शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन, निसर्गमित्र संस्था व सहेली मंचतर्फे निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 14:10 IST

रंगपंचमीदिवशी नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास शरिरास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हे नैसर्गिक रंग आपण घरामध्ये सहज तयार करू शकतो. गेल्या अकरा वर्षांपासून आमच्या संस्थेच्यावतीने नैसर्गिक रंग वापरण्यासाठी आवाहन करत आहोत, त्याला मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले आणि डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकार परिषेदत दिली. ​​​​​​​

ठळक मुद्देनैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहननिसर्गमित्र संस्था व सहेली मंचतर्फे निर्मिती

कोल्हापूर : रंगपंचमीदिवशी नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास शरिरास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हे नैसर्गिक रंग आपण घरामध्ये सहज तयार करू शकतो. गेल्या अकरा वर्षांपासून आमच्या संस्थेच्यावतीने नैसर्गिक रंग वापरण्यासाठी आवाहन करत आहोत, त्याला मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले आणि डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकार परिषेदत दिली.चौगुले म्हणाले, निसर्गमित्रतर्फे गेल्या अकरा वर्षांपासून वनस्पतीची पाने, फुले, फळांद्वारे रंग कसा तयार केला जातो याची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना देत आहोत. या नैसर्गिक रंगांतून सुगंधी वास तर येतोच पण त्याचसोबत हे शरीराला घातक नाहीत. निर्माल्यातील फुलांच्या पाकळ््यांचाही वापर करून आपण विविध रंग तयार करू शकतो. गतवर्षी आमच्या संस्थेच्यावतीने ९०० किलो रंग तयार केले होते. दरवर्षी याला मोठी मागणी होत आहे.

डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या पानांफुलापासून हे सात रंगामध्ये रंग तयार करण्यात आले आहेत. बाजारात इकोफ्रेंडली अशा रंगांची कोणतीही खात्री देता येत नसून वनस्पतीपासून बनवलेला रंग वापरणे आवश्यक आहे. या दृष्टीने ते तयार केले आहेत.यावेळी राणिता चौगुले यांनी नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच अधिक माहितीसाठी निसर्गमित्रद्वारा बापूसाहेब पाटील, ग्रंथालय, शाहूपुरी चौथी गल्ली, येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले.वनस्पतींची निवड -झेंडू, गुलाब, शेंद्री, पळस, काटेसावर, पांगरा, बेल, मंजिष्ठा, कुंकूफळ, पारिजातक, कडूलिंब, मेंहदी, निलमोहर, बहावा, बारतोंडी, हिरडा, बेडका, डाळींबसाल, धायटी, जांभूळ, सिताअशोक, पालक, पुदीना,बीट, टोमॅटो, गोकर्ण, शेवगा, गाजर, कडीपत्ता अशा वनस्पतींचा रंगनिर्मितीसाठी वापर केला असून त्यामुळे त्वचेला, डोळ््यांना कोणतीही इजा होत नाही. हे सर्व रंग पाण्यात विरघळणारे असून चेहरा रंगिवण्यासाठी सोपे आहेत.

 

 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर