शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:32 IST

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी. याकरिता राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे क्रीडा मार्गदर्शक नेमले जातात. मात्र, गेल्या वर्षभरापासून राज्यातील १५३ क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यात मुदतवाढही दिलेली नाही अथवा रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे अनेकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.राज्यातील ...

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी. याकरिता राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे क्रीडा मार्गदर्शक नेमले जातात. मात्र, गेल्या वर्षभरापासून राज्यातील १५३ क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यात मुदतवाढही दिलेली नाही अथवा रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे अनेकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.राज्यातील उदयोन्मुख क्रीडापटूंमधून पदक विजेते खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर एकूण १५३ क्रीडा मार्गदर्शकांची श्रेणीनिहाय पदे दि. १५ जुलै २०१०च्या शासननिर्णयान्वये मानधन तत्त्वावर निर्माण करण्यात आली. त्यातत्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.सन २०२० च्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पदक विजेते खेळाडू घडविण्यासाठी व शासनाच्या क्रीडा संकुलात विविध खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी १५३ क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती करावी, असा निर्णय झाला.त्यात दि. २१ ते २५ फेबु्रवारी २०१२ दरम्यान मुलाखती घेऊन क्रीडा मार्गदर्शकांची मानधनावर नियुक्ती केली. ही नियुक्ती दि. १८ जून २०१२ ते दि. १७ जून २०१३ अशी करण्यात आली. कामगिरीचे मूल्यांकन करून पुनर्नियुक्ती करण्याचे ठरविले, पण तसे घडलेच नाही. त्यानंतर नियुक्तीत सातत्यच राहिले नाही.नियुक्त्याच नाहीत, तर कामगिरी कशी सुधारेल१ आॅगस्ट २०१३ ला नियुक्ताच संपुष्टात आणण्यात आल्या. त्यानंतर ८ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा दि. १३ मार्च २०१४ ते ३१ मे २०१४ या अडीच महिन्यांच्या कालावधीसाठी क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ३१ मे २०१४ ला पुन्हा सेवा संपुष्टात आणण्यात आली. पुन्हा याच मार्गदर्शकांना १५ मार्च २०१५ ते ३० जून २०१५ या कालावधीत नियुक्ती देण्यात आली. १० फेबु्रवारी २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आजअखेर या १५३ जणांना क्रीडा खात्याने लटकत ठेवले असून, अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा नियुक्त्या रखडल्यानंतर राज्यातील खेळाडूंची कामगिरी तरी कशी सुधारेल, असा सवाल क्रीडाप्रेमींतूनही व्यक्त होत आहे.शासनाने ३ आॅक्टोबर २०१७ ला एका आदेशान्वये मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली. मात्र, क्रीडा खात्याने आजअखेर त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे राज्यातील १५३ जणांचे भवितव्य लटकले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मार्गदर्शकांवर अन्याय होत आहे.- कृष्णात पाटील,कुस्ती प्रशिक्षक