शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 16:21 IST

धर्मांतरामुळे उडपीमद्ये दोन तर मंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळेच हा कायदा आणल्याचे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

बेळगाव : राज्यातील धर्मांतरबंदी कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरोधात, त्या धर्माच्या अनुयायांना त्रास देण्यासाठी नाही, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले. धर्मांतरामुळे उडपीमद्ये दोन तर मंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळेच हा कायदा आणल्याचे ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

बेळगावातील सुवर्णसौधमध्ये विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत धर्मांतर बंदी विधेयकावरील चर्चेत सहभागी होऊन ते बोलत होते. गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, स्वेच्छेने केल्या जाणाऱ्या धर्मांतराला या कायद्यात कसलीच आडकाठी नाही. मात्र, त्यासाठी 30 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक आहे. आमिष दाखवून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद आहे. त्याचप्रमाणे सामूहिक धर्मांतरासाठी ही 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

दरम्यान, धर्मांतर बंदी विधेयक पाडणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी माफी मागावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. येडियुरप्पा म्हणाले, ज्या पद्धतीने शिवकुमार यांनी धर्मांतर विरोधी विधेयकाची प्रत फाडून टाकली. त्याच पद्धतीने देशात जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. आम्ही अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही; परंतु काँग्रेसने अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करू नये. आपल्या कृतीबद्दल शिवकुमार यांनी सभागृहात माफी मागावी, असे येडियुरप्पा म्हणाले.

महसूलमंत्री आर. अशोक यांनी धर्मांतर बंदी कायद्यात केवळ काही सुधारणाही केल्या आहेत. जनतेच्या हिताच्या दृष्टीने हा कायदा सरकार आणत असल्याचे सांगितले. पत्रकारांशी बोलताना मंत्री अशोक यांनी धर्मांतर बंदी कायद्याचे समर्थन केले ते म्हणाले, दुप्पटीपणामुळे काँग्रेसचा देशात सर्वत्र उपवास होत आहे. राज्य आणि देश एकसंध राहावा यासाठी धर्मांतर बंदी कायदा लागू झाला आहे. नव्या धर्मांतर बंदी कायद्याने कोणत्याही धर्माचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाहीही मंत्री आर. अशोक यांनी यावेळी दिली

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक