शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...अन् लाटगावची संक्रांत झाली ‘गोड’!

By admin | Updated: January 17, 2015 00:34 IST

दलित-सवर्ण वाद मिटला : प्रशासनाला यश; वीस वर्षांचा तिडा

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा -लाटगाव (ता. आजरा) येथील सवर्ण मंडळींकडून दलित बांधवांना दिल्या जाणाऱ्या कथित अन्यायी व बहिष्कृतपणाच्या वागणुकीबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली. मात्र, तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस निरीक्षक सी. बी. भालके यांनी ग्रामदैवत नागनाथ मंदिरात बैठक घेऊन हा वाद संक्रांतीच्या दिवशी मिटविल्याने खऱ्या अर्थाने लाटगाव ग्रामस्थांची संक्रांत गोड झाली आहे.शंकर बाळू कांबळे, आप्पा सटू कांबळे व अन्य दलित बांधवांनी ८ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्याला बहिष्कृत टाकल्याची तक्रार केली होती. गेली २० वर्षे दलित समाजावर सवर्णांकडून अत्याचार होत आहेत. याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.हे प्रकरण सामंजस्याने मिटविले जावे, असे गावातील सर्वच समाजातील लोकानांही वाटत होते. मात्र, पुढाकार कुणी घ्यायचा? असा प्रश्न होता. दरम्यान, हे प्रकरण जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले. तहसीलदार ठोकडे यांनी ग्रामदैवत नागनाथ मंदिरात ग्रामस्थांची बैठक बोलावली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी तक्रारदारांच्या मुद्यांवर चर्चा झाली. ज्येष्ठ व प्रमुख मंडळींना बोलण्याची संधी दिली. सर्वांना समज देताना तहसीलदार ठोकडे यांनी दोन्ही बाजंूकडील प्रमुख मंडळींची समजूत काढली. त्यानंतर दलित-सवर्ण लोकांनी एकमेकाला तीळगूळ देऊन एकोप्याने राहण्याचा निर्धार केला. चर्चेत मारुती कांबळे, शंकर कांबळे, गणपती कांबळे, बाळू कांबळे, नंदकुमार सरदेसाई, विजय चौगुले, व्यंकटराव सरदेसाई, प्रकाश सरदेसाई, आदींनी सहभाग घेतला. या बैठकीस एस. एस. भोसले, किरण खटावकर, म्हाळसाकांत देसाई, तलाठी महादेव देसाई, सरपंच कल्याणी सरदेसाई, रणजित पाटील, उत्तम कांबळे, जानबा कांबळे, शिवाजी कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.मनावरचं ओझं कमी झालं..!आपापसांतील वादामुळे लाटगावात दोन समाजातील वाद थांबण्याची चिन्हे नव्हती. आज हा वाद मिटल्याने मनावरचे ओझे कमी झाले आहे, अशी प्रतिक्रिया जानकुबाई कांबळे या महिलेने दिली.