शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

तोतया पोलिसासह सराफाला अटक

By admin | Updated: June 12, 2016 01:34 IST

अनेकांची लूटमार : मोटारसायकलसह दोन लाखांचा ऐवज जप्त

कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून निर्जनस्थळी बसलेल्या प्रेमीयुगुलांना लुटणाऱ्या तोतया पोलिसास राजाराम तलाव परिसरात थरारक पाठलाग करून शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी पकडले. संशयित आरोपी कविराज हेमंत नाईक (वय ३०, रा. नारायणी बंगला, साळोखेनगर, देवकर पाणंद) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने घेतल्याप्रकरणी सराफ मयूर मदन पोतदार (२८, रा. देशपांडे गल्ली, खरी कॉर्नर) यालाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल, सोन्याचे दागिने, वेताची काठी, शिट्टी, महाराष्ट्र पोलिस असे किचेन असा सुमारे दोन लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत अधिक माहिती अशी, महाविद्यालयीन प्रेमीयुगुल कारमधून शिवाजी विद्यापीठाकडून मॅगडोनाल्डकडे जात असताना राजाराम तलाव येथे पाठीमागून पॅशन-प्रो मोटारसायकल (एमएच ०९, २११२) वरून काळ्या रंगाची सफारी घातलेल्या चालकाने शिट्टी मारून कार अडविली. यावेळी आपण विश्वास लोखंडे नावाचा पोलिस आहे. तुमचे ओळखपत्र दाखवा, तुम्ही कुठे निघाला, पोलिस स्टेशनला नेऊन तुमच्यावर गुन्हा दाखल करतो आणि वृत्तपत्रांत बातमी देतो, अशी भीती दाखवत त्यांना बाजूला घेतले. यावेळी तरुण-तरुणीच्या अंगावरील एक तोळ्याची चेन व अंगठी जबरदस्तीने काढून घेत तो माघारी निघून गेला. संबंधित तरुणाने याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची भेट घेऊन फिर्याद दिली. सापळा लावून अटक तरुणाने दिलेल्या वर्णनानुसार पोलिस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे, गौरव चौगले, सागर साळोखे यांनी शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तरुणाला सोबत घेऊन राजाराम तलाव परिसरात सापळा लावला. याठिकाणी मोटारसायकलवरून सफारी घातलेली एक व्यक्ती त्यांच्या नजरेस पडली. त्याच्या मागोमाग ते जाऊ लागले. तो विद्यापीठातून सरनोबतवाडी नाक्यापासून थेट राजाराम तलावाच्या दिशेने येत असताना त्याला कार नजरेस पडताच तो जवळ आला. यावेळी तरुणाने त्याच्याकडे बोट करून हाच तो असे म्हणताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप टाकली असता तो हिसडा मारून पळून जाऊ लागला. यावेळी थरारक पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. १४ जोडप्यांची लूटमार नाईक याने दीड वर्षात राजाराम तलाव, विद्यापीठ परिसर, उजळाईवाडी विमानतळ रोड, चित्रनगरी, शेंडा पार्क, भारती विद्यापीठ परिसर, आर. के.नगर, कात्यायनी, पन्हाळा, जोतिबा, आदी ठिकाणची निर्जन स्थळे व हॉटेल व लॉजवरील १४ प्रेमीयुगुल जोडप्यांकडून पैसे व सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली आहे. श्वान प्रशिक्षक ते तोतया पोलिस कविराज नाईक हा श्वान प्रशिक्षक आहे. त्याने दिल्लीहून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे सात कुत्री आणली होती. ती तिसऱ्या दिवशी आजाराने मृत झाली. त्यामुळे तो दिल्ली, मुंबई येथे खासगी सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करण्यास गेला. २०१३ मध्ये नोकरी सोडून तो कोल्हापूरला परतला. शरीरयष्टी चांगली असल्याने तो पोलिस असल्याचे मित्रांना व शेजारील लोकांना सांगत असे. त्याला पोलिसांच्या कारवाईची थोडीफार माहिती होती. पॅशन-प्रो गाडीवर त्याने ‘पोलिस’ लिहिले. गाडीच्या चावीला ‘महाराष्ट्र पोलिस’ किचेन व शिट्टी लावली. वेताची काठी गाडीला अडकवून घरी पत्नी व आईला सुरक्षा गार्ड म्हणून नोकरीस जात असल्याचे सांगून रोज दुपारी तो बाहेर पडत असे. निर्जनस्थळी जाऊन प्रेमीयुगुलांना पोलिसाची भीती दाखवून लूटमार करीत असे.(प्रतिनिधी)