शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी अंबाबाईला तिरूपतीचा शालू नेसवणे बंद होणार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 05:45 IST

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी श्री अंबाबाई म्हणजे तिरुपती बालाजीची पत्नी आहे, असे सांगत तिरुपती देवस्थान पाठवित असलेला शालू दस-यादिवशी अंबाबाईला नेसविण्याची पद्धत यंदापासून अखेर बंद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी श्री अंबाबाई म्हणजे तिरुपती बालाजीची पत्नी आहे, असे सांगत तिरुपती देवस्थान पाठवित असलेला शालू दस-यादिवशी अंबाबाईला नेसविण्याची पद्धत यंदापासून अखेर बंद करण्यात आली आहे. तिरुपती देवस्थानकडून २० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या पद्धतीची पोलखोल झाल्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.दस-यादिवशी तिरुपतीहून येणारा शालू नव्हे तर समितीतर्फे देण्यात येणारे महावस्त्रच अंबाबाईला नेसविण्यात येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी दिली. तिरूपती देवस्थानच्या वतीने शालू आलाच तर त्याची कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही किंवा डामडौल होणार नाही.>निर्णय का ?तिरुपती देवस्थानकडून अंबाबाई म्हणजेच तिरुपतीची पत्नी या नात्याने १९८३ पासून शालू पाठविला जात होता. मात्र, अंबाबाई ही आदिमाता असून ती तिरुपतीची पत्नी नाही, हे सांगणारी वृतमालिका ‘लोकमत’ने दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या पद्धतीला विरोध होऊ लागला होता. गतवर्षी आईला शालू पाठवतोय, असे सांगून तिरुपती देवस्थानने हा शालू पाठविला होता. अंबाबाईला घागरा चोली वेष परिधान केल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेला आला. लोकभावनेचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे समजते.