शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

आणि तब्बल बारा दिवसानी आपटाळ प्रकाशमय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:05 IST

सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला.

ठळक मुद्देआणि तब्बल बारा दिवसानी आपटाळ प्रकाशमय !विद्युत पुरवठा सुरळीत;ग्रामस्थ समाधानी

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात आपटाळ (ता . राधानगरी ) या गावाला विद्युत पुरवठा करणारे लोखंडी पोल ( खांब )मोडून पडल्याने तब्बल बारा दिवस हे गांव अंधाऱ्या कोठडीचे जीवन जगत होते .  या बारा दिवसामध्ये पारिसरात पावसाची संततधार होती. सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधानाचे वातावरण आहे .आपटाळ गावाला धामोड येथून केळोशी जंगलातून विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी जाते . गेल्या कांही दिवसापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रि वादळाच्या तडाख्यात यातील सात पोल मोडून पडल्याने ४ जूनपासून गावचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता . त्यानंतर सतत घोंघावणारा वारा व पाऊस ही विद्युत वाहीनी जोडताना अडचण करत होता. पण एका खासगी ठेकेदाराने विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरवी बारा दिवस मेहनत करून विद्युत पुरवठा सुरू केला . विशेष म्हणजे जंगल परिसरातून जाणारी ही विद्युत वाहिका बदलून ती मुख्य रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली. त्यामुळे भविष्यात इतका मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागणार नाही .दरम्यान गावातील विद्युत पुरवठा तब्बल बारा दिवस बंद झाल्याने गावातील सर्वच छोटे उद्योग बंद पडले होते .परिणामी गावातील दैनंदिन चक्रच कोलमडूले . त्यामुळे ऐन पावसाळ्यातील शेतीच्या कामांची धांदल व पिण्याच्या पाण्यापासून ते दळप- कांडप यासाठी द्यावा लागणारा वेळ यांची सांगड घालताना शेतकरी व महिला वर्गाची चांगलीच धावपळ उडाली .

मोडलेले पोल बदलण्याबरोबर लाईनचे शिफ्टींग यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागणार होता . पण विद्युत विभागाचे अधिकारी , कर्मचारी व ठेकेदार यांनी चांगली कार्यतत्परता दाखवत केवळ बारा दिवसात हा खंडीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत केला. याबद्दल ग्रामस्थातुन विद्युत मंडळाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले . 

निसर्ग चक्रिवादळाच्या टडाख्यात गावचा विद्युत पुरवण खंडीत झाला त्या बद्दल क्षमस्व . पण शेवटी 'निसर्ग ' हा निसर्ग आहे . त्यापुढे आम्ही ही हतबल झालो. पण आमचे कर्मचारी व ठेकेदार यांनी जे कष्ट घेत विद्युत पुरवठा पुर्नवत केला त्यांचेही विशेष आभार .ए .बी. तंगसाळेकनिष्ठ अभियंता, शिरगांव सबस्टेशन .

या बारा दिवसात लाईट अभावी गावकऱ्यांचे खुप हाल झाले . ऐन शेतीच्या कामाच्या धावपळीत महिलांची मोठी धावपळ उडाली . पण विद्युत विभागाने वेळाने का असेना विद्युत पुरवठा सुरु केला .आम्ही समाधानी आहोत .- कृष्णात पाटील, ग्रामस्थ आपटाळ 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर