शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या ५२ विषयांना १५ मिनिटांत मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील विविध जागांवरील आरक्षणासंदर्भातील एकूण ५२ विषयांवर फक्त १५ मिनिटे खडाजंगी स्वरूपाची चर्चा करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील विविध जागांवरील आरक्षणासंदर्भातील एकूण ५२ विषयांवर फक्त १५ मिनिटे खडाजंगी स्वरूपाची चर्चा करून विषयाला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

वार्षिक अंदाजपत्रकासह विविध ८३ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राजीव गांधी भवन येथे शुक्रवारी ऑफलाइन सभा झाली. सुरुवातीला ऐनवेळचे पाच विषय घेण्यावरून वाद सुरू झाला. आर्थिक विषयाशी निगडित असल्याने ते विषय रद्द करण्यात आले. त्यानंतर नगरसेवक मदन कारंडे यांनी, शहराची वाढलेली लोकसंख्या व औद्योगिकीकरण याचा विचार करून नगरपालिकेची महापालिका करण्याचा ठराव करावा, अशी लक्षवेधी मांडली. त्यामध्ये नगरपालिकेची स्थापना सन १८९३ साली झाली आहे. त्यामुळे स्थापना होऊन १२५ वर्षे उलटली आहेत. नगरपालिकेचा पसारा वाढला असून, महापालिकेचा दर्जा मिळाल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल, अधिकार वाढतील. परिसरातील आवश्यक भागांचा समावेश करून घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर चर्चा होऊन प्रशासनाने महापालिकेसाठी आवश्यक निकष पाहून त्याचा प्रस्ताव तयार करून तो सभागृहासमोर ठेवावा, असा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर शहरातील विविध ठिकाणची आरक्षणे बदलणे, फेरफार, रद्द करणे, अशा विविध कारणांसाठी सभेसमोर आणलेल्या एकूण ५२ विषयांना १५ मिनिटांतच सत्ताधारी व विरोधकांनी मंजुरी दिली.