शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

...अन् लाटगावची संक्रांत झाली ‘गोड’!

By admin | Updated: January 17, 2015 00:34 IST

दलित-सवर्ण वाद मिटला : प्रशासनाला यश; वीस वर्षांचा तिडा

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा -लाटगाव (ता. आजरा) येथील सवर्ण मंडळींकडून दलित बांधवांना दिल्या जाणाऱ्या कथित अन्यायी व बहिष्कृतपणाच्या वागणुकीबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली. मात्र, तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस निरीक्षक सी. बी. भालके यांनी ग्रामदैवत नागनाथ मंदिरात बैठक घेऊन हा वाद संक्रांतीच्या दिवशी मिटविल्याने खऱ्या अर्थाने लाटगाव ग्रामस्थांची संक्रांत गोड झाली आहे.शंकर बाळू कांबळे, आप्पा सटू कांबळे व अन्य दलित बांधवांनी ८ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्याला बहिष्कृत टाकल्याची तक्रार केली होती. गेली २० वर्षे दलित समाजावर सवर्णांकडून अत्याचार होत आहेत. याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.हे प्रकरण सामंजस्याने मिटविले जावे, असे गावातील सर्वच समाजातील लोकानांही वाटत होते. मात्र, पुढाकार कुणी घ्यायचा? असा प्रश्न होता. दरम्यान, हे प्रकरण जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले. तहसीलदार ठोकडे यांनी ग्रामदैवत नागनाथ मंदिरात ग्रामस्थांची बैठक बोलावली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी तक्रारदारांच्या मुद्यांवर चर्चा झाली. ज्येष्ठ व प्रमुख मंडळींना बोलण्याची संधी दिली. सर्वांना समज देताना तहसीलदार ठोकडे यांनी दोन्ही बाजंूकडील प्रमुख मंडळींची समजूत काढली. त्यानंतर दलित-सवर्ण लोकांनी एकमेकाला तीळगूळ देऊन एकोप्याने राहण्याचा निर्धार केला. चर्चेत मारुती कांबळे, शंकर कांबळे, गणपती कांबळे, बाळू कांबळे, नंदकुमार सरदेसाई, विजय चौगुले, व्यंकटराव सरदेसाई, प्रकाश सरदेसाई, आदींनी सहभाग घेतला. या बैठकीस एस. एस. भोसले, किरण खटावकर, म्हाळसाकांत देसाई, तलाठी महादेव देसाई, सरपंच कल्याणी सरदेसाई, रणजित पाटील, उत्तम कांबळे, जानबा कांबळे, शिवाजी कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.मनावरचं ओझं कमी झालं..!आपापसांतील वादामुळे लाटगावात दोन समाजातील वाद थांबण्याची चिन्हे नव्हती. आज हा वाद मिटल्याने मनावरचे ओझे कमी झाले आहे, अशी प्रतिक्रिया जानकुबाई कांबळे या महिलेने दिली.