शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

‘अंबाबाई’चे ८० कोटी फ्लेक्सवरच! : मंडपाचे काय झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:44 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी जाहीर करण्यात आलेला ८० कोटींचा निधी फ्लेक्सवरच राहिला आहे. मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर जणू काही मंदिराचा विकासच झाला, या आशयाचे मोठे डिजिटल फलक शहरात लागले होते; पण त्यालाही वर्ष लोटल्यानंतर निवडणूक काळात केवळ सात कोटींचा निधी मंदिरासाठी देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकेवळ सात कोटींचा निधी वर्ग : मंदिर विकास आराखड्याचा नुसताच दिखावा; काम सुरू होणे अवघडच

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी जाहीर करण्यात आलेला ८० कोटींचा निधी फ्लेक्सवरच राहिला आहे. मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर जणू काही मंदिराचा विकासच झाला, या आशयाचे मोठे डिजिटल फलक शहरात लागले होते; पण त्यालाही वर्ष लोटल्यानंतर निवडणूक काळात केवळ सात कोटींचा निधी मंदिरासाठी देण्यात आला आहे.

श्री अंबाबाई मंदिराच्या विकासाची चर्चा सुरू झाल्यापासून गेल्या आठ वर्षांत आराखड्यांवर आराखडे, वर्ग झालेला दहा कोटींचा निधी परत जाणे, छाननी, बदल, दुरुस्त्या एवढ्याच गोष्टी झाल्या आहेत. त्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृह आणि कोल्हापूर चित्रनगरीचा विकास झपाट्याने करण्यात आला; पण अंबाबाईच्या नशिबी शासनाच्या लालफितीचा कारभार आला. चर्चांवर चर्चा झाल्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांनी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्याआधीच पालकमंत्र्यांनी मंदिरासाठी ७७ कोटींचा निधी राखीव ठेवल्याचे टिष्ट्वट केले होते. या मंजुरीनंतर शहरात ठिकठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक लागले. चौकाचौकांत उभारलेल्या या फ्लेक्सवर अंबाबाई मंदिरासाठी ८० कोटींचा निधी आणल्याची नोंद होती. हे फ्लेक्स पाहिल्यानंतर आता विकासकामांना सुरुवात झालीच असे काहीसे कोल्हापूरकरांना भासविण्यात आले; पण प्रत्यक्षात दीड वर्ष झाले विकासाच्या नावाखाली मंदिर परिसरातील एक वीटही हललेली नाही.

महापालिकेकडे सध्या सात कोटींचा निधी वर्ग झाला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर विकासकामांना सुरुवात करायचे त्यांचे नियोजन असले तरी तेव्हा पावसाळा सुरू होतो. त्यामुळे या कालावधीत काहीच करता येणार नाही. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिर विकास आराखड्याचे काम हनुमंताच्या शेपटीप्रमाणेच वाढत जाण्याची चिन्हे दिसत आहेत.निकालानंतर विकासकामांना सुरुवातलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विकास आराखड्यासाठी सात कोटींचा निधी महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे आता मंदिर विकास आराखड्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी २३ मे रोजी लोकसभेचा निकाल लागल्याशिवाय आणि आचारसंहिता संपल्याशिवाय विकासकामांचा नारळ फोडता येणार नाही. त्यामुळे आता ही प्रक्रिया जूनच्या दरम्यानच सुरू होईल.पर्यायी दर्शन : मंडपाचे काय झाले?या विकास आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यापीठ हायस्कूलच्या गेटसमोरील जागेत दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. मात्र, ही मंदिर बाह्य परिसरातील एकमेव मोकळी जागा आहे. नवरात्रौत्सवादरम्यान या मोकळ्या जागेमुळे गर्दीचे नियंत्रण व व्यवस्थापन करणे सोपे जाते. हेरिटेज नियमांनुसार येथे नवीन वास्तू बांधणे चुकीचे आहे. शिवाय या नव्या वास्तूला आर्किटेक्ट संस्थेचा व कोल्हापूरकरांचा विरोध आहे. त्याऐवजी वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांनी महाराजांच्या अखत्यारीतील फरासखान्याचा पर्याय मांडला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या परिसरातील विकासकामांना जेव्हा सुरुवात होईल तेव्हा हा मुद्दा पुन्हा चर्चेत येणार आहे.महापालिकेकडून प्राथमिक तयारीनिधी वर्ग झाल्याने महापालिकेने विकासकामांसाठीची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. आचारसंहिता संपताच टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दर्शन मंडप आणि भक्त निवास या दोन वास्तूंना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका