शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बालगुन्हेगार वाढती डोकेदुखी : जिल्ह्यात घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:17 IST

कोल्हापूर : मैत्री आणि ग्रुपच्या सहवासातून अनेक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेली आहेत. व्यसन, टीव्ही, चित्रपट, मोबाईलच्या परिणामामुळे ही मुले विकृत बुद्धीतून खून,

ठळक मुद्देअनेक मुले व्यसनाच्या आहारीबालगुन्हेगाराला ‘विधिसंघर्ष बालक’ म्हणून पोलीस ताब्यात घेतात.

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मैत्री आणि ग्रुपच्या सहवासातून अनेक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेली आहेत. व्यसन, टीव्ही, चित्रपट, मोबाईलच्या परिणामामुळे ही मुले विकृत बुद्धीतून खून, अत्याचार, आत्महत्या, असे गंभीर गुन्हे करण्याकडे वळत आहेत. त्यामध्ये चौदा ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांचा गुन्ह्यात सहभाग दिसत आहे. या घटनांमुळे पालकांसह पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे.

शाळेमध्ये मित्राचा मोबाईल पाहून आई-वडिलांकडे त्याचा हट्ट. परिस्थिती नसतानाही सायकल, मोटारसायकल, किमती कपडे यासाठी मुले हट्टी बनत आहेत. आई-वडिलांनी त्याला विरोध करीत परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचेही त्यांना वावडे वाटते. वाढत्या हव्यासापोटी अखेर चोरी करण्याकडे त्यांचे पाय वळतात. शालेय मुलांकडून मोबाईल, मोटारसायकल चोरी असे प्रकार घडत आहेत. शास्त्रीनगरमध्ये बालगुन्हेगाराने महिलेचा खून केल्याने जिल्हा हादरला आहे. अनेक मुले व्यसनांच्या आहारी गेली असून, ही मुले दागिने, पैसे चोरून आपली तल्लफ भागवत असतात. मुलांच्या हातून घडलेल्या अशा घटनेमुळे आई-वडील, नातेवाइकांना धक्का बसतो; परंतु त्यांना सुधारण्याची, बाहेर काढण्याची वेळ निघून गेलेली असते. म्हणून मुले घराबाहेर काय करतात, त्यावरलक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे.बालगुन्हेगारांचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा आहे. त्यांना वेळीच रोखणे यासाठी पालकांनी जागरूक राहिले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांत त्यांचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयाच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षकबालगुन्हेगाराला ‘विधिसंघर्ष बालक’ म्हणून पोलीस ताब्यात घेतात. त्याला पोलीस कोठडीत ठेवता येत नसल्याने त्याच्या आई-वडिलांना बोलावून त्याला समज दिली जाते. त्याला सुधारण्याची हमी दिली, तर त्याला त्यांच्या ताब्यात दिले जाते. बालगुन्हेगाराच्या गुन्ह्यांची व्याप्ती पाहून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली जाते. फोटोला विरोध केल्याने महिलेचा खून, राधानगरी येथे वडिलांचा खून, राजारामपुरी परिसरात चैनीसाठी मोबाईल व मोटारसायकलींची चोरी अशा गंभीर घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. बालगुन्हेगारांमध्ये कायद्याची भीतीच राहिलेली नाही. गंभीर गुन्हा करूनही हे बालगुन्हेगार बाहेर समाजात वावरत असतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या कृत्यांमुळे पालक व पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.