शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

भाष्य - कर्जमाफीचे नेमके काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 00:15 IST

‘शेतकऱ्यांची कर्जमाफी’ हा गेले जूनचा महिनाभर चर्चेतला विषय आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला गुळासाठी तीन वर्षांपूर्वी ‘जी.आय.’ मानांकन मिळाले; पण त्याचा वापर केवळ समितीच्या लेटरहेडवर वापरण्यापलीकडे काहीच झालेला नाही. मानांकनातील अटी येथील गूळ उत्पादक पूर्ण करीत नसल्याने त्याचा वापर करता येत नसल्याचे समिती प्रशासन सांगत असले तरी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात समिती सपशेल अपयशी ठरली आहे. परजिल्ह्यातील गुळाची ‘कोल्हापुरी’ नावाखाली विक्री होऊ नये, हा धाक दाखविण्यासाठीच लाखो रुपये खर्चून मिळविलेल्या ‘जी. आय.’चा वापर सुरू आहे. कोल्हापूरच्या मातीतील कसदारपणामुळे येथील दूध, गुळासह भाजीपाल्याला वेगळीच चव आहे. येथील गुळाने तर साऱ्या सौराष्ट्राला भुरळ घातलीच; पण त्याबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. कोल्हापुरी गुळाला मागणी जरी चांगली असली तरी अस्थिर बाजारपेठेमुळे जिल्ह्यातील २०० हून अधिक गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. ‘कोल्हापुरी’ गुळाच्या नावाखाली सांगलीसह कर्नाटकातील गुळाची विक्री राजरोसपणे होत असल्याने कोल्हापूरचे नाव खराब होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने समितीने आपला ट्रेडमार्क करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बऱ्याच वर्षांच्या धडपडीनंतर साडेतीन लाख रुपये खर्च करून २०१४ ला तत्कालीन प्रशासक डॉ. महेश कदम यांच्या काळात समितीला ‘जी.आय.’ मानांकन मिळाले. मानांकन मिळून तब्बल तीन वर्षांचा कालावधी झाला तरी त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. मानांकनातील निकषांनुसार पॅकिंगमधील गुळाची गुणवत्ता बदलता कामा नये, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकाच गुणवत्तेचा गूळ तयार करीत असताना स्वच्छताही पाळणे महत्त्वाचे राहणार आहे. आपल्याकडे आजही पारंपरिक पद्धतीने गूळ तयार केला जातो. ही पद्धत सोडण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नसली तरी ‘ट्रेडमार्क’च्या गुळाला चार पैसे जादा मिळणार आहेत, हे समजावून सांगण्याची जबाबदारी समितीने उचलणे गरजेचे आहे. त्यांची मानसिकता बदलण्यासाठी समितीतर्फे फारसे प्रयत्न न झाल्याने ‘जी. आय.’ मानांकन केवळ कागदावरच राहिले आहे. मानांकनाचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्यापेक्षा समितीने ‘कोल्हापुरी गूळ’ या ट्रेडमार्कच्या नावाखाली इतर बाजारपेठांत कोणी गुळाची विक्री करते काय? करीत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. मराठे समितीच्या अहवालाचे काय?प्रशासक डॉ. महेश कदम यांना गुळाची प्रतवारी व गुणवत्ता तपासणीसाठी लॅब तयार करावयाची होती. यासाठी त्यांनी अरुण मराठे व डॉ. एन. डी. जांभळे यांची समिती नेमली होती. या समितीने प्रत्येक तालुक्यातील गुऱ्हाळघरांची पाहणी करून तेथील मातीचे नमुने घेतले होते; पण कदम बदलून गेल्यानंतर हा अहवाल समितीकडेच राहिला. संचालक मंडळाने त्यासाठी फारसा प्रयत्नच केलेला नाही. गूळ उत्पादक पारंपरिक पद्धत सोडण्यास तयार नसल्याने ‘जी. आय.’ मानांकन मिळूनही त्याचा वापर करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे; पण येत्या महिन्याभरात जिल्ह्यातील गुऱ्हाळघर मालक व गूळ उत्पादकांची बैठक घेऊन यंदाच्या हंगामापासून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.- सर्जेराव पाटील-गवशीकर(सभापती, बाजार समिती)