शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अमृत योजनेचा ठेका काढून घेण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:09 IST

शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यामुळे सोमवारी बोलाविलेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांच्या संतापाचा पारा चढला. महापालिका, जीवन प्राधिकरण तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींची या बैठकीत नगरसेवकांनी चांगलीच

ठळक मुद्देसध्या सुरू असलेली कामे जर पंधरा दिवसांत पूर्ण झाली नाहीत तर ठेक्याबाबत विचार करावा लागेल, अशा शब्दांत ठेकेदारास इशारा देण्यात आला.

कोल्हापूर : शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यामुळे सोमवारी बोलाविलेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांच्या संतापाचा पारा चढला. महापालिका, जीवन प्राधिकरण तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींची या बैठकीत नगरसेवकांनी चांगलीच कानउघाडणी केली. सध्या सुरू असलेली कामे जर पंधरा दिवसांत पूर्ण झाली नाहीत तर ठेक्याबाबत विचार करावा लागेल, अशा शब्दांत ठेकेदारास इशारा देण्यात आला.

राज्य सरकारच्या अमृत योजनेतून मंजूर झालेल्या ११५ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या कामावर कन्सल्टंट म्हणून महाराष्ट जीवन प्राधिकरणाची नेमणूक केली आहे. महापालिका प्रशासनाकडे त्याची कसलीच सूत्रे ठेवलेली नाहीत. त्यामुळे या कामावरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. गेले वर्षभर हे काम रखडले आहे. त्यामुळे नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी यासंबंधी आढावा बैठक आयोजित केली होती. महापालिका तसेच जीवन प्राधिकरणाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. मात्र, मुख्य ठेकेदार उपस्थित नव्हता. त्यांचे किरण पाटील नावाचे एक सुपरवायझर उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नगरसेवकांच्या संतापाचा पारा आणखी चढला.

अनेक नगरसेवकांनी या सुपरवायझरला अक्षरश: फैलावर घेऊन प्रश्नांचा भडिमार केला.गेले वर्षभर काम रखडले आहे. तुमच्याकडे यंत्रणा नाही तर मग जलवाहिनी टाकण्याकरिता उकरले तरी कशाला, असा सवाल सभापती देशमुख यांनी विचारला. पावसाळा जवळ आला असल्याने लोक आम्हाला जाब विचारत आहेत. जेथे खुदाई केली आहे तेथील जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करा, त्यावर डांबरी पॅचवर्क करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जोपर्यंत जुनी कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अन्य ठिकाणी नवीन काम हाती घेऊ नका, अशी सूचनाही देशमुख यांनी केली.

जलवाहिनी टाकण्यापूर्वी केलेले सर्वेक्षण चुकीचे झाले आहे. अनावश्यक ठिकाणी जलवाहिनी टाकल्या जात आहेत. टाकलेल्या जलवाहिनीला कनेक्शन जोडण्याचे काम केले जात नाही, असे उमा बनछोडे यांनी निदर्शनास आणून दिले. ठेकेदाराने ११५ कोटींचे काम घेतले आहे, पण दोन कोटी रुपये त्यांच्याकडे नाहीत. त्यांना जर काम जमणार नसेल तर पूर्ण कामच थांबविण्याचे आदेश द्या, अशी सूचना विलास वास्कर यांनी केली.चक्क धिंड काढण्याचा इशाराराहुल चव्हाण यांनी ठेकेदाराच्या सुपरवायझरला फैलावर घेताना जर काम वेळेत आणि समाधानकारक झाले नाही, तर शहरातून धिंड काढावी लागेल, अशा संतप्त शब्दांत इशारा दिला. या लोकांना कामाचे गांभीर्य नाही. कोल्हापुरी हिसका दाखवायलाच पाहिजे, असे चव्हाण म्हणाले. तर ठेकेदाराला दंड आकारला पाहिजे. जोपर्यंत दंड बसणार नाहीत तोपर्यंत वळणावर येणार नाही, असे शारंगधर देशमुख म्हणाले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका