शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

‘वहिनी’ निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का?, अरुण दुधवडकरांचा निवेदिता मानेंना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 11:23 IST

लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला.

कोल्हापूर : विधानसभेसह जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेसोबत होत्या, मागे वळून बघितल्यानंतर कधी पळून गेला हे समजले नाही. ‘आजरा’ कारखान्याला कर्ज देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजेत आणि लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांना दिला. ज्येष्ठ होता म्हणून शिवसेनेच्या पॅनलमध्ये लढण्याची विनंती केली होती, मात्र तीन जागा निवडून आल्यानंतर मी शिवसेनेचीच सांगत, वहिनीसाहेब निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का? असा प्रश्नही त्यांनी निवेदिता माने यांना केला.

जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबीटकर यांच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, आपल्यातील बेएकीमुळे विधानसभेत पराभव झाला. आगामी काळात दोन्ही कॉग्रेसच्या प्रलोभनांना बळी पडू नका, व्यासपीठावरील प्रत्येकाने एक प्रभाग सांभाळला तर ‘मनपा’वर शिवसेनेची सत्ता येईल.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास ‘उत्तर’ची पोटनिवडणूक लढवू. माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, दोन्ही कॉग्रेसचा शिवसेना डॅमेज करण्याचा प्रयत्न असून, आमचा मुख्यमंत्री आहे म्हणून किती सहन करायचे. आता कोणाला जवळ करु नका, संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची लढाई करायची आहे. आपल्याकडे विकास संस्था किती याचे गणित घालत बसू नका, प्रचार सुरु करा. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील मोदी यांनी आभार मानले.

त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन माफी मागावी

बँकेच्या निवडणुकीत बाजूला गेलेल्यांनी पुन्हा यावे, असे सत्यजित पाटील यांनी सांगितले. वैभव उगले, कृष्णात पोवार म्हणाले, माफी मागायची असेल तर त्यांनी ‘मातोश्री’वर जावे.

‘क्रांतिसिंह’ थांबू नका, क्रांती होईल

पहिल्याच प्रयत्नात क्रांतिसिंह पवार यांनी विरोधकांना घाम फोडला. त्यांनी थांबू नये, एक दिवस क्रांती होईल, असे संजय पवार यांनी सांगितले.

रक्तातील शिवसेना गेली कोठे?

लोकसभा, विधानसभा आली की, ‘मातोश्री’चे उंबरे झिजवायचे, आमच्या रक्तात शिवसेना असल्याचे सांगायचे आणि गांधीबाबा दिसल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची. मग आता तुमच्या रक्तातील शिवसेना कोठे गेली, अशी विचारणा संजय पवार यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक