शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

आणि तब्बल बारा दिवसानी आपटाळ प्रकाशमय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:05 IST

सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला.

ठळक मुद्देआणि तब्बल बारा दिवसानी आपटाळ प्रकाशमय !विद्युत पुरवठा सुरळीत;ग्रामस्थ समाधानी

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात आपटाळ (ता . राधानगरी ) या गावाला विद्युत पुरवठा करणारे लोखंडी पोल ( खांब )मोडून पडल्याने तब्बल बारा दिवस हे गांव अंधाऱ्या कोठडीचे जीवन जगत होते .  या बारा दिवसामध्ये पारिसरात पावसाची संततधार होती. सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधानाचे वातावरण आहे .आपटाळ गावाला धामोड येथून केळोशी जंगलातून विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी जाते . गेल्या कांही दिवसापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रि वादळाच्या तडाख्यात यातील सात पोल मोडून पडल्याने ४ जूनपासून गावचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता . त्यानंतर सतत घोंघावणारा वारा व पाऊस ही विद्युत वाहीनी जोडताना अडचण करत होता. पण एका खासगी ठेकेदाराने विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरवी बारा दिवस मेहनत करून विद्युत पुरवठा सुरू केला . विशेष म्हणजे जंगल परिसरातून जाणारी ही विद्युत वाहिका बदलून ती मुख्य रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली. त्यामुळे भविष्यात इतका मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागणार नाही .दरम्यान गावातील विद्युत पुरवठा तब्बल बारा दिवस बंद झाल्याने गावातील सर्वच छोटे उद्योग बंद पडले होते .परिणामी गावातील दैनंदिन चक्रच कोलमडूले . त्यामुळे ऐन पावसाळ्यातील शेतीच्या कामांची धांदल व पिण्याच्या पाण्यापासून ते दळप- कांडप यासाठी द्यावा लागणारा वेळ यांची सांगड घालताना शेतकरी व महिला वर्गाची चांगलीच धावपळ उडाली .

मोडलेले पोल बदलण्याबरोबर लाईनचे शिफ्टींग यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागणार होता . पण विद्युत विभागाचे अधिकारी , कर्मचारी व ठेकेदार यांनी चांगली कार्यतत्परता दाखवत केवळ बारा दिवसात हा खंडीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत केला. याबद्दल ग्रामस्थातुन विद्युत मंडळाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले . 

निसर्ग चक्रिवादळाच्या टडाख्यात गावचा विद्युत पुरवण खंडीत झाला त्या बद्दल क्षमस्व . पण शेवटी 'निसर्ग ' हा निसर्ग आहे . त्यापुढे आम्ही ही हतबल झालो. पण आमचे कर्मचारी व ठेकेदार यांनी जे कष्ट घेत विद्युत पुरवठा पुर्नवत केला त्यांचेही विशेष आभार .ए .बी. तंगसाळेकनिष्ठ अभियंता, शिरगांव सबस्टेशन .

या बारा दिवसात लाईट अभावी गावकऱ्यांचे खुप हाल झाले . ऐन शेतीच्या कामाच्या धावपळीत महिलांची मोठी धावपळ उडाली . पण विद्युत विभागाने वेळाने का असेना विद्युत पुरवठा सुरु केला .आम्ही समाधानी आहोत .- कृष्णात पाटील, ग्रामस्थ आपटाळ 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर