शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सदाभाऊंच्या नव्या रयत क्रांती संघटनेची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 18:04 IST

कोल्हापूर, दि. २१ : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिरातील कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. संवादातून संघर्षाकडे असे संघटनेचे घोषवाक्य असून प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील यांची निवड करण्यात आली असून येत्या ३0 सप्टेंबर रोजी उसाचा दर ठरविणार असून तोच अंतिम राहील, अशी घोषणाही ...

ठळक मुद्देसुरेशदादा पाटील प्रदेशाध्यक्ष, युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी शार्दूल जाधव३0 तारखेला उसाचा दर ठरविणार, तोच अंतिम राहणार, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घोषणारयत क्रांती संघटनेच्या लोगोचे अनावरण करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शनराजू शेट्टीवर टीका करणे टाळले

कोल्हापूर, दि. २१ : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिरातील कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. संवादातून संघर्षाकडे असे संघटनेचे घोषवाक्य असून प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील यांची निवड करण्यात आली असून येत्या ३0 सप्टेंबर रोजी उसाचा दर ठरविणार असून तोच अंतिम राहील, अशी घोषणाही यावेळी खोत यांनी केली.

सदाभाऊ खोत यांच्या नवीन शेतकरी संघटनेबाबत राज्यभर चर्चा होती. त्यानुसार गुरुवारी सदाभाऊंनी कोल्हापूरात येताच सर्वप्रथम अंबाबाईचे दर्शन घेतले आणि राज्यभरातून जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नव्या संघटनेची घोषणाही केली.

राजर्षी शाहू महाराजांचे आशीर्वाद घेऊन रयत क्रांती संघटनेच्या लोगोचे अनावरण सदाभाऊ यांनी केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले महिना-दीड महिना त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर त्यांनी संघटना स्थापनेचा मुहूर्त ठरविला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या या नवीन संघटनेची अधिकृत घोषणा केली.

राज्यमंत्री खोत यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर दुपारी शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकºयांसमोर नव्या संघटनेची घोषणा केली.

या मेळाव्यात युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी शार्दूल जाधव यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजू सावंत, भरत पाटील आदी उपस्थित होते.३0 सप्टेंबरला उसाचा दर जाहीर करणार

घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवीन संघटनेची घोषणा करतानाच खोत यांनी इचलकरंजी येथे ३० सप्टेंबरला होणाºया दसरा मेळाव्यात उसाचा दर मीच ठरविणार आणि तोच अंतिम राहिल, अशी घोषणाही केली. याच मेळाव्यात संघटनेची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे.राजू शेट्टीवर टीका करणे टाळले

कोल्हापूरात झालेल्या मेळाव्यात सदाभाऊ यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका करणे टाळले. या मेळाव्यात त्यांनी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणे टाळले.