शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

वर्धापनदिन लेख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST

गेल्यावर्षी कोरोना नावाचा एक विषाणू आला आणि त्यानं जगण्याची पध्दतच बदलून टाकली. एरवी शासकीय असो किंवा खासगी, अगदी जवळ ...

गेल्यावर्षी कोरोना नावाचा एक विषाणू आला आणि त्यानं जगण्याची पध्दतच बदलून टाकली. एरवी शासकीय असो किंवा खासगी, अगदी जवळ जाऊन, बसून बोलायची, अघळपघळ गप्पा मारायची सवय. मात्र कोरोनामुळे सगळं चित्रच बदललं. माणसा-माणसात प्लास्टिकच्या का असेनात, भिंती उभ्या करण्यात आल्या. या बदललेल्या परिस्थितीचा हा आढावा...

गेल्यावर्षी फेब्रुवारीनंतर भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आणि हा थुंकीवाटे पसरणारा विषाणू असल्याने, मग नागरिकांना खूपच बंधने घालून घ्यावी लागली. केंद्र असो वा राज्य, शासनाने यासाठी त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना द्यायला सुरुवात केली. सामाजिक अंतर राखा, सॅनिटायझरचा वापर करा आणि मास्क वापरा... ही ती त्रिसूत्री.

तोंड आणि नाकावाटे म्हणजेच शिंकेद्वारे आणि तोंडातून बोलताना थुंकीचे तुषार उडतात. ते कसेही कुठेही उडतात. त्याचा नंतर स्पर्श होऊन त्याद्वारे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी ही दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. आतापर्यंत प्राण्यांना मुसक्या बांधलेल्या आपण पाहत होतो. परंतु माणसाला आरोग्याच्यादृष्टीने मुसक्या जरी नसल्या तरी, मुखपट्टी बांधण्याचे जे बंधन तेव्हा घालण्यात आले, ते अजूनही सक्तीचे आहे. यापुढच्या काळातही याची अंमलबजावणी करावी लागणार असे दिसते.

आम्हा नागरिकांना याची सवय नसल्याने सुरुवातीला घुसमटल्यासारखे होऊ लागले. त्यामुळे टाळाटाळ सुरू झाली. बाहेर पडताना मास्क विसरला की रुमाल बांधायची वेळ आली. नागरिक तरीही दक्षता घेत नसल्याने अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने दंडाच्या पावत्या फाडायला सुरुवात केली. मग कुठे मास्क वापरण्यात नियमितता आली. आताही कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने मास्क हनुवटीवर ठेवून फिरणारे अनेकजण आहेत. आठवडा-आठवडाभर मास्क न धुणारेही अनेकजण आहेत. तसेच अनेक महिला बचत गटांनी आणि कंपन्यांनी रंगीबेरंगी मास्कचे उत्पादन सुरू केले. सर्जिकल मास्कपासून कापडी मास्कपर्यंतच्या उत्पादनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल घडली.

सॅनिटायझरचा वापर, याचे एक बंधन घालण्यात आले. कुठेही गेटला, फर्निचरला लागलेले हात जर पुन्हा नाका-तोंडाला लागले, तर त्या माध्यमातून होणारा कोरोना प्रसार रोखण्यासाठी सातत्याने सॅनिटायझर वापरण्याचीही सक्ती करण्यात आली. अचानक ही मागणी वाढल्यामुळे बाजारात सॅनिटायझरची टंचाई निर्माण झाली. किमती वाढल्या. देशभरात अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे साखर कारखान्यांनी सॅनिटायझर उत्पादन करावे यासाठी सूचना करण्यात आल्या. अनेक नव्या कंपन्या स्थापन झाल्या आणि एक, दोन महिन्यांनी सॅनिटायझर मुबलक प्रमाणात मिळू लागले. अनेक शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये सॅनिटायझर घेऊन एका कर्मचाऱ्याला बसवण्यात येऊ लागले. त्यानंतर मग सॅनिटायझर स्टॅंड आले. नंतर त्यातही सुधारणा झाली. सेन्सरचा वापर करून, विशिष्ट ठिकाणी हात धरला की सॅनिटायझर हातावर पडू लागले. परंतु आता घरा-घरातही गेल्यानंतर सॅनिटायझर वापरण्याची सवय नागरिकांना लागली आहे. यामध्येही अनेक कंपन्यांनी संशोधन करून हे सॅनिटायझर सुगंधी करण्यास सुरुवात केली.

सामाजिक अंतर राखणे सुरुवातीला नागरिकांना अवघड गेले. परंतु जसजसे कोरोना रुग्णांचे आकडे वाढायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मृत्यूही सुरू झाले, तेव्हा मात्र याचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात आले. साधा कोणाला ठसका लागला तरी, नागरिक त्याच्याकडे संशयाने पाहायला लागले. त्यावरूनही अनेक ठिकाणी भांडणे, वाद, मारामाऱ्या घडल्या. विविध कार्यालयांमधील बैठक रचनाच बदलण्यात आली. ज्या ठिकाणी १० खुर्च्या होत्या, त्या ठिकाणी पाचच खुर्च्या ठेवण्यात आल्या.