शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

अंबाबाईचा रथ निघणार उशिरा

By admin | Updated: April 2, 2015 00:41 IST

चंद्रग्रहणामुळे बदल : वीस मिनिटे विलंब

कोल्हापूर : खग्रास चंद्रग्रहणामुळे करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव यंदा वीस मिनिटे उशिराने निघणार आहे. रात्री साडेनऊ ऐवजी ९ वाजून ५० मिनिटांनी रथोत्सवास सुरुवात होईल. जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव असतो. देवीची उत्सवमूर्ती रथातून नगरप्रदक्षिणेला निघते. या पार्श्वभूमीवर बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे बैठकीचे आयोजन केले होते. सहा. पो. नि. जी. एम. लांडगे, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, महादेव डबाणे, अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी, सुरेश जरग, किरण नकाते, श्रीपूजक अजित ठाणेकर, माधव मुनिश्वर उपस्थित होते. यंदा शनिवारी (दि.४) रथोत्सव आहे. मात्र, खग्रास चंद्रग्रहण आहे. संध्याकाळी सव्वासात वाजता चंद्रग्रहण सुटणार आहे. त्यानंतर अंबाबाईच्या मूर्तीला अभिषेक, आरती हे धार्मिक विधी करण्यासाठी वेळ लागणार. त्यामुळे रात्री साडेनऊऐवजी नऊ वाजून ४५ मिनिटांनी रथोत्सवाला सुरुवात होईल. तोफेच्या सलामीनंतर रथ नगरप्रदक्षिणेला निघेल. ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रथ पुन्हा मंदिरात येईल. कळसाचे दर्शन घडावे यासाठी शनिवारी रात्रभर मंदिर खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)रांगोळी आकार कमी व्हावाअंबाबाईच्या रथोत्सवात व नगरप्रदक्षिणेत मार्गावरील रांगोळ््या हे विशेष आकर्षण असते. यादिवशी विविध संस्थांच्यावतीने पूर्ण रस्त्यात रांगोळीचा गालिचा घालता जातो. मात्र, या मोठ-मोठ्या रांगोळ््यांमुळे बाजूला उभ्या असलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होते. त्यामुळे हा रांगोळ््यांचा आकार थोडा कमी करावा, अशी मागणी आली.