शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बालगुन्हेगार वाढती डोकेदुखी : जिल्ह्यात घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:17 IST

कोल्हापूर : मैत्री आणि ग्रुपच्या सहवासातून अनेक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेली आहेत. व्यसन, टीव्ही, चित्रपट, मोबाईलच्या परिणामामुळे ही मुले विकृत बुद्धीतून खून,

ठळक मुद्देअनेक मुले व्यसनाच्या आहारीबालगुन्हेगाराला ‘विधिसंघर्ष बालक’ म्हणून पोलीस ताब्यात घेतात.

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मैत्री आणि ग्रुपच्या सहवासातून अनेक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेली आहेत. व्यसन, टीव्ही, चित्रपट, मोबाईलच्या परिणामामुळे ही मुले विकृत बुद्धीतून खून, अत्याचार, आत्महत्या, असे गंभीर गुन्हे करण्याकडे वळत आहेत. त्यामध्ये चौदा ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांचा गुन्ह्यात सहभाग दिसत आहे. या घटनांमुळे पालकांसह पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे.

शाळेमध्ये मित्राचा मोबाईल पाहून आई-वडिलांकडे त्याचा हट्ट. परिस्थिती नसतानाही सायकल, मोटारसायकल, किमती कपडे यासाठी मुले हट्टी बनत आहेत. आई-वडिलांनी त्याला विरोध करीत परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचेही त्यांना वावडे वाटते. वाढत्या हव्यासापोटी अखेर चोरी करण्याकडे त्यांचे पाय वळतात. शालेय मुलांकडून मोबाईल, मोटारसायकल चोरी असे प्रकार घडत आहेत. शास्त्रीनगरमध्ये बालगुन्हेगाराने महिलेचा खून केल्याने जिल्हा हादरला आहे. अनेक मुले व्यसनांच्या आहारी गेली असून, ही मुले दागिने, पैसे चोरून आपली तल्लफ भागवत असतात. मुलांच्या हातून घडलेल्या अशा घटनेमुळे आई-वडील, नातेवाइकांना धक्का बसतो; परंतु त्यांना सुधारण्याची, बाहेर काढण्याची वेळ निघून गेलेली असते. म्हणून मुले घराबाहेर काय करतात, त्यावरलक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे.बालगुन्हेगारांचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा आहे. त्यांना वेळीच रोखणे यासाठी पालकांनी जागरूक राहिले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांत त्यांचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयाच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षकबालगुन्हेगाराला ‘विधिसंघर्ष बालक’ म्हणून पोलीस ताब्यात घेतात. त्याला पोलीस कोठडीत ठेवता येत नसल्याने त्याच्या आई-वडिलांना बोलावून त्याला समज दिली जाते. त्याला सुधारण्याची हमी दिली, तर त्याला त्यांच्या ताब्यात दिले जाते. बालगुन्हेगाराच्या गुन्ह्यांची व्याप्ती पाहून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली जाते. फोटोला विरोध केल्याने महिलेचा खून, राधानगरी येथे वडिलांचा खून, राजारामपुरी परिसरात चैनीसाठी मोबाईल व मोटारसायकलींची चोरी अशा गंभीर घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. बालगुन्हेगारांमध्ये कायद्याची भीतीच राहिलेली नाही. गंभीर गुन्हा करूनही हे बालगुन्हेगार बाहेर समाजात वावरत असतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या कृत्यांमुळे पालक व पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.