शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहोळमुळे आजऱ्यातील हिरव्या पट्यात वाढ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST

सदाशिव मोरे आजरा : डोंगराळ व खडकाळ असणाऱ्या आजरा तालुक्यात चित्रीसह अन्य मध्यम प्रकल्पांमुळे माळरानावर गेल्या १० वर्षांत हिरवं ...

सदाशिव मोरे

आजरा : डोंगराळ व खडकाळ असणाऱ्या आजरा तालुक्यात चित्रीसह अन्य मध्यम प्रकल्पांमुळे माळरानावर गेल्या १० वर्षांत हिरवं सोनं पिकण्यास सुरवात झाली आहे. आता आंबेओहोळ प्रकल्पामुळे उत्तूर परिसरातील अनेक गावे हिरव्या पट्यात येत आहेत. तालुक्यातील सर्फनाला, उचंगी हे प्रकल्पही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत आजरा तालुक्यातील काळ्या मातीला मुबलक पाणी मिळून सुजलाम-सुफलाम होणार आहे.

दहा वर्षांपूर्वी पावसाच्या पाण्यावर पिकवल्या जाणाऱ्या शेतीला आज चित्री, एरंडोळ, धनगरवाडी व खानापूर या धरणांमुळे पाणी मिळण्यास मदत झाली आहे. चित्रीचे पाणी अनेक शेतकऱ्यांनी हिरण्यकेशी नदीतून उचलून आपल्या शेतीला देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हिरण्यकेशी पट्यातील जमीन हिरवीगार झाली आहे.

अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही हिरण्यकेशी नदीवर असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची पायपीट थांबली आहे. डोंगराळ व खडकाळ असणाऱ्या आजरा तालुक्याची वाटचाल प्रकल्पातील पाण्यामुळे नियोजनबद्ध विकासाकडे सुरू आहे.

शेतीला पाणी मिळत असल्याने उसाचे क्षेत्रही वाढले आहे. अनेक शेतकरी भाजीपाल्यासह उन्हाळी व कडधान्याची पिकेही घेत आहेत. धरणातील पाण्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. साखर कारखान्याच्या स्थापनेपासून उसाच्या बाबतीत परावलंबी असणारा आजरा कारखाना सध्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे.

चालू वर्षी जवळपास ३ लाख टनपेक्षाही जास्त उसाचे उत्पादन होणार आहे. सर्फनाला व उचंगीच्या धरणांच्या पूर्णत्वानंतर जमिनीला मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

आजपर्यंत मागास व डोंगराळ असा असणारा शिक्का पुसून हिरवं सोनं पिकविण्याकडे शेतकऱ्याचा कल वाढला आहे.

..

चित्रीसह अन्य प्रकल्पामुळे १८९९ हेक्टर क्षेत्राला पाणी

पाटबंधारे विभागाच्या नोंदीनुसार चित्रीचे ९५४ हे., एरंडोळ १३८ हे., धनगरवाडी १३६ हे., उचंगी ८० हे., सर्फनाला ५९१ हे., असे १८९९ हे., जमिनीला पाणी दिले जाते. उचंगी व सर्फनाला प्रकल्प झाल्यानंतर यामध्ये वाढ होणार आहे.

तालुक्यातून ३४ लाखांची पाणीपट्टी वसुली

हिरव्या पट्यातील जमिनीसाठी हे. ११२२ रुपये, पाणीपट्टी व २० टक्के लोकल फंड तर हिरव्या पट्याच्या बाहेरील जमिनीसाठी १६८६ रुपये हेक्टरी पाणीपट्टी आकारली जाते. तालुक्यात चालू वर्षी पाटबंधारे विभागाने ३४ लाखांची पाणीपट्टी वसूल केली आहे.