शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर अतिक्रमणमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : इतकी वर्षे ‘देवस्थान’ला अध्यक्ष नसल्याने ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. आता मात्र समितीचा कोरम पूर्ण झाला असून, धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत अंबाबाई मंदिर व बाह्य परिसर अतिक्रमण व प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. भाविकांना कायमस्वरूपी आरोग्य केंद्रासह अधिकाधिक सुविधा देण्याला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती पश्चिम ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : इतकी वर्षे ‘देवस्थान’ला अध्यक्ष नसल्याने ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. आता मात्र समितीचा कोरम पूर्ण झाला असून, धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत अंबाबाई मंदिर व बाह्य परिसर अतिक्रमण व प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. भाविकांना कायमस्वरूपी आरोग्य केंद्रासह अधिकाधिक सुविधा देण्याला प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. समितीच्यावतीने इतक्या चांगल्या पद्धतीने कामकाज केले जाईल की वर्षभरात त्याचा ‘स्वतंत्र अहवाल’ छापावा लागेल, असा ‘शब्द’ही त्यांनी यावेळी दिला.महेश जाधव यांची देवस्थान अध्यक्षपदी व वैशाली क्षीरसागर यांनी कोषाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जाहीररीत्या पत्रकार परिषद घेऊन समितीची विविध प्रश्नांवरील भूमिका स्पष्ट केली. यावेळी सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी,अभियंता सुदेश देशपांडे उपस्थित होते.जाधव म्हणाले, समितीच्या अखत्यारित एकूण तीन हजार बेचाळीस मंदिरे असून, दहा हजार ४९२ हेक्टर इतकी जमीन आहे. जमिनींची माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू असून, जमिनीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.अंबाबाई मंदिरातील सुरक्षेसाठी अद्ययावत सीसीटीव्ही बसविले जाणार असून, दोन महिन्यांतून एकदा बैठक घेतली जाणार आहे. विविध सामाजिक कामांसाठीही समिती निधी खर्च करणार असून, समितीच्यावतीने अन्नछत्र व भक्त निवास उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मंदिर परिसरात एकही जाहिरात लागणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल. मंदिर विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखडा राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्याशिवाय त्र्यंबोली मंदिर परिसर विकास आराखडाही प्रस्तावित आहे.खजानिस वैशाली क्षीरसागर म्हणाल्या, समितीतील भ्रष्टाचाराबाबत सध्या चौकशी सुरू आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही.भक्त निवासापासून भाविकांना मोफत बसेससाठी प्रयत्न केले जातील, तसेच अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासाठीही समितीचा आग्रह राहील हा निर्णय झाला तर ‘देवस्थान’सह कोल्हापूरचा विकास होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सचिव विजय पोवार म्हणाले, सन २००७ ते २०१२ या कालावधीतील लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात आहे. देवस्थान अस्तित्वात येण्यापूर्वीचे ताळेबंद नाहीत. ते तयार करण्याचे आदेश शासनाने दिले असून, ते काम अंतिम टप्प्यात आहे.‘देवस्थान’कडील दागिनेसमितीच्या अखत्यारितीतील मंदिरात आजअखेर ८६ हजार २१ ग्रॅम इतके सोन्याचे, तर २४ लाख २४ हजार ९६१ ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण झाले आहेत.त्यापैकी ४७ हजार ९८४ ग्रॅम सोने व ९ लाख २६ हजार ४७१ इतकी चांदी एकट्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे आहेत. त्याचे रितसर मूल्यांकन झाले आहे.एकूण ठेव सुमारे १०७ कोटींची आहे. आजअखेर एकूण उत्पन्न १३९ कोटी ८९ लाखांचे आहे. एप्रिल २०१७ पासून ३७ लाख खंड वसुली झाली आहे. त्याशिवाय सर्व मंदिरांत मिळून एकूण ३६ दानपेट्या आहेत.लोगोसाठी आवाहनदेवस्थान समितीचे अधिकृत बोधचिन्ह बनविण्यासाठी (लोगो) बोधचिन्ह स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट बोधचिन्ह करणाºया व्यक्ती अथवा संस्थेला एकवीस हजारांचे बक्षीस दिले जाणार असून, इच्छुकांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.