शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गेल्या वर्षाच्या तुलनेत गूळाची आवक कमी

By admin | Updated: November 11, 2014 00:02 IST

पूर्ण क्षमतेने गुऱ्हाळघरे सुरू न झाल्यामुळे

कोल्हापूर : परतीच्या मॉन्सूनमुळे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची आवक गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. रोज पाच हजार, ३० किलो वजनाच्या रव्यांची आवक कमी होत आहे. दरही क्ंिवटलच्या मागे शंभर रुपयांनी कमी आहे. पूर्ण क्षमतेने गुऱ्हाळघरे सुरू न झाल्यामुळे आवक अपेक्षित होत नसल्याचे सांगण्यात आले.व्यापारी पीक असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कल ऊसपीक घेण्याकडे असतो. उसाला चांगला भाव असल्यास शेतकरी कारखान्यांना ऊस देतो. उसापेक्षा गुळाला अधिक भाव असल्यास काही शेतकरी गुऱ्हाळघरे सुरू करतात. सर्वसाधारणपणे आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात समितीमध्ये गुळाची आवक सुरू होते. गेल्यावर्षी १ ते ९ नोव्हेंबरमध्ये एकूण १ लाख ४८ हजार ५३ रव्यांची (३० किलो वजनाचे) आवक झाली होती. कमीत कमी २७०० पासून दर्जानुसार ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला होता. सरासरी क्विंटलला तीन हजार दोनशे रुपये भाव मिळाला होता. दिवसाला १५ ते २० हजार रवे गुळाची आवक होत होती. यंदा १ ते ९ नोव्हेंबरअखेर १ लाख ५५ हजार ६९८ रव्यांची आवक झाली. कमीत कमी २७०० पासून ५ हजार ५०० पर्यंत दर मिळाला. सरासरी दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल भाव राहिला. आॅक्टोबरमध्ये पडलेल्या परतीच्या मान्सूनमुळे आवक घटल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)