शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अमृत योजनेचा ठेका काढून घेण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:09 IST

शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यामुळे सोमवारी बोलाविलेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांच्या संतापाचा पारा चढला. महापालिका, जीवन प्राधिकरण तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींची या बैठकीत नगरसेवकांनी चांगलीच

ठळक मुद्देसध्या सुरू असलेली कामे जर पंधरा दिवसांत पूर्ण झाली नाहीत तर ठेक्याबाबत विचार करावा लागेल, अशा शब्दांत ठेकेदारास इशारा देण्यात आला.

कोल्हापूर : शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यामुळे सोमवारी बोलाविलेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांच्या संतापाचा पारा चढला. महापालिका, जीवन प्राधिकरण तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींची या बैठकीत नगरसेवकांनी चांगलीच कानउघाडणी केली. सध्या सुरू असलेली कामे जर पंधरा दिवसांत पूर्ण झाली नाहीत तर ठेक्याबाबत विचार करावा लागेल, अशा शब्दांत ठेकेदारास इशारा देण्यात आला.

राज्य सरकारच्या अमृत योजनेतून मंजूर झालेल्या ११५ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या कामावर कन्सल्टंट म्हणून महाराष्ट जीवन प्राधिकरणाची नेमणूक केली आहे. महापालिका प्रशासनाकडे त्याची कसलीच सूत्रे ठेवलेली नाहीत. त्यामुळे या कामावरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. गेले वर्षभर हे काम रखडले आहे. त्यामुळे नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी यासंबंधी आढावा बैठक आयोजित केली होती. महापालिका तसेच जीवन प्राधिकरणाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. मात्र, मुख्य ठेकेदार उपस्थित नव्हता. त्यांचे किरण पाटील नावाचे एक सुपरवायझर उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नगरसेवकांच्या संतापाचा पारा आणखी चढला.

अनेक नगरसेवकांनी या सुपरवायझरला अक्षरश: फैलावर घेऊन प्रश्नांचा भडिमार केला.गेले वर्षभर काम रखडले आहे. तुमच्याकडे यंत्रणा नाही तर मग जलवाहिनी टाकण्याकरिता उकरले तरी कशाला, असा सवाल सभापती देशमुख यांनी विचारला. पावसाळा जवळ आला असल्याने लोक आम्हाला जाब विचारत आहेत. जेथे खुदाई केली आहे तेथील जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करा, त्यावर डांबरी पॅचवर्क करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जोपर्यंत जुनी कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अन्य ठिकाणी नवीन काम हाती घेऊ नका, अशी सूचनाही देशमुख यांनी केली.

जलवाहिनी टाकण्यापूर्वी केलेले सर्वेक्षण चुकीचे झाले आहे. अनावश्यक ठिकाणी जलवाहिनी टाकल्या जात आहेत. टाकलेल्या जलवाहिनीला कनेक्शन जोडण्याचे काम केले जात नाही, असे उमा बनछोडे यांनी निदर्शनास आणून दिले. ठेकेदाराने ११५ कोटींचे काम घेतले आहे, पण दोन कोटी रुपये त्यांच्याकडे नाहीत. त्यांना जर काम जमणार नसेल तर पूर्ण कामच थांबविण्याचे आदेश द्या, अशी सूचना विलास वास्कर यांनी केली.चक्क धिंड काढण्याचा इशाराराहुल चव्हाण यांनी ठेकेदाराच्या सुपरवायझरला फैलावर घेताना जर काम वेळेत आणि समाधानकारक झाले नाही, तर शहरातून धिंड काढावी लागेल, अशा संतप्त शब्दांत इशारा दिला. या लोकांना कामाचे गांभीर्य नाही. कोल्हापुरी हिसका दाखवायलाच पाहिजे, असे चव्हाण म्हणाले. तर ठेकेदाराला दंड आकारला पाहिजे. जोपर्यंत दंड बसणार नाहीत तोपर्यंत वळणावर येणार नाही, असे शारंगधर देशमुख म्हणाले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका