शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर.. मंजूर.. हद्दवाढ मंजूर...

By admin | Updated: June 24, 2014 01:18 IST

महापालिकेची विशेष सभा : एकमताने ठराव; प्रस्ताव मुंबईकडे; आता चेंडू शासनाच्या कोर्टात

कोल्हापूर : गेली चाळीस वर्षे रखडलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास महापालिका सभागृहाने आज, सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे शहराची हद्दवाढ होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले. मंजुरीनंतर महापालिकेचा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. राज्य शासन त्यावर हरकती व सूचना मागविणार असून त्यानंतर ३१ जुलैपर्यंत या विषयाचा काहीतरी निर्णय अपेक्षित आहे.मुंबई उच्च न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत राज्य शासनाने कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत ठोस निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने नव्या गावांतील करप्रणाली, पायाभूत सुविधा, महसूल देणी, आदींबाबत महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. नगरविकास संचालकांनी यापूर्वीच हद्दवाढीस हिरवा कंदिल दाखविला आहे. नगरविकास संचालक व जिल्हाधिकारी यांच्या अभिप्रायावर चर्चा करून हद्दवाढीस मंजुरी देण्यासाठी महापौर सुनीता राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. विकास निधी व शहराचा फायदा याबाबत अनेक नगरसेवकांनी शंका उपस्थित करीतच हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. ‘शहराची हद्दवाढ झाल्यानंतर महापालिका व ‘त्या’ गावांसाठी नेमका काय फायदा होणार, याची पडताळणी करा’, ‘निव्वळ भावनेच्या भरात हद्दवाढ नको’, ‘उपनगरांत सुविधा देताना प्रशासनाच्या तोंडाला फेस येत आहे. दोन लाखांचा विकास निधी मिळविताना नगरसेवकांची दमछाक होते’, ‘नव्या गावांसह शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करूया’, अशा प्रतिक्रियाही नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत शारंगधर देशमुख, प्रकाश नाईकनवरे, संभाजी जाधव, आर. डी. पाटील, भूपाल शेटे, दीपाली ढोणुक्षे, लीला धुमाळ, आदींनी सहभाग घेतला.भावनिक होऊ नकाजयंत पाटील यांनी, जीवन प्राधिकरणकडून नळपाणी योजना घेताना भावनिक होऊन सभागृहाने निर्णय घेतला. हद्दवाढ हा मोठा विषय आहे. शासनाकडून मिळणारा निधी व महापालिकेची आर्थिक कु वत पाहूनच याबाबत निर्णय घ्यावा. प्रस्तावित गावांतील भावना तीव्र आहेत. या गावांना महापालिका पुरवित असलेल्या सुविधांची माहिती द्यावी. निधी मिळविताना दमछाकदोन लाखांचा निधी मिळाला तरी राष्ट्रपती पदक मिळाल्याचा आनंद नगरसेवक यांना होतो. टोल, एलबीटी लादताना महापालिकेचे मत विचारात घेतले होते का? आता ही एक थेट अधिसूचना काढून शासनाने हद्दवाढ करावी. शेजारील गावांसोबत आमची भांडणे लावण्याचा उद्योग नको.