शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

..तर पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, डॉ. राजेंद्र बडवे यांचे संशोधन

By समीर देशपांडे | Updated: September 20, 2022 19:15 IST

जागतिक स्तरावर हा 'अशा' प्रकारचा पहिलाच अभ्यास

कोल्हापूर : निदान लवकर झालेल्या स्तनाच्या कर्करोगात रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी गाठीच्या आसपास सर्व बाजूंनी स्थानिक भूल दिल्यास कर्करोगाची गाठ पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी होण्याचा तसेच मृत्यूचाही धोका कमी झाल्याचे संशोधनामध्ये सिध्द झाले आहे.११ वर्षांच्या कालावधीत रुग्णांवर केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष टाटा मेमोरियल सेंटर तर्फे पॅरिस येथे झालेल्या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑनकॉलॉजी (ESMO) वैद्यकीय परिषदमध्ये सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सादर केले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सूरज पवार यांचे या संशोधनामध्ये मोलाचे योगदान आहे.या नवीन पद्धतीमध्ये संपूर्ण भूल देण्याबरोबरच गाठीच्या आसपास सर्व बाजूने भूल देऊन गाठीतील पेशींचे विभाजन व हालचाल थांबवली जाते. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर ५ मिनिटांनी शस्त्रक्रिया केली जाते. हा छोटासा प्रयोग प्रभावी ठरला आहे. जागतिक स्तरावर हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. या प्रयोगामुळे कर्करोग पुन्हा होण्याचे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी झाले आहे.तर मृत्यूचा धोका देखील कमी झाला आहे.स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया हा प्रामुख्याने केला जाणारा उपचार आहे. शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपी,हार्मोनथेरपी, रेडिओथेरपी अशा पुढील उपचार पद्धती पूर्ण केल्यानंतरही अनेकदा कर्करोगाची पुनरावृत्ती होण्याचा धोका असतो. याबाबत टाटा मेमोरियल सेंटर (मुंबई), कोल्हापूर कॅन्सर सेंटर (कोल्हापूर) यासह दिल्ली, गुवाहाटी, अहमदाबाद, हैदराबाद, कन्नूर, शिलॉंग, पुणे, मिरज येथील रूग्णालयांनी एक नवीन सोपी उपचार पद्धती अभ्यासातून सिद्ध केली आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटर गेली ११ वर्ष याबाबत संशोधन करत होते. येथील चेअरमन डॉ. सुरज पवार हेच प्रमुख संशोधक म्हणून क्लिनिकल रिसर्च विभागामध्ये कार्यरत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcancerकर्करोग