शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कलाकारांनी कलेचा आदर करावा : संभाजीराजे-राजा परांजपे महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:14 IST

कोल्हापूर : कला अवगत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यातून कलेची निर्मिती होते. त्यामुळे कलाकारांनी कलेचा आदर करावा. कोणापुढे झुकू नये, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी

ठळक मुद्देमापुस्कर, अवधूत गुप्ते, संजय नार्वेकर, निर्मिती सावंत यांना पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : कला अवगत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यातून कलेची निर्मिती होते. त्यामुळे कलाकारांनी कलेचा आदर करावा. कोणापुढे झुकू नये, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले.राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने नवव्या ‘राजा परांजपे महोत्सवा’चे उद्घाटन आणि ‘राजा परांजपे सन्मान पुरस्कार’ वितरण खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले; त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दिग्दर्शक राजेश मापुस्कर, अभिनेते संजय नार्वेकर, गायक अवधूत गुप्ते, अभिनेत्री निर्मिती सावंत यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर स्वाती यवलुजे प्रमुख उपस्थित होत्या. हा महोत्सव शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे.राजा परांजपे महोत्सव यंदा कोल्हापूर नगरीत घेऊन कलेचा सन्मान केला आहे, असे खासदार संभाजीराजे म्हणाले.महापौर स्वाती यवलुजे म्हणाल्या, कोल्हापूर हे कलेचे माहेरघर आहे. येथे अनेक कलाकारांनी कला जोपासण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. या कलेतूनच अनेक कलाकार निर्माण होऊन ते देशपातळीवर गाजत आहेत. राजा परांजपे प्रतिष्ठानचे अर्चना राणे आणि अजय राणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी राजा परांजपे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गुणीदास फौंडेशनचे शिरीष सप्रेही उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना अवधूत गुप्ते म्हणाले, कलेच्या नगरीत मिळणारा ‘राजा परांजपे पुरस्कार’ हा मला आॅस्करपेक्षाही मोठा सन्मान वाटतो. या पुरस्काराने आमची जबाबदारी वाढली असून, ती निभावण्याचा मी निश्चितच प्रयत्न करीन. संजय नार्वेकर म्हणाले, राजा परांजपे पुरस्काराने मला बळ मिळाले आहे. कोल्हापूरशी आणि येथील कलेशी आपले जुने नाते आहे.राजेश मापूस्कर म्हणाले, राजा परांजपे पुरस्कार हा इतर पुरस्कारांपेक्षा मोठा सन्मान वाटतो.माय मरो, मावशी जगोनिर्मिती सावंत यांनी कोल्हापूरचा ‘मावशी’ असा उल्लेख करताना ‘माय मरो, मावशी जगो’ अशा पातळीवर आपला कोल्हापूरशी संबंध असल्याचे सांगितले. याला प्रत्युत्तर देताना नार्वेकर यांनी, कोल्हापुरात कलेची कदर होते. मला माय-मावशी काही माहीत नाही; पण कोल्हापूर हे आमचे बाप आहे व आम्ही त्याची मुले आहोत; त्यामुळे कोल्हापूरच्या कलेने आम्हाला मुलाप्रमाणे सांभाळावे, अशी भावना व्यक्त केली.कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात शनिवारपासून राजा परांजपे महोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी खासदार संभाजीराजे आणि महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, निर्मिती सावंत, राजेश मापुस्कर यांना राजा परांजपे पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी अजय राणे, अर्चना राणे, शिरीष सप्रे उपस्थित होते.आज महोत्सवातचित्रपट : स. १० ते १२ वा.- जगाच्या पाठीवरदु. १ ते ३ वा. - गंगेत घोडं न्हालंनाटक : सायं. ५ ते ८ वा.- आम्ही मराठी (दोन अंकी नाटक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूक