शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अंगणवाडी भरती गुणवत्तेवरच!

By admin | Updated: September 17, 2014 23:49 IST

शासनाचा निर्णय : मुलाखतीचा फार्स झाला रद्द; थेट नियुक्तीचा मार्ग मोकळा

विश्वास पाटील- कोल्हापूर -राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती यापुढे शैक्षणिक गुणवत्तेवरच करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. त्यासाठी होणारा मुलाखतीचा फार्स आता रद्द केला आहे. त्यामुळे ज्या महिलेची शैक्षणिक गुणवत्ता जास्त असेल, त्यांनाच कोणत्याही वशिल्याशिवाय या पदावरील थेट नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंबंधीचा आदेश या विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांनी काढला आहे.अंगणवाडी भरती करताना शैक्षणिक गुणवत्तेला ९० गुण होते व दहा गुण मुलाखतीसाठी होते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समित्या होत्या. या समित्या स्थापन होण्यातही दिरंगाई होई. त्यामुळे भरतीत अडचणी येत असे. शिवाय शैक्षणिक गुणवत्ता चांगली असूनही मुलाखतीत एखाद्या उमेदवारास जास्त गुण दिले गेले तर तिचीच निवड होई, असे प्रकार अनेक ठिकाणी होत. त्यामुळे या प्रक्रियेबद्दल राज्यभरातून तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन शासनाने हा मुलाखतीचा फार्सच रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. राज्यात रयत शिक्षण संस्थेत सध्या या पद्धतीने नोकरभरती होते.राज्यात ज्या ठिकाणी पदे रिक्त झाली अथवा नवीन मंजूर झाली आहेत, अशा ठिकाणी पदे भरताना लेखी परीक्षा घेतली जाऊ नये. त्यासंबंधीची जाहिरात देऊन पात्र उमेदवारांची यादी तयार करावी. त्यामध्ये शिक्षण, विधवा वा अनाथ, जात आदींसाठी त्यांच्या प्रमाणपत्रानुसार निश्चित गुण देऊन त्याची गुणवत्ता यादी नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवारांना सारखेच गुण असल्यास ज्यांची शैक्षणिक अर्हता जास्त आहे, त्यांची निवड होईल. ती समान असल्यास ज्यांचे वय जास्त आहे, त्यांची निवड होईल व त्यातूनही समान गुणवत्ता आल्यास उमेदवाराची निवड अखेर चिठ्ठी टाकून करण्यात यावी, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.ही गुणवत्तायादी पाच दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अथवा बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस फलकावर लावण्यात येईल. त्यावर दहा दिवसांत तक्रार करता येऊ शकेल. उमेदवाराची निवड झाल्यास त्यांना तत्काळ नियुक्ती आदेश देऊन पुढील महिन्याच्या एक तारखेपासून कामावर रूजू करून घेण्यात येणार आहे. ज्या प्रकल्पांकडून यापूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे (५ आॅगस्ट २०१० व १५ सप्टेंबर २०११) जाहिरात दिली आहे, त्यांनी जुन्याच आदेशानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करावी व १३ आॅगस्ट २०१४ नंतर मात्र भरती प्रक्रिया नव्या आदेशानुसार करण्यात येणार आहे.राज्यातील दृष्टिक्षेपएकूण अंगणवाड्या : ८८ हजार २७२शून्य ते सहा वर्षांखालील मुलांची संख्या : १ कोटी ३१ लाख ८७ हजार (२००१ची जनगणना)अंगणवाड्यांत येणाऱ्या मुलांची संख्या : ८६ लाख ३१ हजार