शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

संघर्षाच्या पायाभरणीतच रुतला ‘आंबेओहळ’

By admin | Updated: July 23, 2015 00:27 IST

प्रकल्प १८ वर्षे रखडला : केव्हा होणार पाणीसाठा ? जनतेचा प्रश्न; अनेक प्रश्न प्रलंबितच

गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी आंबेओहळ प्रकल्पाचे गेले १८ वर्षे भिजत घोंगडे पडले आहे. मुळचा २९ कोटींचा प्रकल्पखर्च आता ११४ कोटींवर गेला असून, अद्याप २० टक्के काम बाकी आहे. त्यासाठी अंदाजे ५० कोटींच्या निधीची अपेक्षा आहे. पुर्नवसनाचा व भूसंपादनाचा तिढाही अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. किमान आता युती शासनाच्या काळात तरी रखडलेल्या या प्रकल्पाचे भाग्य उजळावे, अशी येथील जनतेला अपेक्षा आहे. त्यानिमित्त या प्रकल्पाचे वास्तव मांडणारी लेखमाला आजपासून...रविंद्र येसादे ल्ल उत्तूरआजरा तालुक्यातील आंबेओहळ ओढ्यावर पाटबंधारे प्रकल्प उभारण्यास १९९७ साली तांत्रिक मान्यता मिळाली. मात्र या प्रकल्पाच्या जागा निश्चितीपासूनच संघर्षास सुरुवात झाली, ती आजअखेर कायम आहे. आजरा-उत्तूर मार्गावर ‘चिमटा’ या ठिकाणी प्रकल्पाचे क्षेत्र प्रथम निश्चत करण्यात आले मात्र याला विरोध झाल्यानंतर आर्दाळ, करपेवाडी येथील आंबेओहळ ओढ्यावर प्रकल्प उभा करण्याचा निर्णय झाला व त्याला १६/१०/१९९८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, प्रकल्पाचे काम सुरू होऊ नये म्हणून प्रचंड विरोध झाला. उत्तूर, करपेवाडी, व्होन्याळी, आर्दाळ येथील स्थानिकांनी स्थापन केलेल्या समित्या, धरणकृती समित्या यामुळे प्रकल्पास विरोध होऊ लागला. ११३ विस्थापितांना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून ताब्यात घेऊन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. तत्कालिन आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाने २९.३१ कोटी रकमेस १९९८ साली प्रशासकीय मान्यता दिली. आणी धरणाच्या कामास सुरुवात झाली. पहिली चार वर्षे प्रकल्पाचे काम व पुनर्वसन धुमधडाक्यात सुरू झाले. त्यानंतर मात्र कधी भूसंपादन तर कधी पुनर्वसन तर कधी निधीची चणचण यामुळे हा प्रकल्प रखडत गेला. प्रकल्पग्रस्तांना द्यावी लागणारी जमीनआंबेओहळ प्रकल्पग्रस्तांना ६५ टक्के रक्कम भरून याच लाभक्षेत्रातील उत्तूर, आर्दाळ, वडकशिवाले, महागोंड, हालेवाडी, पेंढारवाडी, महागोंडवाडी या आजरा तालुक्यातील, तर शिपूर, कडगाव, लिंगनूर, करंबळी, अत्याळ, गिजवणे, बेकनाळ या गडहिंग्लज भागातील जमिनी मिळणार आहेत. तसेच चित्री लाभक्षेत्रातील जमिनीही द्यावी लागणार आहे.सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारेप्रकल्पातील पाण्याचा वापर पूर्ण क्षमतेने व्हावा, यासाठी सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. उत्तूरपर्यंत चार बंधारे, शिप्पूर, करंबळी व गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे प्रत्येकी एक बंधारा बांधण्यात येणार आहे.लाभ क्षेत्र : गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर क्षेत्र, तर आजरा तालुक्यातील २१२२ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे सिंचनखाली येणार आहे. उत्तूर, मुमेवाडी, चव्हाणवाडी (ता. आजरा) तर शिप्पूर, कडगाव, लिंगनूर, गिजवणे (ता. गडहिंग्लज), ही गावे लाभक्षेत्रात येतात. दोन गावठाणेप्रकल्पग्रस्तांना निवाऱ्यासाठी लिंगनूर व कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे गावठाणे सर्व सोयिनियुक्त उभी करण्यात येणार आहेत.०.५० मे. वॅट वीज निर्मितीप्रकल्पात पाणीसाठा झाल्यानंतर ०.५० मे. वॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. बुडीतक्षेत्रउत्तूर, करपेवाडी व आर्दाळ गावांमध्ये धरण पाया, सांडवा व खाणक्षेत्रासाठी १२४ हेक्टर इतकी जागा जाते. आर्दाळ, हालेवाडी, होन्याळी, महागोंड व वडकशिवाले, आदी गावांतील सुमारे ३९५ हेक्टर क्षेत्र बुडीत आहे. कोणतेही गाव पूर्णपणे बुडीत क्षेत्रात जात नाही.