शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

अंबाबाई मंदिर अतिक्रमणमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:37 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : इतकी वर्षे ‘देवस्थान’ला अध्यक्ष नसल्याने ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. आता मात्र समितीचा कोरम पूर्ण झाला असून, धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत अंबाबाई मंदिर व बाह्य परिसर अतिक्रमण व प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. भाविकांना कायमस्वरूपी आरोग्य केंद्रासह अधिकाधिक सुविधा देण्याला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती पश्चिम ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : इतकी वर्षे ‘देवस्थान’ला अध्यक्ष नसल्याने ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. आता मात्र समितीचा कोरम पूर्ण झाला असून, धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत अंबाबाई मंदिर व बाह्य परिसर अतिक्रमण व प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. भाविकांना कायमस्वरूपी आरोग्य केंद्रासह अधिकाधिक सुविधा देण्याला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. समितीच्यावतीने इतक्या चांगल्या पद्धतीने कामकाज केले जाईल की वर्षभरात त्याचा ‘स्वतंत्र अहवाल’ छापावा लागेल, असा ‘शब्द’ही त्यांनी यावेळी दिला.महेश जाधव यांची देवस्थान अध्यक्षपदी व वैशाली क्षीरसागर यांनी कोषाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जाहीररीत्या पत्रकार परिषद घेऊन समितीची विविध प्रश्नांवरील भूमिका स्पष्ट केली. यावेळी सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी,अभियंता सुदेश देशपांडे उपस्थित होते.जाधव म्हणाले, समितीच्या अखत्यारित एकूण तीन हजार बेचाळीस मंदिरे असून, दहा हजार ४९२ हेक्टर इतकी जमीन आहे. जमिनींची माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू असून, जमिनीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.अंबाबाई मंदिरातील सुरक्षेसाठी अद्ययावत सीसीटीव्ही बसविले जाणार असून, दोन महिन्यांतून एकदा बैठक घेतली जाणार आहे. विविध सामाजिक कामांसाठीही समिती निधी खर्च करणार असून, समितीच्यावतीने अन्नछत्र व भक्त निवास उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मंदिर परिसरात एकही जाहिरात लागणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल. मंदिर विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखडा राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्याशिवाय त्र्यंबोली मंदिर परिसर विकास आराखडाही प्रस्तावित आहे.खजानिस वैशाली क्षीरसागर म्हणाल्या, समितीतील भ्रष्टाचाराबाबत सध्या चौकशी सुरू आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही.भक्त निवासापासून भाविकांना मोफत बसेससाठी प्रयत्न केले जातील, तसेच अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासाठीही समितीचा आग्रह राहील हा निर्णय झाला तर ‘देवस्थान’सह कोल्हापूरचा विकास होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सचिव विजय पोवार म्हणाले, सन २००७ ते २०१२ या कालावधीतील लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात आहे. देवस्थान अस्तित्वात येण्यापूर्वीचे ताळेबंद नाहीत. ते तयार करण्याचे आदेश शासनाने दिले असून, ते काम अंतिम टप्प्यात आहे.‘देवस्थान’कडील दागिनेसमितीच्या अखत्यारितीतील मंदिरात आजअखेर ८६ हजार २१ ग्रॅम इतके सोन्याचे, तर २४ लाख २४ हजार ९६१ ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण झाले आहेत.त्यापैकी ४७ हजार ९८४ ग्रॅम सोने व ९ लाख २६ हजार ४७१ इतकी चांदी एकट्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे आहेत. त्याचे रितसर मूल्यांकन झाले आहे.एकूण ठेव सुमारे १०७ कोटींची आहे. आजअखेर एकूण उत्पन्न १३९ कोटी ८९ लाखांचे आहे. एप्रिल २०१७ पासून ३७ लाख खंड वसुली झाली आहे. त्याशिवाय सर्व मंदिरांत मिळून एकूण ३६ दानपेट्या आहेत.लोगोसाठी आवाहनदेवस्थान समितीचे अधिकृत बोधचिन्ह बनविण्यासाठी (लोगो) बोधचिन्ह स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट बोधचिन्ह करणाºया व्यक्ती अथवा संस्थेला एकवीस हजारांचे बक्षीस दिले जाणार असून, इच्छुकांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.