शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

एप्रिलची एलबीटी वसुली साडेसात कोटींवर

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

महापालिका : बुधवारपासून थकबाकीदार व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई

सांगली : महापालिका आणि एलबीटीविरोधी कृती समितीच्या समझोत्यानंतरही व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसुलीसाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात केवळ ७ कोटी ६४ लाख रुपयांची एलबीटी वसूल झाल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे. येत्या मंगळवारी साडेचारशे व्यापाऱ्यांच्या जप्तीपूर्व नोटिसांची मुदत संपल्याने बुधवारपासून जप्तीच्या कारवाईला सुरुवात होणार आहे. महापालिकेने थकित एलबीटीपोटी पाच दिवसांपूर्वी तीनशे व्यापाऱ्यांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या आहेत. या व्यापाऱ्यांकडे सुमारे ४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापूर्वी सुमारे साडेचारशे व्यापाऱ्यांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या होत्या. त्याची मुदत ४ एप्रिलला संपली आहे. महापालिका व व्यापाऱ्यांत एलबीटीप्रश्नी तोडगा निघाला होता. महापालिकेने व्याज व दंडाची आकारणी न करता चार हप्त्यामध्ये एलबीटी भरण्याची सवलत दिली होती. पण त्यालाही व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. विवरणपत्रे, तीन हप्त्याचे धनादेश व २०१३-१४ ची थकित एलबीटी भरण्याबाबत व्यापाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद नाही. याप्रश्नी कृती समितीने घेतलेला पुढाकारही फारसा कामी आला नाही. त्यामुळे महापालिकेने आता कारवाईचे हत्यार उपसले आहे. यापूर्वी सुमारे साडेचारशे व्यापाऱ्यांना जप्तीपूर्व नोटिसांची मुदत यापूर्वीच संपली आहे, पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. पाच दिवसांपूर्वी ज्या तीनशे व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या त्यांची मुदत १५ दिवसांची आहे. त्यांच्यावरही पुढील टप्प्यात कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. महापालिकेने गेल्या दोन वर्षात व्यापाऱ्यांनी केलेल्या उलाढालीची माहिती जमा करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी व्हॅट व विक्रीकर विभागाशीही संपर्क साधला होता. पण मार्च एन्डमुळे या दोन्ही विभागांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली होती. आता या दोन्ही विभागांचे मार्च एन्डचे कामकाज पूर्ण झाले असून, त्यांनी व्यापाऱ्यांच्या उलाढालीची माहिती महापालिकेला सादर केली आहे. या माहितीची छाननी करून आणखी काही व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी) उरले केवळ तीन महिने थकित आणि चालू वर्षातील एलबीटी वसुलीसाठी महापालिकेकडे केवळ तीन महिन्यांचा अवधी उरला आहे. एप्रिलची वसुली साडेसात कोटींच्या घरात आहे. असाच प्रतिसाद राहिला, तर एलबीटी वसुलीचा आकडा तीस कोटींच्या घरातही जाणे मुश्किल आहे. असे झाले तर पुन्हा एलबीटी वसूल करणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे.