यमंत्री आहे म्हणून किती सहन करायचे. आता कोणाला जवळ करु नका, संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची लढाई करायची आहे. आपल्याकडे विकास संस्था किती याचे गणित घालत बसू नका, प्रचार सुरु करा. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील मोदी यांनी आभार मानले.

त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन माफी मागावी

बँकेच्या निवडणुकीत बाजूला गेलेल्यांनी पुन्हा यावे, असे सत्यजित पाटील यांनी सांगितले. वैभव उगले, कृष्णात पोवार म्हणाले, माफी मागायची असेल तर त्यांनी ‘मातोश्री’वर जावे.

‘क्रांतिसिंह’ थांबू नका, क्रांती होईल

पहिल्याच प्रयत्नात क्रांतिसिंह पवार यांनी विरोधकांना घाम फोडला. त्यांनी थांबू नये, एक दिवस क्रांती होईल, असे संजय पवार यांनी सांगितले.

रक्तातील शिवसेना गेली कोठे?

लोकसभा, विधानसभा आली की, ‘मातोश्री’चे उंबरे झिजवायचे, आमच्या रक्तात शिवसेना असल्याचे सांगायचे आणि गांधीबाबा दिसल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची. मग आता तुमच्या रक्तातील शिवसेना कोठे गेली, अशी विचारणा संजय पवार यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक