शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

होर्डिंगमुक्त अंबील यात्रेचे आवाहन

By admin | Updated: December 9, 2014 23:54 IST

रेणुका देवस्थान समितीचा पुढाकार : स्वागत कमान, शुभेच्छा फलक नकोत

कोल्हापूर : कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ओढ्यावरील रेणुका देवीची अंबील यात्रा यंदाही होर्डिंगमुक्त करण्याचे आवाहन श्री रेणुका देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. १३) ही यात्रा होणार आहे. सौंदत्ती यात्रेनंतर आठ दिवसांनी ओढ्यावरील रेणुका देवीची अंबील यात्रा साजरी केली जाते. यादिवशी देवीची सालंकृत पूजा, आरती केली जाते. मेथीची भाजी, वडी, वरण, वांग, भाकरी अंबील, असा नैवेद्य दाखविला जातो. अलीकडे या यात्रेच्या निमित्ताने स्वागत व शुभेच्छा फलक लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. फलकाच्या या गर्दीमुळे यात्रा परिसराच्या सौंदर्याला बाधा येते. शिवाय भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे जिकिरीचे जाते. त्यामुळे स्वागत कमान व शुभेच्छा फलक लावू नयेत. राजारामपूरी , राजवाडा पोलीस स्टेशन व महापालिकेला होर्डिंगमुक्त यात्रा मोहिमेस सहकार्य करावे व मागील वर्षीप्रमाणेच यंदाही होर्डिंगमुक्त यात्रा व्हावी, अशी अपेक्षा समितीने पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. दरम्यान यात्रेची तयारी सुरू असून, महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र मंडप रांगा उभारण्यात येणार आहेत. भाविकांना देवीच्या दर्शनासाठी स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेवेळी मौल्यवान दागिने टाळावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. अन्नाची नासाडी टाळावीदेवीला नैवेद्य दाखविण्याची पद्धत असल्याने या दिवशी अन्नाची मोठी नासाडी होते. मात्र, गेल्या वर्षीपासून मंदिरातील पुजारी, जोगती व स्वयंसेवक योग्य नियोजन करून नैवेद्याची सांडलवंड होवू नये, यासाठी जातीने प्रयत्न करीत आहेत. काही भाविक कोरडा शिधा देण्याची सुचना करतात. मात्र, केवळ नैवेद्य देणे एवढाच हेतू यात्रेमागे नाही, तर सहभोजनाचा आनंदही लुटला जातो. त्यामुळे भाविकांनीदेखील अन्नाची नासाडी होऊ नये, यासाठी समितीला सहकार्य करावे, असे आवाहन पुजारी सुनील मेढे यांनी केले आहे.