शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बालगुन्हेगार वाढती डोकेदुखी : जिल्ह्यात घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:17 IST

कोल्हापूर : मैत्री आणि ग्रुपच्या सहवासातून अनेक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेली आहेत. व्यसन, टीव्ही, चित्रपट, मोबाईलच्या परिणामामुळे ही मुले विकृत बुद्धीतून खून,

ठळक मुद्देअनेक मुले व्यसनाच्या आहारीबालगुन्हेगाराला ‘विधिसंघर्ष बालक’ म्हणून पोलीस ताब्यात घेतात.

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मैत्री आणि ग्रुपच्या सहवासातून अनेक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेली आहेत. व्यसन, टीव्ही, चित्रपट, मोबाईलच्या परिणामामुळे ही मुले विकृत बुद्धीतून खून, अत्याचार, आत्महत्या, असे गंभीर गुन्हे करण्याकडे वळत आहेत. त्यामध्ये चौदा ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांचा गुन्ह्यात सहभाग दिसत आहे. या घटनांमुळे पालकांसह पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे.

शाळेमध्ये मित्राचा मोबाईल पाहून आई-वडिलांकडे त्याचा हट्ट. परिस्थिती नसतानाही सायकल, मोटारसायकल, किमती कपडे यासाठी मुले हट्टी बनत आहेत. आई-वडिलांनी त्याला विरोध करीत परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचेही त्यांना वावडे वाटते. वाढत्या हव्यासापोटी अखेर चोरी करण्याकडे त्यांचे पाय वळतात. शालेय मुलांकडून मोबाईल, मोटारसायकल चोरी असे प्रकार घडत आहेत. शास्त्रीनगरमध्ये बालगुन्हेगाराने महिलेचा खून केल्याने जिल्हा हादरला आहे. अनेक मुले व्यसनांच्या आहारी गेली असून, ही मुले दागिने, पैसे चोरून आपली तल्लफ भागवत असतात. मुलांच्या हातून घडलेल्या अशा घटनेमुळे आई-वडील, नातेवाइकांना धक्का बसतो; परंतु त्यांना सुधारण्याची, बाहेर काढण्याची वेळ निघून गेलेली असते. म्हणून मुले घराबाहेर काय करतात, त्यावरलक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे.बालगुन्हेगारांचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा आहे. त्यांना वेळीच रोखणे यासाठी पालकांनी जागरूक राहिले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांत त्यांचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयाच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षकबालगुन्हेगाराला ‘विधिसंघर्ष बालक’ म्हणून पोलीस ताब्यात घेतात. त्याला पोलीस कोठडीत ठेवता येत नसल्याने त्याच्या आई-वडिलांना बोलावून त्याला समज दिली जाते. त्याला सुधारण्याची हमी दिली, तर त्याला त्यांच्या ताब्यात दिले जाते. बालगुन्हेगाराच्या गुन्ह्यांची व्याप्ती पाहून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली जाते. फोटोला विरोध केल्याने महिलेचा खून, राधानगरी येथे वडिलांचा खून, राजारामपुरी परिसरात चैनीसाठी मोबाईल व मोटारसायकलींची चोरी अशा गंभीर घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. बालगुन्हेगारांमध्ये कायद्याची भीतीच राहिलेली नाही. गंभीर गुन्हा करूनही हे बालगुन्हेगार बाहेर समाजात वावरत असतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या कृत्यांमुळे पालक व पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.