शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - कर्जमाफीचे नेमके काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 00:15 IST

‘शेतकऱ्यांची कर्जमाफी’ हा गेले जूनचा महिनाभर चर्चेतला विषय आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला गुळासाठी तीन वर्षांपूर्वी ‘जी.आय.’ मानांकन मिळाले; पण त्याचा वापर केवळ समितीच्या लेटरहेडवर वापरण्यापलीकडे काहीच झालेला नाही. मानांकनातील अटी येथील गूळ उत्पादक पूर्ण करीत नसल्याने त्याचा वापर करता येत नसल्याचे समिती प्रशासन सांगत असले तरी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात समिती सपशेल अपयशी ठरली आहे. परजिल्ह्यातील गुळाची ‘कोल्हापुरी’ नावाखाली विक्री होऊ नये, हा धाक दाखविण्यासाठीच लाखो रुपये खर्चून मिळविलेल्या ‘जी. आय.’चा वापर सुरू आहे. कोल्हापूरच्या मातीतील कसदारपणामुळे येथील दूध, गुळासह भाजीपाल्याला वेगळीच चव आहे. येथील गुळाने तर साऱ्या सौराष्ट्राला भुरळ घातलीच; पण त्याबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. कोल्हापुरी गुळाला मागणी जरी चांगली असली तरी अस्थिर बाजारपेठेमुळे जिल्ह्यातील २०० हून अधिक गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. ‘कोल्हापुरी’ गुळाच्या नावाखाली सांगलीसह कर्नाटकातील गुळाची विक्री राजरोसपणे होत असल्याने कोल्हापूरचे नाव खराब होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने समितीने आपला ट्रेडमार्क करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बऱ्याच वर्षांच्या धडपडीनंतर साडेतीन लाख रुपये खर्च करून २०१४ ला तत्कालीन प्रशासक डॉ. महेश कदम यांच्या काळात समितीला ‘जी.आय.’ मानांकन मिळाले. मानांकन मिळून तब्बल तीन वर्षांचा कालावधी झाला तरी त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. मानांकनातील निकषांनुसार पॅकिंगमधील गुळाची गुणवत्ता बदलता कामा नये, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकाच गुणवत्तेचा गूळ तयार करीत असताना स्वच्छताही पाळणे महत्त्वाचे राहणार आहे. आपल्याकडे आजही पारंपरिक पद्धतीने गूळ तयार केला जातो. ही पद्धत सोडण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नसली तरी ‘ट्रेडमार्क’च्या गुळाला चार पैसे जादा मिळणार आहेत, हे समजावून सांगण्याची जबाबदारी समितीने उचलणे गरजेचे आहे. त्यांची मानसिकता बदलण्यासाठी समितीतर्फे फारसे प्रयत्न न झाल्याने ‘जी. आय.’ मानांकन केवळ कागदावरच राहिले आहे. मानांकनाचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्यापेक्षा समितीने ‘कोल्हापुरी गूळ’ या ट्रेडमार्कच्या नावाखाली इतर बाजारपेठांत कोणी गुळाची विक्री करते काय? करीत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. मराठे समितीच्या अहवालाचे काय?प्रशासक डॉ. महेश कदम यांना गुळाची प्रतवारी व गुणवत्ता तपासणीसाठी लॅब तयार करावयाची होती. यासाठी त्यांनी अरुण मराठे व डॉ. एन. डी. जांभळे यांची समिती नेमली होती. या समितीने प्रत्येक तालुक्यातील गुऱ्हाळघरांची पाहणी करून तेथील मातीचे नमुने घेतले होते; पण कदम बदलून गेल्यानंतर हा अहवाल समितीकडेच राहिला. संचालक मंडळाने त्यासाठी फारसा प्रयत्नच केलेला नाही. गूळ उत्पादक पारंपरिक पद्धत सोडण्यास तयार नसल्याने ‘जी. आय.’ मानांकन मिळूनही त्याचा वापर करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे; पण येत्या महिन्याभरात जिल्ह्यातील गुऱ्हाळघर मालक व गूळ उत्पादकांची बैठक घेऊन यंदाच्या हंगामापासून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.- सर्जेराव पाटील-गवशीकर(सभापती, बाजार समिती)