शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अप्पी पाटील राखीव गटातून रिंगणात?केडीसी,सी बँक

By admin | Updated: April 23, 2015 00:54 IST

छाननीत बाद झालेला राखीव गटातील त्यांचा अर्ज न्यायालयात वैध ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य अप्पी पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विकास संस्था गटातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयानेही अपात्र ठरविला. मात्र, भटक्या विमुक्त जाती व जमाती गटातील त्यांचा अर्ज न्यायालयाने पात्र ठरविल्यामुळे ते राखीव गटातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.पाटील यांनी विकास संस्था व भटक्या विमुक्त जाती-जमाती या दोन्ही गटांतून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, येथील शिवाजी सहकारी बँकेच्या थकबाकीवरून त्यांचे दोन्ही अर्ज छाननीत अपात्र ठरले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयात त्यांचा संस्था गटातील अर्ज अवैध, तर राखीव गटातील अर्ज वैध ठरला. या निर्णयाविरुद्धही पुन्हा न्यायालयात दाद मागितली आहे. भटक्या विमुक्त गटातील अर्ज पात्र ठरल्यामुळे ते राखीव गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.जोरदार तयारी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याविरोधात बंडखोरी करून पाटील यांनी चंदगड विधानसभेची निवडणूक लढविली. अनपेक्षितरित्या रिंगणात उतरूनही तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली. विधानसभेनंतर सर्व निवडणुकीत ताकदीने उतरण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’साठी अर्ज भरले. मात्र, ‘गोकुळ’मधून माघार घेऊन केडीसीसी निवडणूक लढविण्याची निर्णय त्यांनी घेतला आहे. छाननीत बाद झालेला राखीव गटातील त्यांचा अर्ज न्यायालयात वैध ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.