शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

साडेनऊ हजार कोटींचा वार्षिक पतपुरवठा

By admin | Updated: April 12, 2017 01:19 IST

जिल्हाधिकारी : कृषी, बचत गटांची उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्न

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी बँक आॅफ इंडिया या अग्रणी बँकेच्यावतीने सन २०१७-१८ या वर्षाकरिता ९ हजार ६२७ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते करण्यात आले. या आराखड्यामध्ये कृषी व बचत गटांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी यंदाच्या आराखड्यात १३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वार्षिक पतपुरवठा आराखडा अग्रणी जिल्हा प्रबंधक एस. जी. किणिंगे यांनी सादर केला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. के. आरसेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्णासाठी तयार करण्यात आलेल्या ९ हजार ६२७ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये प्राथमिकता क्षेत्रासाठी ६ हजार ८१० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. कृषी उत्पादनाला मिळणारे चांगले दर तसेच ८० टक्के शेतकरी बँकिंग व्यवस्थेखाली आणणे व त्याला लागणाऱ्या संलग्न सेवांसाठी २०१७-१८ या वर्षासाठी ३ हजार ४८० कोटी रुपयांची तरतूद केली तर यंत्रमाग तसेच इतर लघुउद्योगांसाठी २ हजार १४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतर प्राथमिक क्षेत्रासाठी वाढ करून तब्बल १ हजार १८९ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे यावेळी सांगण्यात आले.जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ८१६५६८ खाती उघडण्यात आली असून त्यापैकी ग्रामीण भागामध्ये ५७८०४८ खाती तर शहरी भागामध्ये २३८५२० खाती उघडण्यात आली आहे. ४७५०२४ खातेधारकांना रूपे एटीएम कार्डाचे वाटप करण्यात आले. या वर्षापासून विविध विमा कंपन्यांच्या सहकार्याने बँका ग्रामीण भागात आरोग्य विमा सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यंदाच्या पतपुरवठा आराखड्याची अंमलबजावणी करताना सर्व बँकर्सनी शेतकरी, युवक, उद्योजक, बचतगट अशा व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून नावीन्यपूर्ण योजना हाती घ्यावी, अशी सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, यावर्षी जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री जन-धन योजनेची अंमलबजावणी करणे (विमा व मुद्रा कर्ज योजना / बँक मित्र), सोलर पंप सेट योजना, पीक विमा योजना राबविणे, आर-सेटीद्वारे १००० तरुण व तरुणींना प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभारणी करणे, अल्पसंख्याकांना एकूण कर्जवाटपाच्या १५ टक्के कर्जवाटप करणे असा पाचकलमी कार्यक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अडीच लाख शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटपजिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार स्वयंसाहाय्यता बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. २ लाख ५४ हजार ५३० शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना २ हजार ८३ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. शेती, लघुउद्योग तसेच बचत गटांसाठी देण्यात येणारा कर्जपुरवठा मिळविण्यासाठी कर्जदारांनी बँकांकडे कर्जप्रकरण पाठविताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.