शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

अण्णा भाऊ साठे जयंती विशेष: डॉ. आंबेडकरांची चळवळ अण्णा भाऊंच्या साहित्याची प्रेरणा

By संदीप आडनाईक | Updated: August 1, 2023 17:44 IST

‘श्रमिक प्रतिष्ठान’च्या पुस्तकातून माहिती प्रथमच उजेडात

कोल्हापूर : भारतातील साम्राज्यवादविरोधी राष्ट्रीय चळवळ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या ज्येष्ठ लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रेरणा असल्याचा संदर्भ शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे अधिव्याख्याता आणि अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक प्रा. रणधीर शिंदे आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी शोधला आहे. त्यांचे हे साहित्य श्रमिक प्रतिष्ठानने ‘युगांतर’मधील अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य या पुस्तकाद्वारे प्रकाशित केले आहे.अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाच्या ‘युगांतर’ या साप्ताहिकात १९५०-६१ या काळात सातत्याने लिखाण करीत होते. त्यांनी त्या साप्ताहिकात लिहिलेल्या निवडक साहित्याचा संग्रह या पुस्तकरूपाने प्रकाशित झाले आहेत. ‘हवे ते लिहितो’ या लेखमालेत अण्णा भाऊंनी आपल्या साहित्याच्या प्रेरणा व त्याचे प्रयोजन याचे विवेचन केले आहे, अशी माहिती प्रा. रणधीर शिंदे यांनी दिली. या पुस्तकात अण्णा भाऊ म्हणतात, मार्क्सवाद-लेनिनवाद, भारतातील साम्राज्यवादविरोधी राष्ट्रीय चळवळ व डॉ. आंबेडकरांची चळवळ या आपल्या साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा होत्या.या संग्रहातील त्यांच्या साहित्यातून महाराष्ट्रातील वारणा खोरे सर्व रस, रंग व गंध यासह प्रकट होते. त्यात मुंबईतील गरीब लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष व कामगारांचा लढाऊपणा दिसून येतो. त्यांच्या कविता वीररसाने ओथंबल्या आहेत. त्यांच्या दलित कथांचे वेगळेपण सर्वांचे लक्ष वेधणारे आहे. अण्णा भाऊंचे हे ‘युगांतर’मधील साहित्य त्यांच्या प्रतिभेचे नवदर्शन घडवून देते.या पुस्तकाचे संपादन डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे. डॉ. चौसाळकर शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक आहेत तर प्रा. रणधीर शिंदे याच विद्यापीठाच्या मराठी विभागात अधिव्याख्याता आणि अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.प्रादेशिक भाषाशैलीत लेखनमुंबईतील लालबाग, परळ, गिरणगाव, चिरागनगर आणि कोल्हापूर, सांगली परिसरातील वारणा खोऱ्यातील गावरान मराठी या दोन्ही प्रदेशांतील विशिष्ट भाषाशैली अण्णा भाऊंच्या साहित्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

‘युगांतर’ या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झालेले हे लिखाण अण्णा भाऊंच्या साहित्याबद्दल नवी दृष्टी देणारे व यातील बहुतांश लेखन प्रथमत:च ग्रंथरूपाने प्रकाशित होत आहे. यातून वाचकांना अभ्यासकांना अण्णा भाऊंच्या लेखनाकडे पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त होईल, असे वाटते. -डॉ. रणधीर शिंदे, समन्वयक, अण्णा भाऊ साठे अध्यासन, शिवाजी विद्यापीठ. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर